शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

दारूविक्रीच्या स्पर्धेतून युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुलचे वडील किसना यांच्या तक्रारीवरून सांवगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देपोलिसांची डोळेझाक कारणीभूत : कारलावासीयांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमुळे विदेशी दारू मिळणे अवघड झाल्याने दारूविक्रेते गावठी दारूविक्रीकडे वळले आहेत. अशातच काही विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून दारूविक्रेत्यांच्या या स्पर्धेतूनच तिघांनी मिळून एका युवकाचा ‘गेम’ केला. गुरुवारी दुपारी १ वाजता शहरालगतच्या कारला या गावात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुलचे वडील किसना यांच्या तक्रारीवरून सांवगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. राहुल हा साटोडा गावात दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. गावात वाढती दारूविक्री पाहता महिला मंडळाने गावातून दारूविक्री बंद केली.लगतच्या कारला गावात श्रावण राऊत व छन्नू नामक व्यक्ती दारुविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने राहुलने श्रावणशी हात मिळवणी करून आपला नव्याने व्यवसाय सुरू केला. त्यामुळे छन्नूच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने गुरुवारी सकाळी राहुल व छन्नू या दोघांत वाद झाला. या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय गावकºयांकडून व्यक्त केला जात आहे.गावकºयांच्या तक्रारीकडे पोलिसांची पाठमागील काही दिवसांपासून कारला गावात दारूचा महापूर ओसंडून वाहत होता. श्रावण, छन्नू आणि राहूल हे तिघेही राजरोसपणे गावठी दारूची विक्री करीत होते. याबाबत कारला येथील बचत गटाच्या महिलांसह नागरिकांनी सावंगी पोलिसांना माहिती दिली. पण, त्यांनी दखल घेतली नाही. अखेर आमदारासह पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या दारूविक्रेत्यावर कारवाई केली. सावंगी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच राहुलची हत्या झाल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.एका तासात आरोपी ताब्यातकारला गावात झालेल्या हत्येच्या घटनेतील तिन्ही आरोपींना अवघ्या एका तासात शोधून काढले. सर्व आरोपी सावंगी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पैशाच्या देवणा-घेवाणीतून आणि जुन्या वादातून राहुल मगरची हत्या झाल्याचा अंदाज सावंगी पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तपासाअंतीच हत्येचे कारण कळू शकेल, असे सावंगीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखूनliquor banदारूबंदी