शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

केवळ तहसिलदारांच्या आदेशाने जिल्ह्यात ५७७ सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक

By अभिनय खोपडे | Updated: March 3, 2023 17:18 IST

अजून एक हजारावर पात्र प्रकरणांचे आदेश होणार

वर्धा : हिंदू वारसा कायद्यान्वये वारस असलेले परंतु सातबारावर नाव नसलेल्या सहधारकांमध्ये केवळ तहसिलदाराच्या आदेशाने वाटणीपत्र करण्याची मोहिम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सुचनेप्रमाणे राबविण्यात आली. गेल्या तीन महिन्यातच तब्बल १ हजार ६५७ प्रकरणे वाटणीपत्रास पात्र ठरली आहे. यापैकी ५७७ प्रकरणात अंतीम आदेश पारीत झाल्याने हे सहधारक आता आपल्या जमिनीचे हक्काचे मालक झाले आहे.   

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात सहधारकाची स्पष्ट व्याख्या नसल्याने क्षेत्रिय अधिकारी वडिलोपार्जीत जमिनीच्या विभाजनास टाळाटाळ करतात. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दाव्याचा दाखल देत अशा जमिनीचे वारसदार हे सहधारक असल्याने अशा धारकांकडून अर्ज प्राप्त झाल्यास तातडीने निकाली काढण्याचे निर्देश सर्व तहसिलदारांना दिले होते तसेच यासाठी विशेष मोहिम जिल्ह्यात सुरु केली होती.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून किंवा सहधारकांनी अर्ज केल्यास जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रिकरण करणे अधिनियमातील तरतुदीस अधीन राहून धारण जमिनीचे विभाजन करण्याची पध्दत विषद करण्यात आली आहे. परंतु जमीन महसूल अधिनियमात सहधारकाची स्पष्ट व्याख्या नसल्याने क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी सहधारकाच्या नावे शेतजमिनीची विभागणी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेजमिनीचे कायदेशीर वारसदार असतांना सुध्दा विभाजनापासून असे वारसदार वंचित राहतात.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका दाव्याचा दाखला देत सहधारक म्हणजे फक्त सातबारावर नाव असलेल्या व्यक्तीच नव्हे तर एकत्र हिंदु कुटुंबातील भविष्यात वारसा हक्काने सातबारावर नाव दाखल होणारे कायदेशीर वारस देखील सहधारक किंवा संयुक्त धारक असल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे अशा वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या कायदेशीर वारसांकडून शेतजमिनीच्या विभाजनासाठी अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यात पात्र सहधारकांमध्ये शेतजमिन विभाजनाची मोहिम घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत गेल्या तीन महिन्यात शेतविभाजनासाठी २ हजार २६७ अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची छाणणी केल्यानंतर १ हजार ६५७ प्रकरणे विभाजनीस पात्र ठरले आहे. पात्र प्रकरणांपैकी ५७७ सहधारकांचे अंतीम आदेश पारीत करून त्यांना हक्काचे शेतजमिन मालक बनविण्यात आले आहे. पात्र प्रकरणातील अजून १ हजार ८० प्रकरणांचे अंतीम आदेश लवकरच पारीत होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व महसूलच्या यंत्रणेने ही मोहिम उत्कृष्टपणे राबविली आहे.

 यात आर्वी तालुका 126, समुद्रपुर 116, देवळी 104  तर आष्टी तालुक्यात 98 प्रकरणांचे अंतीम आदेश पारीत झाले आहे. शेत विभाजनीची प्रकरणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणाऱ्या फेरफार अदालतीत प्राधान्याने घेतली जातात. त्याचा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.   

कायद्यान्वये सहधारकास प्राप्त होणारी शेतजमीन हस्तांतरण या संज्ञेत येत नाही त्या विभाजनासाठी वाटणीपत्राच्या नोंदणीची आवश्यकता नाही. त्यामुळे सहधारकांना स्टॅम्प ड्युटीचा आर्थिक भार सहन करावा लागला नाही. ही प्रक्रीया जिल्ह्यात कमी खर्चात आणि कमी त्रासात राबविण्यात आली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकagricultureशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा