शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ पेक्षाही भाजपाची सद्यस्थिती भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:27 IST

काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हा काँग्रेसकडून ही लाट असल्याची भावना व्यक्त होत होती. त्यानंतर विधानसभेत दणदणीत यश मिळवून भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. तेव्हाही काँग्रेसकडून लाट ओसरली नसल्याचे बोलल्या जात होते. परंतु दरम्यानच्या बहुतांश निवडणुकीत भाजपाने निर्विवाद सत्ता काबीज केली. त्यामुळे सध्यस्थितीत भारतीय जनता पार्टीची स्थिती २०१४ च्या स्थितीपेक्षाही भक्कम आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.आगामी निवडणुकींच्या तयारीकरिता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी वर्ध्यात आले होते. त्यांनी पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे म्हणाले की, २०१४ नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले आहेत. जवळपास ५ हजार सरपंच आहेत, ८१ नगर पालिका भाजपाच्या ताब्यात आहे. १५ महानगर पालिका तर १२ जिल्हा परिषदांवर भाजपाचे वर्चस्व आहेत. एखादी पोटनिवडणूक सोडली तर बाकींवर भाजपानेच मोहोर उमटविली आहे. आम्ही अजेंड्याच्या बाहेर जावूनही अनेक विकासात्मक कामे केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला भरघोष यश मिळेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, आ. रामदास आंबटकर, आमदार अरुण अडसड, आ समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने दादाराव केचे यांची उपस्थिती होती.एक बुथ, २५ युथ ही संकल्पनापक्ष बांधणीकरिता राज्यातील २८८ मतदार संघामध्ये २८८ पुर्णवेळ विस्तारक नेमले आहे.कार्यकर्त्यांना एकत्र करुन बुथची बांधणी करण्यात आली आहे. राज्यात ९२ हजार ४०० बुथची बांधणी करण्यात आली आहे. ८८ हजार बुथ प्रमुखांची नेमणूक करुन त्या बुथ प्रमुखाने पन्ना प्रमुख नेमले आहेत. एका बुथवर जवळपास १६ ते १७ पान असून एका पन्ना प्रमुखाला एक पान दिले जाणार आहेत. त्यावर ६० जणांची नावे असून त्या पन्ना प्रमुखाला निवडणूकीपर्यंत या सर्वांना भेटी द्यायच्या आहे.‘एक बुथ, २५ युथ’ ही संकल्पना राबवून निवडणूकीची तयारी सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.लोकसभानिहाय दौरा करणारआगामी निवडणूकींचा विचार करुनच राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्यासोबत जालना, संभाजीनगर व मावळचा दौरा केल्यानंतर शनिवारला गडचिरोली व चंद्रपूर तर रविवारी वर्धा व यवतमाळ आणि सोमवारी अमरावती व रामटेक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचीही तयार करुन घेणार असल्याचे सांगितले.वेगळ्या विदर्भाबाबत अस्पष्ट भूमिकासत्तेत येताच विदर्भ वेगळा देण्याची घोषणा भाजपाने केली होती. आता सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरीही वेगळ्या विदर्भाचा प्रश्न प्रलंबीतच असल्याने वेगळ्या विदर्भाबाबत दानवे यांना पक्षाची भूमिका विचारली असता त्यांनी अटलबिहारींच्या काळात छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड हे राज्य वेगळे केले तेव्हा नागरिकांनी पेढे वाटले. पण, काँग्रेसने तेलंगणा राज्य वेगळे केले तर गोळ्या खाव्या लागल्या.त्यामुळे राज्याच्या विभाजनाकरिता सर्वांचं एकमत आवश्यक आहे, असे सांगितल्याने वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची भूमिका अद्यापही अस्पष्ट असल्याचे दिसून येते. भाजप नेहमीच छोट्या राज्याच्या समर्थनात राहिलेला आहे असेही ते म्हणाले.