शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरीही बसता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चांगलेच तापत असल्याने आणि अनेकांनी कुलर तसेच एसी सुरू केल्याने विजेची मागणीही वाढली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख ग्राहकांना महावितरण वीज पुरवठा करते. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी सद्यस्थितीत महावितरणकडून कुठलेही भारनियमन लागू करण्यात आलेले नाही. लोड वाढल्यावरच विद्युत देयक नियमित न भरणाऱ्या भागात काही तासांकरिता भारनियमन केले जाते. अशाच वेळी उन्हामुळे बाहेर जाता येईना अन् वीज नसल्याने घरीही बसता येईना अशी परिस्थिती नागरिकांवर ओढवते.कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चांगलेच तापत असल्याने आणि अनेकांनी कुलर तसेच एसी सुरू केल्याने विजेची मागणीही वाढली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण एखाद्यावेळी लोड वाढल्यावरच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भारनियमन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रती दिवशी ३५ हजार मेगा व्हॅटपेक्षा जास्त विजेची मागणी राहिल्यास नाईलाजाने वर्धेकरांवर भारनियमनाचे संकटच ओढवणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विजेचा जपूनच वापर करण्याची गरज आहे.

दोन दिवसांपूर्वी राहिली विक्रमी मागणी-    जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्याची विजेची मागणी तब्बल २८ हजार मेगा व्हॅट राहिली असून तशी नोंद महावितरणने घेतली आहे. विशेष म्हणजे एरवी प्रतीदिवशी १८ ते २० हजार मेगाव्हॅट विजेची मागणी राहत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याची वीज मागणी २८ हजार मेगाव्हॅट इतकी विक्रमीच राहिली. भारनियमनाचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित देयक अदा करावे.- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.

इन्व्हर्टरच्या मागणीत होणार वाढजिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात विजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यास महावितरणला काही भागात भारनियमन लागू करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत इन्व्हर्टरच्या मागणीत कमालीची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरात ठराविक भागात वीज का जात नाही?

- कमी तोटा तसेच नियमित देयक अदा करणाऱ्या भागाला प्राधान्यक्रमाने नियमित विद्युत पुरवठा देण्याचे महावितरणचे धोरण आहे. त्यामुळेच ज्या भागातील नागरिक किंवा व्यावसायिक वीज चोरीसारखा प्रकार टाळत नियमित देयक अदा करतात त्या भागात महावितरण नियमित विद्युत पुरवठा करते. तर ज्या भागात जास्त तोटा आणि नियमित देयक अदा केली जात नाहीत त्या भागात भारनियमन केले जात असल्याचे सांगण्यात आले.

जास्त तोटा तेथेच भारनियमन-    जास्त तोटा, विद्युत चोरी यासह ज्या भागातील नागरिक नियमित वीज देयक अदा करत नाहीत अशाच शहरी व ग्रामीण भागात लोड वाढल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून भारनियमन लागू केले जाते. -    मध्यंतरी जी-१ आणि जी-२ भागात काही काळाकरिता भारनियमन लागू करावे लागले होते.

 

टॅग्स :electricityवीजTemperatureतापमान