शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

पीककर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सुलभतेने अर्थसहाय्य करणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देखासदारांनी घेतली बँक व्यवस्थापकांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप पीककर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागून देवून योग्य माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्याकरिता विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिल्यात.खरीप हंगामातील पीककर्ज वाटप, कर्जमाफी, स्वंयरोजगार युवकांना कर्ज व उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शेतकरी व ग्राहकांच्या समस्येबाबत खासदार रामदास तडस यांनी बुधवारी जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विरेंद्र कुमार, एसबीआयचे जे.पी.मोहोंतो, अ‍ॅक्सीस बँकेचे सुरज माजरखेडे, आंध्रा बँकेचे गोपाल भुजबळ, बॅक ऑफ बडोदाचे प्रवीण कुमार व नितीन माउंडेकर, अलाहाबाद बँकेचे श्वेता मेश्राम, आयडीबीयचे सुशांत लोखंडे व आशिष पाटील, कॅनरा बँकचे ऐ.पी. मसखेडे, व्हीकेजीबीचे अविनाश आचार्य यांच्यासह इतर बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आढावा बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामापूर्वी कमी कागदपत्रावर कर्ज पुरवठा करणे, कर्जमाफी झालेले शेतकरी तसेच कर्जमाफीमध्ये नाव असलेल्या शेतकºयांना त्वरीत कर्ज देणे, बँकेने शेतकऱ्यांची खाती असेट रिकव्हरी सेलला विकलेली असल्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यामुळे अशा बँकांना सूचना देवून त्यांचे खाते नियमीत करणे, आत्मनिर्भर योजनेतून कर्ज वाटप, स्टँड अप, स्टार्टअप, मुद्रालोन अंतर्गत गरजुंना कर्जवाटप, उच्च शिक्षणाकरिता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना बँक कर्मचाºयांनी मुख्यालयी राहणे, आदी विषयावर चर्चा करण्यात आली.कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सुलभतेने अर्थसहाय्य करणे अपेक्षित आहे. मात्र, कागदपत्राचा ससेमिरा लावल्याने लॉकडाऊनच्या काळात कागदपत्रांची जुळवाजुळव करंताना शेतकऱ्याची दमछाक होत आहे. बँकामध्ये शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळत नाही, त्यांना सुलभतेने माहिती देण्यात यावी, त्यांना सातबारा व आठ बँकेतच उपलब्ध करुन द्यावा, असेही यावेळी खासदार तडस यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जRamdas Tadasरामदास तडस