शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

करिअरचं बाळकडू शाळेतच मिळणार; सीबीएसई राबवणार उपक्रम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:10 IST

Vardha : विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांपुढे अनेक पर्याय असतात. पण, कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात गोंधळ निर्माण होतो, पालकही संभ्रमावस्थेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे कोणती शाखा निवडायची, कोणते करिअर योग्य आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण होते. यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे.

या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शिष्यवृत्ती आणि प्रवेश परीक्षेची ही माहिती मिळणार आहे. समुपदेशकाकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. जेणेकरून शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आपण कोणते करिअर निवडले पाहिजे, हे कळणार आहे. पालकांनाही याचा लाभ होणार आहे.

शिक्षकांची नवी भूमिकाकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' उपक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना ही प्रशिक्षण दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे कार्य ही शिक्षकांना करावे लागणार आहे.

करिअर गाइडची आवश्यकतादहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. विद्यार्थी, पालक चिंतेत सापडतात. यासाठी पालक कोणाला तरी विचारून मुलांचे करिअर ठरवतात. मात्र, यामुळे मुलाचे करिअर घडत नाही. यासाठी करिअर गाइडची आवश्यकता आहे.

नव्या पद्धतीने विद्यार्थ्यांना होणार अनेक फायदेकरिअर जागरूकता कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना त्यांच्यापुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना नोकरी, शिक्षण, व्यवसाय याची माहिती मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-क्षमता ओळखून योग्य करिअर निवडण्यात, योग्य दिशा मिळवण्यात आणि भविष्यासाठी तयारी करण्यात मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमात शिक्षकांना नेमकं काय शिकवणार?करिअर जागरूकता कार्यक्रम या उपक्रमाचे शाळा स्तरावर स्वागत करण्यात आले आहे. करिअर जागरूकता कार्यक्रमात शिक्षकांना केवळ करिअर पर्यायांची माहितीच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, योग्य मार्गदर्शन, आधुनिक अध्यापन तंत्र आणि श्रम बाजारातील बदल समजून घेण्यास मदत करणारे विविध कौशल्ये शिकवली जातात. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर निवडीत योग्य दिशा दाखवू शकतात. ही नवी योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

शिक्षक व समुपदेशकांची भूमिका ठरणार महत्वाचीदहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअर जागरूकता कार्यक्रम अंतर्गत मुख्याध्यापक व समुपदेशकाकडून नवीन संधी कोणत्या मिळणार आहेत. यावर मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे हे कळणार आहे. यात समुदेशकांची

भुमिह शाळांचा सहभाग कसा ?केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आता थेट शाळा पातळीवर 'करिअर जागरूकता कार्यक्रम' हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक व समुपदेशक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा