शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज नाकारल्याचे प्रकरण पोहोचले मंत्रालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तरोडा येथील शेतकऱ्याला पंजाब नॅशनल बॅँकेने कर्जमाफीचा लाभ मिळूनही नव्याने पीक कर्ज देण्यास नकार ...

ठळक मुद्देतरोड्यातील शेतकरी अडचणीत : चर्चा होऊनही तोडगा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तरोडा येथील शेतकऱ्याला पंजाब नॅशनल बॅँकेने कर्जमाफीचा लाभ मिळूनही नव्याने पीक कर्ज देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन व राज्य कृषी मुल्य आयोगाने सहकार विभागाच्या सचिवांशी मंत्रालयात चर्चा केली. मात्र याप्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नाही. राज्यात सिबील रेकॉर्ड खराब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचण येत असल्याची माहिती पुढे आली आहे.महाराष्ट्रात २० लाख शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना माफी मिळूनही पीककर्ज मिळत नाही. त्यामध्ये सिबील रेकॉर्डची सर्वात मोठी अडचण असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २० लाख शेतकरी पुन्हा पीककर्ज घेण्यापासून वंचित राहू शकतात, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वर्धा जिल्ह्याच्या तरोडा येथील नत्थू भावराव वरघणे यांच्याकडे १.८४ हेक्टर आर. जमीन असून त्यांना १.५० लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यांनी उर्वरित १७ हजार रूपये भरले. या शेतकºयांनी २०१४ मध्ये ट्रॅक्टरचे कर्ज वनटाईम सेटलमेंट करून भरले. त्यांना सिबील अटीमुळे कर्ज देण्यास नकार मिळाला. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी व अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे माहिती दिली. या सर्वांनी पंजाब नॅशनल बँक तरोडा शाखा व्यवस्थापकाला सांगूनही त्यांनी संबंधित शेतकऱ्यांला पीककर्ज दिले नाही.राज्यात सिबीलच्या अटीमुळे २० लाखांच्या आसपास शेतकऱ्यांची पीक कर्जाची प्रकरणे विविध बँकामध्ये अडकून पडली आहेत. सिबीलमध्ये आता खासगी फायनान्स कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरकरिता घेतलेले कर्ज व वनटाईम सेटलमेंटने भरलेले सिबील रेकॉर्ड खराब झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. त्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत आहे.मंत्रालयात झाली बैठक; पण निर्णय नाहीया संदर्भात वर्धा जिल्ह्यातील हे प्रकरण पुढे आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी व कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी सिबीलच्या अटीबाबत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना बैठक घेण्यास सांगितले. २७ जूनला मुख्य सचिवाच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला सहकार विभागाच्या अतिरिक्त सचिव आभा शुक्ला उपस्थित होत्या. मुख्य सचिवांना आपण रिझर्व्ह बँकेशी बोलून सिबीलमधील अट रद्द करून घेण्यास सांगू, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, त्यापलीकडे या प्रश्नावर काहीही निर्णय झाला नाही.कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याकरिता तालुकास्तरीय समितीचे गठण करण्यात यावे, रिझर्व्ह बँकेशी मुख्य सचिवांनी चर्चा करून पीककर्ज वाटपाचा तिढा सोडवावा व हजारो शेतकऱ्यांचा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा करावा.- प्रशांत इंगळे तिगावकरसदस्य,राज्य कृषी मूल्य आयोग