शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

बीएसएनएलकडे पावतीसाठी कागद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केल्यानंतरही पावती दिली जात नाही. पाठपुरावा करताना ग्राहकांची दमछाक होते; मात्र, बीएसएनएलमधील गलेलठ्ठ पगाराच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही.

ठळक मुद्देवर्धा कार्यालयातील प्रकार : ग्राहकांना होतोय मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्राहकाने दूरध्वनी बिलाचा भरणा केल्यानंतरही भारत संचार निगमकडून ऑनलाईन पावती वेळीच दिली जात नसून कागद उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने या विभागाला उतरती कळा लागली की काय, अशी चर्चा ग्राहकांत आहे.तक्रार करूनही दूरध्वनी सेवेतील बिघाड वेळीच दुरुस्त न करणे, इंटरनेट सुविधेत सातत्याने निर्माण होत असलेला तांत्रिक बिघाड, गती कमी असणे तर कधी-कधी सेवा पूर्णत: ठप्प असणे आदी कारणांनी नेहमी चर्चेत राहणाऱ्या बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. याचाच परिणाम, बीएसएनएल खासगी कंपन्यांच्या तुलनेत सेवा देण्यात पिछाडली असल्याचे चित्र आहे. प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने घरोघरी दिसणारे टेलिफोन अडगळीत पडले.अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केल्यानंतरही पावती दिली जात नाही. पाठपुरावा करताना ग्राहकांची दमछाक होते; मात्र, बीएसएनएलमधील गलेलठ्ठ पगाराच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही.मुद्रित पावती देण्याकरिता कागद, अ‍ॅडव्हान्स प्राप्त झालेला नाही, प्रिंटरमध्ये बिघाड आहे, अशी बेजबाबदार उत्तरे देऊन ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही अंकुश नाही. बीएसएनएलमधील कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत धडे द्यावेत, देयकाचा भरणा केल्यानंतर तत्काळ पावती देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संतप्त ग्राहकांनी केली आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता दूरसंचारचे जिल्हा व्यवस्थापक संजयकुमार इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेतो, असे म्हणून त्यांनी दूरध्वनी बंद केला.दोन महिन्यांपासून अधिकारी, कर्मचारी वेतनाविनाबीएसएनएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन नाही. यामुळे अनेकांचे बँका, विम्याचे हप्ते थकले असून आर्थिक संकट ओढवले आहे. वेतन नियमित मिळाले असते तर कागद खरेदी करता आली असती. मात्र, मुख्य कार्यालयाकडूनच अ‍ॅडव्हान्स वेळीच प्राप्त होत नसल्याने ही समस्या उद्भल्याचेही विभागीय अभियंता विजय ढोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक