लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : रस्ता बांधकामामुळे वर्धा ते मदना बसफेरी मागील कित्येक महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही बसफेरी तत्काळ सुरु करण्याची मागणी गावकऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक नियंत्रण विभागाला दिले आहे.आर्वी ते वर्धा या मार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने याचा परिसरातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्धा ते मदना ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटला असून मिळेल त्या वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसत नियोजित गाव गाठावे लागत आहे. येथील शेकडोवर विद्यार्थी जिल्हास्थळी शिक्षणाकरिता येतात. सध्या परीक्षेचे दिवस आहेत. बसफेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यात विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचताना वेळ होते. विद्यार्थ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी वाहतूक नियंत्रकांना बसफेरी सुरू करण्याचे निर्देश दिले. नागरिकांनी सहायक वाहतूक नियंत्रक गुंडतवार व वाणे यांना निवेदन दिले असता बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच अभय ढोकणे, उपसरपंच सुनीता मडावी, सुभाष वंजारी, सचिव जे. डी. राठोड उपस्थित होते.
रस्ता बांधकामामुळे वर्धा-मदना येथील बसफेरी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST
आर्वी ते वर्धा या मार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने याचा परिसरातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्धा ते मदना ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटला असून मिळेल त्या वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसत नियोजित गाव गाठावे लागत आहे. येथील शेकडोवर विद्यार्थी जिल्हास्थळी शिक्षणाकरिता येतात. सध्या परीक्षेचे दिवस आहेत.
रस्ता बांधकामामुळे वर्धा-मदना येथील बसफेरी बंद
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची पायपीट : बसफेरी सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी