शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

बोर व्याघ्र प्रकल्पातील मचाणींची अवस्था दयनीय

By admin | Updated: October 15, 2015 02:29 IST

काहीच दिवसांपूर्वी वन्य जीव सुरक्षा जिल्ह्यात तसेच तालुक्यातही थाटामाटात राबविण्यात आला. या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च झाला.

सेलू : काहीच दिवसांपूर्वी वन्य जीव सुरक्षा जिल्ह्यात तसेच तालुक्यातही थाटामाटात राबविण्यात आला. या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च झाला. वन्य जिवांच्या नावावर मोठा निधी खर्च होत असतानाही सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. सुरक्षेच्या आणि व्याघ्रगणनेच्या दृष्टीने येथे उभारण्यात आलेल्या मचाणींची अवस्था दयनीय झाल्याचे वास्तव आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांची निगराणी करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या मचाणीची अवस्था सध्या भंगारासारखी झाली आहे. एवढेच नव्हे तर बोरधरणाच्या परिसरात व धरणाच्या भिंतीशेजारी प्लास्टिकचा खच पडलेला दिसून येतो. एवढेच नव्हे तर राम मंदिराच्या पायथ्याशी धरणावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाच्या सौंदर्यीकरणाचे पूर्णत: वाभाडे निघाले आहे. या गाळात प्लाटिक पन्नी आणि टिस्पोजेबल ग्लासेसचा थर पाहावयास मिळत आहे. वन्य प्राणी नियमित या भागात पाणी पिण्याकरिता येतात. याच ठिकाणी वाघाचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्लास्टिकचा वन्य प्राण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वन्यप्राण्यांवर निगरानी ठेवण्यासाठी येथे राम मंदिराशेजारी मोठे मचाणी उभारण्यात आल्या आहे. मात्र या मचाणीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्याच्या फळ्या इतरत्र विखुरलेल्या दिसतात. अशाही अवस्थेत या मचानावर पर्यटक चढतात. त्यामुळे त्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. अभयारण्यात सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त असणे गरजेचे आहे. परंतु वन्य अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वनविभागाच्या संपदेवर चोरटे ताव मारून मोठ्या प्रमाणात वनसंपदा चोरून नेतात. काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यात वन्यजीव सप्ताह राबविण्यात आला. मोठमोठे कार्यक्रम घेण्यात आले. रॅली काढण्यात आली. चित्रांद्वारे पर्यावरण वाचवा असा संदेशही देण्यात आला. परंतु अभयारण्यातील वास्तव स्थितीकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. मचाणींची स्थिती दयनीय झाल्याने त्यावर चढून अधिकारी अभयारण्याची आणि वन्यप्राण्यांची किती पाहणी करतात हे न उलगडणारे कोडेच आहे.(तालुका प्रतिनिधी)