शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कापूस व सोयाबीन उत्पादकांचे धरणे

By admin | Updated: December 6, 2014 00:23 IST

अखिल भारतीय किसान सभा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यात आले़ ...

वर्धा : अखिल भारतीय किसान सभा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यात आले़ यात जिल्ह्यातील वर्धा, देवळी, सेलू, आर्वी, आष्टी हिंगणघाट, कारंजा (घा़) तालुक्यातून २५० हून अधिक शेतकरी पुरूष व महिला सहभागी झाल्या होत्या़धरणे आंदोलन प्रसंगी घेण्यात आलेल्या सभेत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, जानराव नागमोते, गणपत मेंढे, चंद्रभान नाखले, प्रल्हाद ढेंगरे, सिटूचे महेश दुबे, सीताराम लोहकरे, जनवादी महिला संघटनेच्या प्रभा घंगारे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले़ याप्रंसगी यशवंत झाडे म्हणाले, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी दैनावस्था आहे़ उशिरा आलेल्या व लवकर निघून गेलेल्या पावसाने उत्पादन निम्म्याच्याही कमी झाले आहे. बाजारपेठेत कापसाचे दर ३५०० ते ४००० प्रति क्विंटल व सोयाबीन ३५०० प्रति क्विंटलच्या आसपास आहे़ कापूस व सोयाबीन विकून शेतीला लावलेला खर्चही वसूल होत नसल्याचे वस्तूस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी वर्षभर कुटुंब कसे चालविणार हा प्रश्न आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यांत शासनाने दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करावी़ तसेच स्वामीनाथन कमिशनच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च व ५० टक्के नफा जोडून सर्व शेतमालाचे उत्पादन दर केंद्र सरकारने जाहीर करावे, शेतमालाची खरेदीची व्यवस्था करावी़, कापसाला ७ हजार रूपये व सोयाबीनला ४५०० रूपये प्रति क्विंटल दर मिळावा, रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच त्या लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागील दहा वर्षात शेतीला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, बियाणे, रासायनिक खते, फवारणी औषधे, मजुरी, जनावरांचा चारा, प्रवास खर्च, वीजबिल पाच ते दहा पटीने वाढले़ मात्र उत्पादित शेतमालाचे दर पडत आहे़ अशा स्थितीत वाढत्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे शेतमालाचे हमी दर मिळणे अपेक्षित आहे़ मात्र कोणतेही सरकार याकडे लक्ष देत नाही़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या तेव्हावी आणि आताही सुरूच आहे. शेतीसाहित्याच्या किमती वाढतच आहे आणि तुलनेत शेतमालाच्या किमती मात्र घसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी सुनील गाढे यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने सादर करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री, मुख्य सचिव, आमदार, खासदार यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या़ यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष अनिल चव्हाण, पांडुरंग राऊत, गणपत मेंढे, शामराव कालोकर, वासुदेव पाल, जगन चांभारे, चंद्रभान नाखले यांच्यासह जिह्यातील महिला व पुरूष शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)