शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
7
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
8
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
9
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
10
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
11
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
12
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
14
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
15
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
16
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
17
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
18
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
19
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
20
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
Daily Top 2Weekly Top 5

करिअरचं बाळकडू शाळेतच मिळणार; सीबीएसई राबवणार उपक्रम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:10 IST

Vardha : विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांपुढे अनेक पर्याय असतात. पण, कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात गोंधळ निर्माण होतो, पालकही संभ्रमावस्थेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे कोणती शाखा निवडायची, कोणते करिअर योग्य आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण होते. यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे.

या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शिष्यवृत्ती आणि प्रवेश परीक्षेची ही माहिती मिळणार आहे. समुपदेशकाकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. जेणेकरून शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आपण कोणते करिअर निवडले पाहिजे, हे कळणार आहे. पालकांनाही याचा लाभ होणार आहे.

शिक्षकांची नवी भूमिकाकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' उपक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना ही प्रशिक्षण दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे कार्य ही शिक्षकांना करावे लागणार आहे.

करिअर गाइडची आवश्यकतादहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. विद्यार्थी, पालक चिंतेत सापडतात. यासाठी पालक कोणाला तरी विचारून मुलांचे करिअर ठरवतात. मात्र, यामुळे मुलाचे करिअर घडत नाही. यासाठी करिअर गाइडची आवश्यकता आहे.

नव्या पद्धतीने विद्यार्थ्यांना होणार अनेक फायदेकरिअर जागरूकता कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना त्यांच्यापुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना नोकरी, शिक्षण, व्यवसाय याची माहिती मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-क्षमता ओळखून योग्य करिअर निवडण्यात, योग्य दिशा मिळवण्यात आणि भविष्यासाठी तयारी करण्यात मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमात शिक्षकांना नेमकं काय शिकवणार?करिअर जागरूकता कार्यक्रम या उपक्रमाचे शाळा स्तरावर स्वागत करण्यात आले आहे. करिअर जागरूकता कार्यक्रमात शिक्षकांना केवळ करिअर पर्यायांची माहितीच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, योग्य मार्गदर्शन, आधुनिक अध्यापन तंत्र आणि श्रम बाजारातील बदल समजून घेण्यास मदत करणारे विविध कौशल्ये शिकवली जातात. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर निवडीत योग्य दिशा दाखवू शकतात. ही नवी योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

शिक्षक व समुपदेशकांची भूमिका ठरणार महत्वाचीदहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअर जागरूकता कार्यक्रम अंतर्गत मुख्याध्यापक व समुपदेशकाकडून नवीन संधी कोणत्या मिळणार आहेत. यावर मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे हे कळणार आहे. यात समुदेशकांची

भुमिह शाळांचा सहभाग कसा ?केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा