शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सामूहिक शेततळे अन् सोलरपंप ठरले भरभराटीचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:02 PM

सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे. आज त्यांच्या शेतात १५ एकरवर फळबाग बहरली आहे. केवळ एका पावसामुळे नांगर फिरवावा लागणाऱ्या त्यांच्या शेतीत ही किमया केली ती सामूहिक शेततळे आणि सोलरपंपाने.वर्धा तालुक्यातील मदनी गावातील माधव वानखेडे या शेतकऱ्यांकडे २५ एकर शेती जिराईत होती. २०१५ मध्ये जिल्ह्यात कोरडा दुष्काळ होता. त्या दुष्काळाचा फटका सिंचनाची कोणतीही व्यवस्था नसणाºया आणि विद्युत जोडणी नसणाºया वानखेडे सारख्या शेतकºयांना बसला. त्यांनी त्यांच्या १५ एकर सोयाबीनचे पीक नांगरले. यावेळी वानखेडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेततळे देण्याची मागणी केली. माधव वानखेडे यांनी सामूहिक शेततळ्याचा लाभ घेतला.५६ मीटर, ४५ मीटर, ५.५ मीटर असे मोठे सामूहिक शेततळे तयार केले. तसेच शासनाच्या सौर कृषीपंप योजनेमधून त्यांना  ७.५ एचपी सोलरपंपचाही लाभ मिळाला. त्यांच्याकडे पाणी आणि विद्युत अशा दोन्ही सुविधा उपलब्ध झाल्यावर त्यांनी जिराईत शेती संपूर्णपणे ओलीताखाली आणली. ५ एकरात केळी आणि ८ एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली. तसेच आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि हरभरा या पिकांचेही त्यांनी उत्पादन घेतले. मागील वर्षी केळीच्या उत्पादनातून त्यांना ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच सोयाबीन आंतरपिकातून १.५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर डाळिंबाचे उत्पन्न यावर्षी पासून सुरू होत आहे. मुख्य म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी त्यांनी फळबागेला ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. सामूहिक शेततळ्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.सोलरपंपामुळे माझी विजेची आणि पैशाची बचत होत आहे. शिवाय पिकांना वेळेत पाणी मिळाल्यामुळे उत्पन्नातही भर पडली. लोड शेडिंगमुळे रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जाण्याची आता गरज पडत नाही.- माधव वानखेडे, शेतकरी, मदनी.