शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

पीककर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सुलभतेने अर्थसहाय्य करणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देखासदारांनी घेतली बँक व्यवस्थापकांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप पीककर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागून देवून योग्य माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्याकरिता विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिल्यात.खरीप हंगामातील पीककर्ज वाटप, कर्जमाफी, स्वंयरोजगार युवकांना कर्ज व उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शेतकरी व ग्राहकांच्या समस्येबाबत खासदार रामदास तडस यांनी बुधवारी जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विरेंद्र कुमार, एसबीआयचे जे.पी.मोहोंतो, अ‍ॅक्सीस बँकेचे सुरज माजरखेडे, आंध्रा बँकेचे गोपाल भुजबळ, बॅक ऑफ बडोदाचे प्रवीण कुमार व नितीन माउंडेकर, अलाहाबाद बँकेचे श्वेता मेश्राम, आयडीबीयचे सुशांत लोखंडे व आशिष पाटील, कॅनरा बँकचे ऐ.पी. मसखेडे, व्हीकेजीबीचे अविनाश आचार्य यांच्यासह इतर बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आढावा बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामापूर्वी कमी कागदपत्रावर कर्ज पुरवठा करणे, कर्जमाफी झालेले शेतकरी तसेच कर्जमाफीमध्ये नाव असलेल्या शेतकºयांना त्वरीत कर्ज देणे, बँकेने शेतकऱ्यांची खाती असेट रिकव्हरी सेलला विकलेली असल्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यामुळे अशा बँकांना सूचना देवून त्यांचे खाते नियमीत करणे, आत्मनिर्भर योजनेतून कर्ज वाटप, स्टँड अप, स्टार्टअप, मुद्रालोन अंतर्गत गरजुंना कर्जवाटप, उच्च शिक्षणाकरिता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना बँक कर्मचाºयांनी मुख्यालयी राहणे, आदी विषयावर चर्चा करण्यात आली.कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सुलभतेने अर्थसहाय्य करणे अपेक्षित आहे. मात्र, कागदपत्राचा ससेमिरा लावल्याने लॉकडाऊनच्या काळात कागदपत्रांची जुळवाजुळव करंताना शेतकऱ्याची दमछाक होत आहे. बँकामध्ये शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळत नाही, त्यांना सुलभतेने माहिती देण्यात यावी, त्यांना सातबारा व आठ बँकेतच उपलब्ध करुन द्यावा, असेही यावेळी खासदार तडस यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जRamdas Tadasरामदास तडस