शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

कर्जमाफीच्या आशेत कर्ज वसुलीला ब्रेक

By admin | Updated: May 13, 2017 01:07 IST

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तोडांवर आला आहे. या दिवसात पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा सुरू होतात.

खरीप पीक कर्जवाटपाचे ध्येय धुसर : आतापर्यंत केवळ ३० टक्क्यांपर्यंतच वितरण लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तोडांवर आला आहे. या दिवसात पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा सुरू होतात. येथे जुन्या कर्जाचा भरणा करून नवे कर्ज दिल्या जाते. मात्र जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाची गती मंदावल्याचे दिसते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीची आशा असल्याने त्यांच्याकडून नवे कर्ज घेण्याकडे पाठ केल्याने कर्ज वसुलीलाही ब्रेक बसल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या खरीपात वर्धा जिल्ह्याला ७३० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गतवर्षी ७०० कोटींवर होते. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पीक कर्जाकरिता आलेल्या शेतकऱ्यांना वेळीच कर्ज मंजूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत; मात्र शेतकऱ्यांकडून सध्या कर्जाची उचल करण्याकडे पाठ आहे. परिणामी बँकांच्या वसुलीलाही ब्रेक बसला आहे. सध्या शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या चर्चा सुरू आहे. ही चर्चा कितपत फळाला जाते या बाबत साशंकता आहे, असे असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीची आशा असल्याचे दिसत आहे. वसुलीकरिता गेलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना ‘सध्या कर्जमाफीचा निर्णय होवू द्या, नंतर काय ते बघू’ असे उत्तर मिळत असल्याची माहिती बँक व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप कर्ज घेण्याकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असून आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ ३० टक्केचा वाटप झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात सर्वच बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात नव्याने काय सूचना मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरीप हंगामाचे मोजकेच दिवस शिल्लक आहे. शेतकरी उन्हाळवाहीत व्यस्त आहे. येत्या दिवसात त्याच्याकडून बी-बियाणे, खते खरेदीची लगबग सुरू होणार आहे. यामुळे कर्ज वितरणाच्या उद्दिष्टात वाढ होण्याची शक्यता अग्रणी बँकेकडून वर्तविण्यात येत आहे. खरीप हंगामाला कॅश तुटवड्याचा फटका जिल्ह्याला महिन्याकाठी लागणारी रोख गरजेच्या तुलनेत पाठविण्यात येत नाही. यामुळे त्याचा फटका सध्या ग्राहकांना बसत आहे. हिच स्थिती खरीप हंगामाच्यावेळी कायम राहणार असल्याचे चित्र आहे. बँकांत रक्कम राहण्याची शक्यता कमीच असल्याने त्यांना आवश्यक रक्कम मिळेल अथवा नाही, याची शाश्वती नाही. परिणामी शेतकऱ्यांना इतरांकडेच हात पसरविण्याचीच वेळ येणार असल्याची शक्यता आहे. गरजेच्या तुलनेत केवळ १० टक्केच रोकड पुरवठा जिल्ह्याला महिन्याठी ६०० कोटी रुपयांची रोकड आवश्यक असताना केवळ १० टक्के रोकड मिळत आहे. सुमारे ९० टक्के रोकड मिळत नसल्याने रोख व्यवहार खोळंबले आहे. शेतीचा हंगाम हा रोख व्यवहारावर आधारीत असून याचा फटका या खरीप हंगामाला बसणार असल्याचे चित्र आहे.