शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

बीएसएनएलकडे पावतीसाठी कागद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केल्यानंतरही पावती दिली जात नाही. पाठपुरावा करताना ग्राहकांची दमछाक होते; मात्र, बीएसएनएलमधील गलेलठ्ठ पगाराच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही.

ठळक मुद्देवर्धा कार्यालयातील प्रकार : ग्राहकांना होतोय मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्राहकाने दूरध्वनी बिलाचा भरणा केल्यानंतरही भारत संचार निगमकडून ऑनलाईन पावती वेळीच दिली जात नसून कागद उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने या विभागाला उतरती कळा लागली की काय, अशी चर्चा ग्राहकांत आहे.तक्रार करूनही दूरध्वनी सेवेतील बिघाड वेळीच दुरुस्त न करणे, इंटरनेट सुविधेत सातत्याने निर्माण होत असलेला तांत्रिक बिघाड, गती कमी असणे तर कधी-कधी सेवा पूर्णत: ठप्प असणे आदी कारणांनी नेहमी चर्चेत राहणाऱ्या बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. याचाच परिणाम, बीएसएनएल खासगी कंपन्यांच्या तुलनेत सेवा देण्यात पिछाडली असल्याचे चित्र आहे. प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने घरोघरी दिसणारे टेलिफोन अडगळीत पडले.अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केल्यानंतरही पावती दिली जात नाही. पाठपुरावा करताना ग्राहकांची दमछाक होते; मात्र, बीएसएनएलमधील गलेलठ्ठ पगाराच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही.मुद्रित पावती देण्याकरिता कागद, अ‍ॅडव्हान्स प्राप्त झालेला नाही, प्रिंटरमध्ये बिघाड आहे, अशी बेजबाबदार उत्तरे देऊन ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही अंकुश नाही. बीएसएनएलमधील कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत धडे द्यावेत, देयकाचा भरणा केल्यानंतर तत्काळ पावती देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संतप्त ग्राहकांनी केली आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता दूरसंचारचे जिल्हा व्यवस्थापक संजयकुमार इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेतो, असे म्हणून त्यांनी दूरध्वनी बंद केला.दोन महिन्यांपासून अधिकारी, कर्मचारी वेतनाविनाबीएसएनएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन नाही. यामुळे अनेकांचे बँका, विम्याचे हप्ते थकले असून आर्थिक संकट ओढवले आहे. वेतन नियमित मिळाले असते तर कागद खरेदी करता आली असती. मात्र, मुख्य कार्यालयाकडूनच अ‍ॅडव्हान्स वेळीच प्राप्त होत नसल्याने ही समस्या उद्भल्याचेही विभागीय अभियंता विजय ढोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक