शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

२०१४ पेक्षाही भाजपाची सद्यस्थिती भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:27 IST

काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हा काँग्रेसकडून ही लाट असल्याची भावना व्यक्त होत होती. त्यानंतर विधानसभेत दणदणीत यश मिळवून भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. तेव्हाही काँग्रेसकडून लाट ओसरली नसल्याचे बोलल्या जात होते. परंतु दरम्यानच्या बहुतांश निवडणुकीत भाजपाने निर्विवाद सत्ता काबीज केली. त्यामुळे सध्यस्थितीत भारतीय जनता पार्टीची स्थिती २०१४ च्या स्थितीपेक्षाही भक्कम आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.आगामी निवडणुकींच्या तयारीकरिता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी वर्ध्यात आले होते. त्यांनी पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे म्हणाले की, २०१४ नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले आहेत. जवळपास ५ हजार सरपंच आहेत, ८१ नगर पालिका भाजपाच्या ताब्यात आहे. १५ महानगर पालिका तर १२ जिल्हा परिषदांवर भाजपाचे वर्चस्व आहेत. एखादी पोटनिवडणूक सोडली तर बाकींवर भाजपानेच मोहोर उमटविली आहे. आम्ही अजेंड्याच्या बाहेर जावूनही अनेक विकासात्मक कामे केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला भरघोष यश मिळेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, आ. रामदास आंबटकर, आमदार अरुण अडसड, आ समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने दादाराव केचे यांची उपस्थिती होती.एक बुथ, २५ युथ ही संकल्पनापक्ष बांधणीकरिता राज्यातील २८८ मतदार संघामध्ये २८८ पुर्णवेळ विस्तारक नेमले आहे.कार्यकर्त्यांना एकत्र करुन बुथची बांधणी करण्यात आली आहे. राज्यात ९२ हजार ४०० बुथची बांधणी करण्यात आली आहे. ८८ हजार बुथ प्रमुखांची नेमणूक करुन त्या बुथ प्रमुखाने पन्ना प्रमुख नेमले आहेत. एका बुथवर जवळपास १६ ते १७ पान असून एका पन्ना प्रमुखाला एक पान दिले जाणार आहेत. त्यावर ६० जणांची नावे असून त्या पन्ना प्रमुखाला निवडणूकीपर्यंत या सर्वांना भेटी द्यायच्या आहे.‘एक बुथ, २५ युथ’ ही संकल्पना राबवून निवडणूकीची तयारी सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.लोकसभानिहाय दौरा करणारआगामी निवडणूकींचा विचार करुनच राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्यासोबत जालना, संभाजीनगर व मावळचा दौरा केल्यानंतर शनिवारला गडचिरोली व चंद्रपूर तर रविवारी वर्धा व यवतमाळ आणि सोमवारी अमरावती व रामटेक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचीही तयार करुन घेणार असल्याचे सांगितले.वेगळ्या विदर्भाबाबत अस्पष्ट भूमिकासत्तेत येताच विदर्भ वेगळा देण्याची घोषणा भाजपाने केली होती. आता सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरीही वेगळ्या विदर्भाचा प्रश्न प्रलंबीतच असल्याने वेगळ्या विदर्भाबाबत दानवे यांना पक्षाची भूमिका विचारली असता त्यांनी अटलबिहारींच्या काळात छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड हे राज्य वेगळे केले तेव्हा नागरिकांनी पेढे वाटले. पण, काँग्रेसने तेलंगणा राज्य वेगळे केले तर गोळ्या खाव्या लागल्या.त्यामुळे राज्याच्या विभाजनाकरिता सर्वांचं एकमत आवश्यक आहे, असे सांगितल्याने वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची भूमिका अद्यापही अस्पष्ट असल्याचे दिसून येते. भाजप नेहमीच छोट्या राज्याच्या समर्थनात राहिलेला आहे असेही ते म्हणाले.