शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

मालमत्तेच्या विक्रीपत्रासोबत जोडावे लागेल भोगवटा प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

नियम आणि कायद्याअभावी भूखंड विक्रीत प्रचंड अनियमितता दिसून येत होती. ले-आउट विकसित न करता केवळ चुन्याने बॉन्ड्री आखून ग्राहकांना भूखंड विकले जात होते. एकाच भूखंडाची दोन-तीन जणांना विक्री होत होती. आता भूखंडाच्या किमतीपेक्षा दुप्पट विकास शुल्क भरावे लागणार आहे. महारेरा नोंदणी आणि शासनाच्या अधिसूचनेमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण आले आहे.

ठळक मुद्देशासन निर्णय : जिल्ह्यात बिल्डर्स, भूमाफियांकडून नियमाची सर्रास पायमल्ली

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुठल्याही मालमत्तेचे विक्रीपत्र नोंदणी करताना (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) विक्रीपत्रासोबत भोगवटा प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. २० सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.शासन निर्र्णयानुसार प्रादेशिक योजना क्षेत्र, ग्रामपंचायत, ग्रामीण भागात बांधकामासंदर्भात सर्व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांना आहेत. शासन निर्र्णयानुसार कुठलेही बांधकाम करताना परवानगीकरिता प्रत्येक स्तरावर प्राधिकृत कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. जोता बांधकामाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाकडून घेणे गरजेचे असताना जिल्ह्यात भूविकासक, बिल्डर्स यांच्याकडून नियम बासनात गुंडाळण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील बिल्डर्स, भूविकासकांनी कुठलेही प्रमाणपत्र न घेता स्वतंत्र बंगलो, रो-हाऊस, फ्लॅट, सदनिकेचे विक्रीपत्र नोंदणी करून घेतल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे अनेक बांधकामे अवैध आहेत. याची अनेक सर्वसामान्यांना विक्री करून फसवणूक करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासोबतच सर्वसामान्यांच्या मालमत्ता खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र विक्रीपत्रासोबत जोडल्याशिवाय आता कुठल्याही मालमत्तेची (स्वतंत्र बंगलो, रो-हाऊस, फ्लॅट, सदनिका आदी) नोंदणी करता येणार नाही. शासनाने तसा निर्णय निर्गमित केला आहे.एकाच भूखंडाची दोघा-तिघांना विक्रीनियम आणि कायद्याअभावी भूखंड विक्रीत प्रचंड अनियमितता दिसून येत होती. ले-आउट विकसित न करता केवळ चुन्याने बॉन्ड्री आखून ग्राहकांना भूखंड विकले जात होते. एकाच भूखंडाची दोन-तीन जणांना विक्री होत होती. आता भूखंडाच्या किमतीपेक्षा दुप्पट विकास शुल्क भरावे लागणार आहे. महारेरा नोंदणी आणि शासनाच्या अधिसूचनेमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण आले आहे. प्रकल्पाची महारेरामध्ये नोंदणी असेल तरच भूखंडाची रजिस्ट्री होणार आहे. प्रमोटर्सला प्रकल्पाची संपूर्ण माहिती महारेरामध्ये नोंदणी करतानाच द्यावी लागते.जिल्ह्यात पाचशेवर व्यावसायिकवर्धा शहरासह जिल्ह्यात पाचशेवर भूविकासक, बिल्डर्स आहेत. शंभर टक्के व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) न घेताच बंगलो, रो-हाऊस, सदनिका, भूखंडाचे विक्रीपत्र करून घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम राबवून भूमाफिया आणि बिल्डर्सवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.