शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोरोनाबाधितांनी वर्ध्यात ठेवला देह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ही दोन मोठी कोविड रुग्णालये असल्याने या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता येतात. कोरोनाकाळात असंख्य रुग्ण विविध आजारांकरिता येथे दाखल झाले. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

ठळक मुद्दे४७८ मृतदेहांवर झाले अंत्यसंस्कार : दहा महिन्यांपासून स्मशानभूमीत अग्निदाह

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जी जन्मभूमी आहे... जी कर्मभूमी आहे... त्याच ठिकाणी आयुष्याचा शेवट झाल्यानंतर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी आपल्याकडील परंपरा आहे. पण, कोरोनायनाने ही परंपराही मोडीत काढली आहे. असंख्य रुग्ण आपल्या जिल्ह्याच्या, प्रांताच्या सीमा ओलांडून वर्ध्यातील रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल झाले. उपचारादरम्यान त्यातील काही रुग्णांनी अखेरचा श्वास घेतल्याने या सर्वांवर वर्ध्यातीलच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. शहरातील स्मशानभूमीत गेल्या दहा महिन्यांपासून अग्निदाह सुरूच असून, आता कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागला आहे.जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ही दोन मोठी कोविड रुग्णालये असल्याने या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता येतात. कोरोनाकाळात असंख्य रुग्ण विविध आजारांकरिता येथे दाखल झाले. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या रुग्णांना इतरही आजार असल्याने बहुतांश रुग्णांनी दवाखान्यातच जगाचा निरोप घेतला. परिणामी, जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोनाबाधित मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन न करता वर्ध्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दहा महिन्यांत तब्बल ४७८ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये वर्धा जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, नांदेड, अकोला, भंडारा, बुलडाणा यासह हरियाणा, अदिलाबाद, बालाघाट, बैतुल येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील स्मशानभूमीही कोरोनाकाळात अनेकांसाठी अखेरचा विसावा ठरली आहे.

वाशिमच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू ठरला जिल्ह्यात पहिला जिल्ह्यात १० मे रोजी आर्वी तालुक्यातील हिवरातांडा येथील महिला रुग्णाचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या तारखेला पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत गेली. २९ मे २०२० ला वाशिम येथील कोरोनाबाधिताचा वर्ध्यात मृत्यू झाला. हा पहिला मृत्यू ठरल्याने शहरातील स्मशानभूमीत या पहिल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर १० मार्च २०२१ पर्यंत ४७८ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. यापैकी ३७१ मृत रुग्ण हे वर्धा जिल्ह्यातील असून इतर बाहेर जिल्ह्यांतील आहेत. 

येथे नि:शुल्क सेवावर्धा नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील स्मशानभूमीचे काम सांभाळले जाते. येथे कोरोनाबाधित मृतदेहांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेसात मन लाकूड, ५० गोवऱ्या, साडेपाच लीटर डिझेल आणि हमाली चार्ज असा ३ हजार १२० रुपयांचा खर्च येतो. हा सर्व खर्च पालिका करित आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शहरातील मुख्य स्मशानभूमीत नि:शुल्क अंत्यसंस्कार केले जात आहेत. याचा खर्च सुुरुवातीला नगरपालिकेच्या फंडातून केला जात होता. पण, शासनाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यापासून नगरपालिकेला मिळणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजातून तो खर्च भागविला जात आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची पूर्ण व्यवस्था या स्मशानभूमीमध्ये करण्यात आली आहे. येथे कोणतीही अडचण येणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.- विपीन पालिवाल,मुख्याधिकारी, न.प. वर्धा 

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर याच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. येथे कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेचारशेपेक्षा अधिक अंत्यसंस्कार झाले आले. मृतदेह येणार असल्याची माहिती मिळताच सर्व साहित्य तयार ठेवले जाते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. यादरम्यान परिवारातील सदस्यांच्याही काही ईच्छा पूर्ण करावी लागतात.- दिलीप कुथे, कर्मचारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या