शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मालमत्तेच्या विक्रीपत्रासोबत जोडावे लागेल भोगवटा प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

नियम आणि कायद्याअभावी भूखंड विक्रीत प्रचंड अनियमितता दिसून येत होती. ले-आउट विकसित न करता केवळ चुन्याने बॉन्ड्री आखून ग्राहकांना भूखंड विकले जात होते. एकाच भूखंडाची दोन-तीन जणांना विक्री होत होती. आता भूखंडाच्या किमतीपेक्षा दुप्पट विकास शुल्क भरावे लागणार आहे. महारेरा नोंदणी आणि शासनाच्या अधिसूचनेमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण आले आहे.

ठळक मुद्देशासन निर्णय : जिल्ह्यात बिल्डर्स, भूमाफियांकडून नियमाची सर्रास पायमल्ली

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुठल्याही मालमत्तेचे विक्रीपत्र नोंदणी करताना (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) विक्रीपत्रासोबत भोगवटा प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. २० सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.शासन निर्र्णयानुसार प्रादेशिक योजना क्षेत्र, ग्रामपंचायत, ग्रामीण भागात बांधकामासंदर्भात सर्व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांना आहेत. शासन निर्र्णयानुसार कुठलेही बांधकाम करताना परवानगीकरिता प्रत्येक स्तरावर प्राधिकृत कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. जोता बांधकामाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाकडून घेणे गरजेचे असताना जिल्ह्यात भूविकासक, बिल्डर्स यांच्याकडून नियम बासनात गुंडाळण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील बिल्डर्स, भूविकासकांनी कुठलेही प्रमाणपत्र न घेता स्वतंत्र बंगलो, रो-हाऊस, फ्लॅट, सदनिकेचे विक्रीपत्र नोंदणी करून घेतल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे अनेक बांधकामे अवैध आहेत. याची अनेक सर्वसामान्यांना विक्री करून फसवणूक करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासोबतच सर्वसामान्यांच्या मालमत्ता खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र विक्रीपत्रासोबत जोडल्याशिवाय आता कुठल्याही मालमत्तेची (स्वतंत्र बंगलो, रो-हाऊस, फ्लॅट, सदनिका आदी) नोंदणी करता येणार नाही. शासनाने तसा निर्णय निर्गमित केला आहे.एकाच भूखंडाची दोघा-तिघांना विक्रीनियम आणि कायद्याअभावी भूखंड विक्रीत प्रचंड अनियमितता दिसून येत होती. ले-आउट विकसित न करता केवळ चुन्याने बॉन्ड्री आखून ग्राहकांना भूखंड विकले जात होते. एकाच भूखंडाची दोन-तीन जणांना विक्री होत होती. आता भूखंडाच्या किमतीपेक्षा दुप्पट विकास शुल्क भरावे लागणार आहे. महारेरा नोंदणी आणि शासनाच्या अधिसूचनेमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण आले आहे. प्रकल्पाची महारेरामध्ये नोंदणी असेल तरच भूखंडाची रजिस्ट्री होणार आहे. प्रमोटर्सला प्रकल्पाची संपूर्ण माहिती महारेरामध्ये नोंदणी करतानाच द्यावी लागते.जिल्ह्यात पाचशेवर व्यावसायिकवर्धा शहरासह जिल्ह्यात पाचशेवर भूविकासक, बिल्डर्स आहेत. शंभर टक्के व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) न घेताच बंगलो, रो-हाऊस, सदनिका, भूखंडाचे विक्रीपत्र करून घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम राबवून भूमाफिया आणि बिल्डर्सवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.