शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

बोर-धाम नदीपात्र कोरडे; भरपावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:02 IST

दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देसिंचन व्यवस्था कोलमडली : नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा; आकाशाकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.नदीने सुबत्ता आणि समृद्धी दिल्याने नदीकाठावरची गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहे. मात्र, यावेळी पर्जन्यमानाचा चांगलाच फटका बसला. जुलै महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असला तरी दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने देर्डा आणि सावंगी या दोन गावांमधून आणि संगम असलेल्या बोर व धाम नदीपात्रात ठणठणाट असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.नदीकाठावरील शेतात सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. पिकांना पावसाची गरज आहे; मात्र वरूणराजा रूसल्याने आणि नदी कोरडी असल्याने सिंचन कसे करायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.अंतसंस्काराचे सोपस्कार नदीवर केले जातात; पण नदी कोरडी आहे. त्यामुळे डोहच आधार आहे, पण त्यावरही शेवाळ तयार झाले आहे. मात्र विधीचे काम असल्याने पाणी कसेही का असेना सोपस्कार उपलब्ध पाण्यात उरकविण्यात येत आहे. डोहालाही कोरड पडली होती; पण उन्हाळ्यात देर्डा येथील विहिरीचे खोलीकरण आणि बांधकाम करण्यात आले. त्यावेळी विहिरीचे पाणी डोहात सोडण्यात आल्याने डोहात पाणी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रानात चारा नाही, पाणी नाही. त्यामुळे घरीच गोपालक आणि मालकांना जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. भर पावसाळ्यात उन्हाच्या तडाख्यामुळे पाणीपातळी वेगाने खाली जात आहे. शेतात वाळण येत असून जनावरेदेखील सावलीचा शोध घेत असल्याचे दिसून येत आहे. अल्पशा पावसामुळे नदी, नाले अद्याप कोरडे आहेत. यामुळे शेतकरी व नागरिकांच्या घशाला कोरड पडणार, यात शंका नाही.जुलै महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असून आता नागरिकांची भिस्त केवळ आॅगस्ट महिन्यावर आहे. सर्वांनाच धो-धो पावसाची प्रतीक्षा असून नागरिक आकाशाकडे टक लावून पाहत एकदा तरी मनसोक्त कोसळ, अशी आळवणी परमेश्वराला नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीकपात