लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांपुढे अनेक पर्याय असतात. पण, कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात गोंधळ निर्माण होतो, पालकही संभ्रमावस्थेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे कोणती शाखा निवडायची, कोणते करिअर योग्य आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण होते. यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे.
या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शिष्यवृत्ती आणि प्रवेश परीक्षेची ही माहिती मिळणार आहे. समुपदेशकाकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. जेणेकरून शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आपण कोणते करिअर निवडले पाहिजे, हे कळणार आहे. पालकांनाही याचा लाभ होणार आहे.
शिक्षकांची नवी भूमिकाकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' उपक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना ही प्रशिक्षण दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे कार्य ही शिक्षकांना करावे लागणार आहे.
करिअर गाइडची आवश्यकतादहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. विद्यार्थी, पालक चिंतेत सापडतात. यासाठी पालक कोणाला तरी विचारून मुलांचे करिअर ठरवतात. मात्र, यामुळे मुलाचे करिअर घडत नाही. यासाठी करिअर गाइडची आवश्यकता आहे.
नव्या पद्धतीने विद्यार्थ्यांना होणार अनेक फायदेकरिअर जागरूकता कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना त्यांच्यापुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना नोकरी, शिक्षण, व्यवसाय याची माहिती मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-क्षमता ओळखून योग्य करिअर निवडण्यात, योग्य दिशा मिळवण्यात आणि भविष्यासाठी तयारी करण्यात मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमात शिक्षकांना नेमकं काय शिकवणार?करिअर जागरूकता कार्यक्रम या उपक्रमाचे शाळा स्तरावर स्वागत करण्यात आले आहे. करिअर जागरूकता कार्यक्रमात शिक्षकांना केवळ करिअर पर्यायांची माहितीच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, योग्य मार्गदर्शन, आधुनिक अध्यापन तंत्र आणि श्रम बाजारातील बदल समजून घेण्यास मदत करणारे विविध कौशल्ये शिकवली जातात. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर निवडीत योग्य दिशा दाखवू शकतात. ही नवी योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
शिक्षक व समुपदेशकांची भूमिका ठरणार महत्वाचीदहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअर जागरूकता कार्यक्रम अंतर्गत मुख्याध्यापक व समुपदेशकाकडून नवीन संधी कोणत्या मिळणार आहेत. यावर मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे हे कळणार आहे. यात समुदेशकांची
भुमिह शाळांचा सहभाग कसा ?केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.