शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

२०१४ पेक्षाही भाजपाची सद्यस्थिती भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:27 IST

काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हा काँग्रेसकडून ही लाट असल्याची भावना व्यक्त होत होती. त्यानंतर विधानसभेत दणदणीत यश मिळवून भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. तेव्हाही काँग्रेसकडून लाट ओसरली नसल्याचे बोलल्या जात होते. परंतु दरम्यानच्या बहुतांश निवडणुकीत भाजपाने निर्विवाद सत्ता काबीज केली. त्यामुळे सध्यस्थितीत भारतीय जनता पार्टीची स्थिती २०१४ च्या स्थितीपेक्षाही भक्कम आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.आगामी निवडणुकींच्या तयारीकरिता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी वर्ध्यात आले होते. त्यांनी पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे म्हणाले की, २०१४ नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले आहेत. जवळपास ५ हजार सरपंच आहेत, ८१ नगर पालिका भाजपाच्या ताब्यात आहे. १५ महानगर पालिका तर १२ जिल्हा परिषदांवर भाजपाचे वर्चस्व आहेत. एखादी पोटनिवडणूक सोडली तर बाकींवर भाजपानेच मोहोर उमटविली आहे. आम्ही अजेंड्याच्या बाहेर जावूनही अनेक विकासात्मक कामे केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला भरघोष यश मिळेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, आ. रामदास आंबटकर, आमदार अरुण अडसड, आ समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने दादाराव केचे यांची उपस्थिती होती.एक बुथ, २५ युथ ही संकल्पनापक्ष बांधणीकरिता राज्यातील २८८ मतदार संघामध्ये २८८ पुर्णवेळ विस्तारक नेमले आहे.कार्यकर्त्यांना एकत्र करुन बुथची बांधणी करण्यात आली आहे. राज्यात ९२ हजार ४०० बुथची बांधणी करण्यात आली आहे. ८८ हजार बुथ प्रमुखांची नेमणूक करुन त्या बुथ प्रमुखाने पन्ना प्रमुख नेमले आहेत. एका बुथवर जवळपास १६ ते १७ पान असून एका पन्ना प्रमुखाला एक पान दिले जाणार आहेत. त्यावर ६० जणांची नावे असून त्या पन्ना प्रमुखाला निवडणूकीपर्यंत या सर्वांना भेटी द्यायच्या आहे.‘एक बुथ, २५ युथ’ ही संकल्पना राबवून निवडणूकीची तयारी सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.लोकसभानिहाय दौरा करणारआगामी निवडणूकींचा विचार करुनच राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्यासोबत जालना, संभाजीनगर व मावळचा दौरा केल्यानंतर शनिवारला गडचिरोली व चंद्रपूर तर रविवारी वर्धा व यवतमाळ आणि सोमवारी अमरावती व रामटेक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचीही तयार करुन घेणार असल्याचे सांगितले.वेगळ्या विदर्भाबाबत अस्पष्ट भूमिकासत्तेत येताच विदर्भ वेगळा देण्याची घोषणा भाजपाने केली होती. आता सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरीही वेगळ्या विदर्भाचा प्रश्न प्रलंबीतच असल्याने वेगळ्या विदर्भाबाबत दानवे यांना पक्षाची भूमिका विचारली असता त्यांनी अटलबिहारींच्या काळात छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड हे राज्य वेगळे केले तेव्हा नागरिकांनी पेढे वाटले. पण, काँग्रेसने तेलंगणा राज्य वेगळे केले तर गोळ्या खाव्या लागल्या.त्यामुळे राज्याच्या विभाजनाकरिता सर्वांचं एकमत आवश्यक आहे, असे सांगितल्याने वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची भूमिका अद्यापही अस्पष्ट असल्याचे दिसून येते. भाजप नेहमीच छोट्या राज्याच्या समर्थनात राहिलेला आहे असेही ते म्हणाले.