शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 13:33 IST

पत्रकार परिषदेतून विरोधकांवर साधला निशाणा

वर्धा : गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार फेसबुक लाईव्ह आणि टोमणे सभेमध्येच व्यस्त राहिले. त्यामुळे विकास कामांना मोठी खीळ बसली असून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते असंतुष्ट आहे. त्यामुळे आता त्यांची भाजपामध्ये इनकमिंग सुरू झाली असून भाजपाच्या प्रत्येक बुथवरून अशांचे आम्ही स्वागत करीत आहोत, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती देशभरात साजरी केली जात असून महाराष्ट्रातील ९७ हजार ५०७ बुथवर हा जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान, वैद्यकीय शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम राबविले जात आहे. अजून सात दिवस बाकी असून या दिवसांत दिव्यांगाकरिता वयश्री योजना राबविली जाणार आहे, असे सांगून बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर सडकून टीका केली.

महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये निराशाजनक वातावरण असून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्ध्यातील माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे व कामगार संघटनेचे नेते उमेश अग्निहोत्री यांचाही भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, राजेश बकाने, मिलिंद भेंडे, प्रशांत बुरले, भाजपयुमोचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, अंकुश ठाकूर यांची उपस्थिती होती.

शिंदे-फडणवीस सरकार एकत्र निवडणुका लढणार

महाविकास आघाडीला सोडून भाजपात येणाऱ्यांचा मान सन्मान केला जाईल. आता येत्या अडीच वर्षामध्ये विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी योजना तयार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपा युतीने लढणार असून विजयीही खेचून आणू, अशा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

शासनाने शेतकऱ्यांच्या दु:ख जाणलं - कुणावार

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर निकषाच्या चौकटीबाहेर पडून जिल्ह्याला ३६४ कोटी ६५ लाखांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला. तातडीने खावटीचा निधी देत मोठा आधार दिला. सर्वाधिक निधी हिंगणघाट तालुक्याला मिळाला असून या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख जाणले, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी