शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ओबीसींवर नजर, मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागणार? विस्ताराकडे लागल्या नजरा

By रवींद्र चांदेकर | Updated: June 18, 2024 17:07 IST

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?

पॉलिटिकल वाॅर: रवींद्र चांदेकर

वर्धा : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर पक्षात ‘विचारमंथना’ला जोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा भाजपला फटका बसल्याचे निष्कर्ष काढले जात आहेत. त्यामुळे भाजपने आता ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे. त्यातून संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या ओबीसी आमदारांना सामावून घेतले जाण्याचे संकेत आहेत. यात विदर्भातून अकोल्याचे रणधीर सावरकर आणि वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने भाजपच्या पहेलवानाचा पराभव केला. या पराभवाचे चिंतन करण्यासाठी मुंबईत भाजपने बैठकी घेतल्या. पराभवाचे ‘आत्मचिंतन’ सुरू केले. ९ जूनला भाजप आमदारांच्या बैठकीनंतर १४ जूनला मुंबईत पराभूत उमेदवार, भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत भाजपच्या पराभवाचे कारण काय, आपण का हरलो, यावर चर्चा करून कोणते मुद्दे पराभवास कारणीभूत ठरले, यावर विचारमंथन करण्यात आले.

या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा कितपत फटका बसला, यावरही सांगोपांग चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाज पक्षापासून दुरावू नये म्हणून खास ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय झाल्याचेही समजते. ओबीसी समाजाला पक्षासोबत मोठ्या प्रमाणात जुळवून ठेवण्यासाठी भाजप ओबीसी आमदारांना जादा ताकद देणार असल्याची माहिती आहे.

पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. या विस्तारात शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना सामावून घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या जादा आमदारांना मंत्रिमंडळात सामावून न घेता केवळ त्यांच्यात मंत्रिपदांची अदलाबदल होणार असल्याचेही सांगण्यात येते. शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचे सांगितले जाते. त्यात भाजपने ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित करून ओबीसी आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक १०५ आमदार आहेत, हे विशेष.

भाजपने ओबीसी आमदारांना मंत्रिपदाची संधी दिल्यास अकोल्यातून रणधीर सावरकर आणि वर्धेतून डॉ. पंकज भोयर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वर्धा जिल्ह्यात चारपैकी भाजपचे तीन आमदार आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कुणालाच मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांकरिता का होईना, एखाद्या आमदाराला मंत्रिपद मिळावे, अशी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही अपेक्षा आहे.

मंत्रिपद ठरणार औट घटकेचे

जिल्ह्यातून कुणालाही मंत्रिपदाची लॉटरी लागली तरी त्यांचे मंत्रिपद औट घटकेचे ठरणार आहे. येत्या ऑक्टोबरअखेरीस विधानसभा निवडणूक हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आदर्श आचारसंहिता लागू हाेईल. आता जून महिन्याच्या संपण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणालाही मंत्रिपदाची लॉटरी लागल्यास नवीन मंत्र्यांना केवळ जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे काही दिवस, असे एकूण केवळ अडीच महिने काम करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, अडीच महिने का होईना त्यांना लाल दिवा घेऊन मिरविता येणार आहे.

पक्ष निरीक्षकांचा अहवाल ठरणार महत्त्वाचा

भाजपने लोकसभेतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी आमदार प्रवीण दटके यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून २२ जूनपूर्वी प्रदेशाध्यक्षांना अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, लोकसभेत विजयी उमेदवाराला वर्धा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतांची आघाडी मिळाली होती. ही बाब आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. पक्ष निरीक्षक आपल्या अहवालात नेमक्या कोणत्या बाबी ‘हायलाईट’ करतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यांचा अहवाल सकारात्मक असल्यास ओबीसी प्रवर्गातील तरुण चेहरा म्हणून डॉ. भोयर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाOBCअन्य मागासवर्गीय जाती