शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरीही बसता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चांगलेच तापत असल्याने आणि अनेकांनी कुलर तसेच एसी सुरू केल्याने विजेची मागणीही वाढली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख ग्राहकांना महावितरण वीज पुरवठा करते. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी सद्यस्थितीत महावितरणकडून कुठलेही भारनियमन लागू करण्यात आलेले नाही. लोड वाढल्यावरच विद्युत देयक नियमित न भरणाऱ्या भागात काही तासांकरिता भारनियमन केले जाते. अशाच वेळी उन्हामुळे बाहेर जाता येईना अन् वीज नसल्याने घरीही बसता येईना अशी परिस्थिती नागरिकांवर ओढवते.कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चांगलेच तापत असल्याने आणि अनेकांनी कुलर तसेच एसी सुरू केल्याने विजेची मागणीही वाढली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण एखाद्यावेळी लोड वाढल्यावरच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भारनियमन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रती दिवशी ३५ हजार मेगा व्हॅटपेक्षा जास्त विजेची मागणी राहिल्यास नाईलाजाने वर्धेकरांवर भारनियमनाचे संकटच ओढवणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विजेचा जपूनच वापर करण्याची गरज आहे.

दोन दिवसांपूर्वी राहिली विक्रमी मागणी-    जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्याची विजेची मागणी तब्बल २८ हजार मेगा व्हॅट राहिली असून तशी नोंद महावितरणने घेतली आहे. विशेष म्हणजे एरवी प्रतीदिवशी १८ ते २० हजार मेगाव्हॅट विजेची मागणी राहत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याची वीज मागणी २८ हजार मेगाव्हॅट इतकी विक्रमीच राहिली. भारनियमनाचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित देयक अदा करावे.- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.

इन्व्हर्टरच्या मागणीत होणार वाढजिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात विजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यास महावितरणला काही भागात भारनियमन लागू करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत इन्व्हर्टरच्या मागणीत कमालीची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरात ठराविक भागात वीज का जात नाही?

- कमी तोटा तसेच नियमित देयक अदा करणाऱ्या भागाला प्राधान्यक्रमाने नियमित विद्युत पुरवठा देण्याचे महावितरणचे धोरण आहे. त्यामुळेच ज्या भागातील नागरिक किंवा व्यावसायिक वीज चोरीसारखा प्रकार टाळत नियमित देयक अदा करतात त्या भागात महावितरण नियमित विद्युत पुरवठा करते. तर ज्या भागात जास्त तोटा आणि नियमित देयक अदा केली जात नाहीत त्या भागात भारनियमन केले जात असल्याचे सांगण्यात आले.

जास्त तोटा तेथेच भारनियमन-    जास्त तोटा, विद्युत चोरी यासह ज्या भागातील नागरिक नियमित वीज देयक अदा करत नाहीत अशाच शहरी व ग्रामीण भागात लोड वाढल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून भारनियमन लागू केले जाते. -    मध्यंतरी जी-१ आणि जी-२ भागात काही काळाकरिता भारनियमन लागू करावे लागले होते.

 

टॅग्स :electricityवीजTemperatureतापमान