शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे कायदे साठेबाज, नफेखोरांच्या हिताचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 15:55 IST

Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात : सेवाग्राम येथे काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह

सेवाग्राम (वर्धा) - केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे केलेले आहेत. या कायद्याविरुद्ध आम्ही सत्याग्रह करीत आहोत. महात्मा गांधींनी न्याय मागण्यांसाठी सत्याचा मार्ग दाखविला. त्याच मार्गाने आमची वाटचाल सुरू आहे. केंद्राने  केलेले कायदे हे साठेबाज आणि नफेखोराच्या बाजूचे आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

सेवाग्राम आश्रमात शनिवारी सकाळी काँग्रेसतर्फे राज्यव्यापी सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल, भारताच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून काँग्रेसने या सत्याग्रहाचे आयोजन येथे केले होते. याप्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते. सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी आश्रम परिसरात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी लावलेल्या वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आश्रमासमोर सत्याग्रह आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एस.के. पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आशीष दुवा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विजय औताळे, काँग्रेसचे समन्वयक मुजफ्फर हुसैन, प्रदेश प्रतिनिधी रवींद्र दरेकर, जिया पटेल, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, शेखर शेंडे, माजी मंत्री अनिस अहेमद, हर्षवर्धन सपकाळ, कुणाल राऊत, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे आदी उपस्थित होते.

आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी काँग्रेस नेत्यांचे आश्रमात स्वागत केले. याप्रसंगी बोलताना नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, नव्या कृषी कायद्यामुळे शेतकºयांच्या शोषणाचे काम होणार असून कै. यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेली बाजार समितीची व्यवस्थाही हद्दपार केली जाणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी विकलेल्या शेतमालाच्या पैशाची हमी कोण घेणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. बाहेरचे व्यापारी येऊन शेतमाल खरेदी करतील, साठेबाजी करतील. जनतेला महागड्या वस्तू विकत घ्याव्या लागेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. ह्यवैष्णव जन तोह्ण भजन व वैदिक प्रार्थना तसेच सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत व हर देश मेंह्ण तू या भजनाने प्रार्थनेची सांगता झाली. त्यानंतर सत्याग्रहस्थळी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सत्याग्रहाच्या शामियानात केवळ ४० लोकांनाच प्रवेश देण्यात आला होता. सत्याग्रह सुरू असलेल्या ठिकाणी केवळ तीन महिलांनी अंबर चरख्यावर सूतकताई केली. ह्यरघुपती राघव राजा रामह्ण हे भजन आणि राष्ट्रवंदनेने काँग्रेसच्या या सत्याग्रहाची सांगता झाली.

महाविकास आघाडी सरकार या कायद्याचा विरोध करणारकेंद्र सरकारने लागू केलेल्या या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार विरोध करणार असून लवकरच मंत्रिमंडळाची उपसमिती यासाठी बैठक घेणार आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.मराठा समाजाचे १२ टक्के आरक्षण सोडून इतर जागा भरून टाकामराठा समाजाचे १२ टक्के आरक्षण सोडून इतर जागा भरून टाकाव्यात कारण इतर समाजात असंतोष वाढणार नाही आणि त्यांचा अधिकार त्यांना मिळेल. ओबीसींचे आरक्षण आहे. परंतू लोकसंख्येनुसार आरक्षण वाढवून दिले पाहिजे. ओबीसींमध्ये असंतोष आहे. आम्ही किती दिवस थांबायच हा प्रश्न ते करताआहेत अशी भूमिका राज्याच्या मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सत्याग्रह स्थळी माध्यमांशी बोलतांना मांडली. केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करण्यासाठी राज्यभर हे आंदोलन केले जात आहे. या कायद्यामुळे देशातील शेतकरी उद्धस्त होणार आहे. असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस