शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरीही बसता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चांगलेच तापत असल्याने आणि अनेकांनी कुलर तसेच एसी सुरू केल्याने विजेची मागणीही वाढली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख ग्राहकांना महावितरण वीज पुरवठा करते. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी सद्यस्थितीत महावितरणकडून कुठलेही भारनियमन लागू करण्यात आलेले नाही. लोड वाढल्यावरच विद्युत देयक नियमित न भरणाऱ्या भागात काही तासांकरिता भारनियमन केले जाते. अशाच वेळी उन्हामुळे बाहेर जाता येईना अन् वीज नसल्याने घरीही बसता येईना अशी परिस्थिती नागरिकांवर ओढवते.कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चांगलेच तापत असल्याने आणि अनेकांनी कुलर तसेच एसी सुरू केल्याने विजेची मागणीही वाढली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण एखाद्यावेळी लोड वाढल्यावरच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भारनियमन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रती दिवशी ३५ हजार मेगा व्हॅटपेक्षा जास्त विजेची मागणी राहिल्यास नाईलाजाने वर्धेकरांवर भारनियमनाचे संकटच ओढवणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विजेचा जपूनच वापर करण्याची गरज आहे.

दोन दिवसांपूर्वी राहिली विक्रमी मागणी-    जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्याची विजेची मागणी तब्बल २८ हजार मेगा व्हॅट राहिली असून तशी नोंद महावितरणने घेतली आहे. विशेष म्हणजे एरवी प्रतीदिवशी १८ ते २० हजार मेगाव्हॅट विजेची मागणी राहत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याची वीज मागणी २८ हजार मेगाव्हॅट इतकी विक्रमीच राहिली. भारनियमनाचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित देयक अदा करावे.- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.

इन्व्हर्टरच्या मागणीत होणार वाढजिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात विजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यास महावितरणला काही भागात भारनियमन लागू करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत इन्व्हर्टरच्या मागणीत कमालीची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरात ठराविक भागात वीज का जात नाही?

- कमी तोटा तसेच नियमित देयक अदा करणाऱ्या भागाला प्राधान्यक्रमाने नियमित विद्युत पुरवठा देण्याचे महावितरणचे धोरण आहे. त्यामुळेच ज्या भागातील नागरिक किंवा व्यावसायिक वीज चोरीसारखा प्रकार टाळत नियमित देयक अदा करतात त्या भागात महावितरण नियमित विद्युत पुरवठा करते. तर ज्या भागात जास्त तोटा आणि नियमित देयक अदा केली जात नाहीत त्या भागात भारनियमन केले जात असल्याचे सांगण्यात आले.

जास्त तोटा तेथेच भारनियमन-    जास्त तोटा, विद्युत चोरी यासह ज्या भागातील नागरिक नियमित वीज देयक अदा करत नाहीत अशाच शहरी व ग्रामीण भागात लोड वाढल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून भारनियमन लागू केले जाते. -    मध्यंतरी जी-१ आणि जी-२ भागात काही काळाकरिता भारनियमन लागू करावे लागले होते.

 

टॅग्स :electricityवीजTemperatureतापमान