शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

रस्ता बांधकामामुळे वर्धा-मदना येथील बसफेरी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

आर्वी ते वर्धा या मार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने याचा परिसरातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्धा ते मदना ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटला असून मिळेल त्या वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसत नियोजित गाव गाठावे लागत आहे. येथील शेकडोवर विद्यार्थी जिल्हास्थळी शिक्षणाकरिता येतात. सध्या परीक्षेचे दिवस आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची पायपीट : बसफेरी सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : रस्ता बांधकामामुळे वर्धा ते मदना बसफेरी मागील कित्येक महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही बसफेरी तत्काळ सुरु करण्याची मागणी गावकऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक नियंत्रण विभागाला दिले आहे.आर्वी ते वर्धा या मार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने याचा परिसरातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्धा ते मदना ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटला असून मिळेल त्या वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसत नियोजित गाव गाठावे लागत आहे. येथील शेकडोवर विद्यार्थी जिल्हास्थळी शिक्षणाकरिता येतात. सध्या परीक्षेचे दिवस आहेत. बसफेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यात विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचताना वेळ होते. विद्यार्थ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी वाहतूक नियंत्रकांना बसफेरी सुरू करण्याचे निर्देश दिले. नागरिकांनी सहायक वाहतूक नियंत्रक गुंडतवार व वाणे यांना निवेदन दिले असता बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच अभय ढोकणे, उपसरपंच सुनीता मडावी, सुभाष वंजारी, सचिव जे. डी. राठोड उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक