शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

नियोजित दिवशीच केंद्रावर कापूस आणावा

By admin | Updated: January 28, 2015 23:39 IST

भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

वर्धा : भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी निश्चित केलेल्या दिवशीच केंद्रावर कापूस खरेदीसाठी आणावा, अशी माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले आहे.कापूस खरेदी केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसामग्री नुसार त्या त्या केंद्रावर किती जास्त कापूस खरेदी होईल यासंदर्भात मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनी कापूस केंद्रात माल विक्री आणण्यापूर्वी केंद्रावरील निश्चित केलेल्या दिवशीच कापूस खरेदीसाठी आणावा अस सीसीआयतर्फे सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात हिंगणघाट केंद्रावर १० हजार क्विंटल दररोज कापूस खरेदी करण्यात येणार असून सोमवार, मंगळवार, गुरूवार व शुक्रवार याच दिवशी कापूस खरेदी करण्यात येईल. वर्धा केंद्रावर दीड हजार क्विंटल दररोज कापूस खरेदीची क्षमता असून सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशीच कापूस खरेदी करण्यात येईल. तसेच देवळी केंद्रावर दररोज ३ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. पुलगाव केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. कांढळी केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. सिंदी (रेल्वे) केंद्रावर दररोज १ हजार क्विंटल दररोज गुरूवार, शुक्रवार, शनिवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. रोहणा केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल दररोज सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. वडनेर केंद्रावर १ हजार ५०० क्विंटल दररोज कापूस सोमवार, बुधवार, आणि शनिवार रोजी खरेदी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)