शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

दारूविक्रीच्या स्पर्धेतून युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुलचे वडील किसना यांच्या तक्रारीवरून सांवगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देपोलिसांची डोळेझाक कारणीभूत : कारलावासीयांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमुळे विदेशी दारू मिळणे अवघड झाल्याने दारूविक्रेते गावठी दारूविक्रीकडे वळले आहेत. अशातच काही विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून दारूविक्रेत्यांच्या या स्पर्धेतूनच तिघांनी मिळून एका युवकाचा ‘गेम’ केला. गुरुवारी दुपारी १ वाजता शहरालगतच्या कारला या गावात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.राहुल किसना मगर (३५) रा. साटोडा असे मृताचे नाव आहे. कारला येथील एका मंदिरासमोर राहुलला बोलावून तिघांनी त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पाडले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला सेवाग्राम रुग्णालयाल दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राहुलचे वडील किसना यांच्या तक्रारीवरून सांवगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. राहुल हा साटोडा गावात दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. गावात वाढती दारूविक्री पाहता महिला मंडळाने गावातून दारूविक्री बंद केली.लगतच्या कारला गावात श्रावण राऊत व छन्नू नामक व्यक्ती दारुविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने राहुलने श्रावणशी हात मिळवणी करून आपला नव्याने व्यवसाय सुरू केला. त्यामुळे छन्नूच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने गुरुवारी सकाळी राहुल व छन्नू या दोघांत वाद झाला. या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय गावकºयांकडून व्यक्त केला जात आहे.गावकºयांच्या तक्रारीकडे पोलिसांची पाठमागील काही दिवसांपासून कारला गावात दारूचा महापूर ओसंडून वाहत होता. श्रावण, छन्नू आणि राहूल हे तिघेही राजरोसपणे गावठी दारूची विक्री करीत होते. याबाबत कारला येथील बचत गटाच्या महिलांसह नागरिकांनी सावंगी पोलिसांना माहिती दिली. पण, त्यांनी दखल घेतली नाही. अखेर आमदारासह पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या दारूविक्रेत्यावर कारवाई केली. सावंगी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच राहुलची हत्या झाल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.एका तासात आरोपी ताब्यातकारला गावात झालेल्या हत्येच्या घटनेतील तिन्ही आरोपींना अवघ्या एका तासात शोधून काढले. सर्व आरोपी सावंगी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पैशाच्या देवणा-घेवाणीतून आणि जुन्या वादातून राहुल मगरची हत्या झाल्याचा अंदाज सावंगी पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तपासाअंतीच हत्येचे कारण कळू शकेल, असे सावंगीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखूनliquor banदारूबंदी