शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

बोरच्या अधिकाऱ्यांची सारवासारव

By admin | Updated: June 11, 2014 00:13 IST

बोर अभयारण्यात असलेल्या प्राण्यांची १४ मे बुद्धपोर्णीमेला प्रगणना झाली़ ढगाळ वातावरण, अचनाक आलेल्या पावसाच्या सरी व जंगलात पसरलेला काळोखा यामुळे प्रगणनेत अडथळा आला़ उभारलेल्या मचाणी व पाणवठे

ढगाळी वातावरणात प्रगणना फसल्यावरही दिसले पाच वाघप्रफुल्ल लुंगे - सेलूबोर अभयारण्यात असलेल्या प्राण्यांची १४ मे बुद्धपोर्णीमेला प्रगणना झाली़ ढगाळ वातावरण, अचनाक आलेल्या पावसाच्या सरी व जंगलात पसरलेला काळोखा यामुळे प्रगणनेत अडथळा आला़ उभारलेल्या मचाणी व पाणवठे यांच्यातील जास्त अंतर व त्या आंधारात काहीही न दिसल्याने प्रगणना फसली़ तरीही प्रगणना यशस्वी होवून त्यात पाच वाघ दिसल्याची माहिती पसरवून अधिकारी सारवासारव करीत आहेत. बोरच्या अधिकाऱ्यांचा हा खोटारडेपणा ‘लोकमत’ने उजेडात आणला. यामुळे हा खोटारडेपणा करून अधिकारी स्वत:चा बचाव करीत असल्याचा आरोप होत आहे. बोर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी, पक्षी सोबतच वाघ, बिबटही आहे़ म्हणूनच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू आहे़ बोर अभयारण्याच्या नैसर्गिक परिसर, विपुल वनसंपदा बोर अभयारण्याकडे पर्यटकांची पावले खेचून आणते; मात्र बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या बेपर्वावृत्तीमुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढत असून त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़बोरधारणाच्या राममंदिर परिसरात नित्यनेमाने दररोज संध्याकाळी ६़३० ते ७ वाजताच्या दरम्यान एक वयस्क वाघ पर्यटकांसह सर्वांना हमखास दिसायचा़ यंदाचा उन्हाळा संपत असतानाही दररोज दिसणारा पट्टेदार वाघ दिसला नाही़ तो बेपत्ता झाल्याची चर्चा झाली़ हा वाघ शिकाऱ्यांकडून मारण्यात आल्याची किंवा शेतकऱ्यांनी शेताच्या कुंपनात सोडलेल्या वीज प्रवाहाच्या स्पर्शाने ठार झाल्याची व त्याचा मृतदेह रफादफा केल्याची दबक्या आवाजात अधिकारी, कर्मचारी व लोकांमध्ये चर्चा सुरू झाली़व्याघ्र गणनेत ‘त्या’ वाघाचा शोध लागेल अशी आशा होती़ मात्र प्रगणनाच फसल्याने वाघाचा शोध लागला नाही़ हे प्रकरण शेकणार म्हणून अयशस्वी प्रगणनेला खरेपणाचे बनावट स्वरूप देत जंगलात पाच वाघ व इतर प्राण्यांची १४ मेच्या प्रगणनेत नोंदीचा अहवाल बनवून स्वत:सह सर्वांची फसगत केली. लबाड अधिकाऱ्यांनी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतल्याने बोर अभयारण्याचे व त्यांना पाठीशी घालणारे लांडगे किती लबाड आहे हे उघड झाले़ हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर सत्य शोधण्यासाठी गेल्यावर सर्वांचा खोटारडेपणा उघड होईलच हे नक्की़