शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 13:33 IST

पत्रकार परिषदेतून विरोधकांवर साधला निशाणा

वर्धा : गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार फेसबुक लाईव्ह आणि टोमणे सभेमध्येच व्यस्त राहिले. त्यामुळे विकास कामांना मोठी खीळ बसली असून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते असंतुष्ट आहे. त्यामुळे आता त्यांची भाजपामध्ये इनकमिंग सुरू झाली असून भाजपाच्या प्रत्येक बुथवरून अशांचे आम्ही स्वागत करीत आहोत, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती देशभरात साजरी केली जात असून महाराष्ट्रातील ९७ हजार ५०७ बुथवर हा जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान, वैद्यकीय शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम राबविले जात आहे. अजून सात दिवस बाकी असून या दिवसांत दिव्यांगाकरिता वयश्री योजना राबविली जाणार आहे, असे सांगून बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर सडकून टीका केली.

महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये निराशाजनक वातावरण असून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्ध्यातील माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे व कामगार संघटनेचे नेते उमेश अग्निहोत्री यांचाही भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, राजेश बकाने, मिलिंद भेंडे, प्रशांत बुरले, भाजपयुमोचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, अंकुश ठाकूर यांची उपस्थिती होती.

शिंदे-फडणवीस सरकार एकत्र निवडणुका लढणार

महाविकास आघाडीला सोडून भाजपात येणाऱ्यांचा मान सन्मान केला जाईल. आता येत्या अडीच वर्षामध्ये विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी योजना तयार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपा युतीने लढणार असून विजयीही खेचून आणू, अशा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

शासनाने शेतकऱ्यांच्या दु:ख जाणलं - कुणावार

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर निकषाच्या चौकटीबाहेर पडून जिल्ह्याला ३६४ कोटी ६५ लाखांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला. तातडीने खावटीचा निधी देत मोठा आधार दिला. सर्वाधिक निधी हिंगणघाट तालुक्याला मिळाला असून या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख जाणले, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी