शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

विदर्भ राज्याची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:58 IST

विदर्भातील जनता स्वत: चे जीवनमान समृद्ध करण्याकरिता झटत आहे.जगाचा पोशिंदा आत्महत्या करीत आहे.विदर्भाचा विकास खुंटल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे तसेच आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडीची मागणी : नितीन गडकरी यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील जनता स्वत: चे जीवनमान समृद्ध करण्याकरिता झटत आहे.जगाचा पोशिंदा आत्महत्या करीत आहे.विदर्भाचा विकास खुंटल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे तसेच आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वेगळे विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.राज्य शासनाच्या विविध खात्यामध्ये विदर्भात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. कारण विदर्भातील बहुसंख्य शासकीय पदावर, विदर्भाबाहेरील व्यक्तीच नेमले जातात. या व्यक्तींची पाळेमुळे विदर्भाबाहेर त्यांच्या मुळ परिसरात रूजलेली असल्याने या व्यक्ती लवकरच आपल्या परिसरात बदली करून घेतात. याचा परिणाम प्रशासनावर आणि जनतेवर होतो.विदर्भ महाराष्ट्रात जोडला त्यावेळी नागपूर कराराचा आधार घेण्यात आला होता. या नागपूर करारातील कलम ८ मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये विदर्भाला लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्यात याव्या. विदर्भाची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या २४ टक्के इतकी आहे. ही बाब लक्षात घेता एकूण नोकºयांच्या २४ टक्के जागा विदर्भाला मिळणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात गेल्या ५८ वर्षात महाराष्ट्रात विदर्भातील बेरोजगारांना जेमतेम साडे तीन ते चार टक्के नोकºया प्राप्त झाल्या आहेत. आजही राज्यात २० लाखावर शासकीय पदे आहे. मात्र यातील विदर्भीयांना मिळालेल्या नोकºयांची आकडेवारी बघितल्यास ती ८० हजार पेक्षाही कमी भरते. हा विदर्भावर घोर अन्याय आहे. हा अन्याय विदर्भ महाराष्ट्रात सामील करून घेतला तेव्हापासून सुरूच आहे.विदर्भातील विद्यार्थ्यांना मागील २०१०-११ पासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. यापुर्वीही शासनास मोर्चाद्वारे व निवेदनाद्वारे थकीत शिष्यवृत्ती प्रदान करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. विदर्भ राज्य होण्याबाबत आपणास सर्व अभ्यास आहेच. फजल अली यांच्या राज्य पुनर्रचना आयोगाने १९५६ ला विदर्भ हे वेगळे राज्य करा म्हणून भारत सरकारला अत्यंत महत्वाची शिफारस केली होती. एवढेच नाही तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फजल अली आयोगाला केलेल्या निवेदनात अतिशय सुस्पष्टपणे सूचित केले होते की, भाषेच्या आधारावर विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन मराठी भाषिक राज्य व्हावे. तेव्हाच त्यांचा समतोल विकास होईल. विदर्भ आणि मराठवाड्याला मुंबई सारख्या राक्षसी प्रदेशामध्ये जोडल्यास त्याचा कधीच विकास होणार नाही. परंतु राज्यकर्त्यांनी या सुचनेचे विपरीत केले व विदर्भ हा महाराष्ट्राचा एक भाग झाला.त्यामुळे आतापर्यंत होत असलेल्या अन्यायातून विदर्भाला सावरण्याकरिता आपण विदर्भपुत्र म्हणून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आघाडीचे अनिल जवादे, संदिप रघाटाटे, जयंता धोटे, अजय मुळे, शकील अहमद, रहमत खॉ पठाण, महेश माकडे यांनी केली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस