शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

करिअरचं बाळकडू शाळेतच मिळणार; सीबीएसई राबवणार उपक्रम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:10 IST

Vardha : विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांपुढे अनेक पर्याय असतात. पण, कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात गोंधळ निर्माण होतो, पालकही संभ्रमावस्थेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे कोणती शाखा निवडायची, कोणते करिअर योग्य आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण होते. यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे.

या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शिष्यवृत्ती आणि प्रवेश परीक्षेची ही माहिती मिळणार आहे. समुपदेशकाकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. जेणेकरून शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आपण कोणते करिअर निवडले पाहिजे, हे कळणार आहे. पालकांनाही याचा लाभ होणार आहे.

शिक्षकांची नवी भूमिकाकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' उपक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना ही प्रशिक्षण दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे कार्य ही शिक्षकांना करावे लागणार आहे.

करिअर गाइडची आवश्यकतादहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. विद्यार्थी, पालक चिंतेत सापडतात. यासाठी पालक कोणाला तरी विचारून मुलांचे करिअर ठरवतात. मात्र, यामुळे मुलाचे करिअर घडत नाही. यासाठी करिअर गाइडची आवश्यकता आहे.

नव्या पद्धतीने विद्यार्थ्यांना होणार अनेक फायदेकरिअर जागरूकता कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना त्यांच्यापुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना नोकरी, शिक्षण, व्यवसाय याची माहिती मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-क्षमता ओळखून योग्य करिअर निवडण्यात, योग्य दिशा मिळवण्यात आणि भविष्यासाठी तयारी करण्यात मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमात शिक्षकांना नेमकं काय शिकवणार?करिअर जागरूकता कार्यक्रम या उपक्रमाचे शाळा स्तरावर स्वागत करण्यात आले आहे. करिअर जागरूकता कार्यक्रमात शिक्षकांना केवळ करिअर पर्यायांची माहितीच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, योग्य मार्गदर्शन, आधुनिक अध्यापन तंत्र आणि श्रम बाजारातील बदल समजून घेण्यास मदत करणारे विविध कौशल्ये शिकवली जातात. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर निवडीत योग्य दिशा दाखवू शकतात. ही नवी योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

शिक्षक व समुपदेशकांची भूमिका ठरणार महत्वाचीदहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअर जागरूकता कार्यक्रम अंतर्गत मुख्याध्यापक व समुपदेशकाकडून नवीन संधी कोणत्या मिळणार आहेत. यावर मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे हे कळणार आहे. यात समुदेशकांची

भुमिह शाळांचा सहभाग कसा ?केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा