शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 13:33 IST

पत्रकार परिषदेतून विरोधकांवर साधला निशाणा

वर्धा : गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार फेसबुक लाईव्ह आणि टोमणे सभेमध्येच व्यस्त राहिले. त्यामुळे विकास कामांना मोठी खीळ बसली असून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते असंतुष्ट आहे. त्यामुळे आता त्यांची भाजपामध्ये इनकमिंग सुरू झाली असून भाजपाच्या प्रत्येक बुथवरून अशांचे आम्ही स्वागत करीत आहोत, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती देशभरात साजरी केली जात असून महाराष्ट्रातील ९७ हजार ५०७ बुथवर हा जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान, वैद्यकीय शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम राबविले जात आहे. अजून सात दिवस बाकी असून या दिवसांत दिव्यांगाकरिता वयश्री योजना राबविली जाणार आहे, असे सांगून बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर सडकून टीका केली.

महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये निराशाजनक वातावरण असून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्ध्यातील माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे व कामगार संघटनेचे नेते उमेश अग्निहोत्री यांचाही भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, राजेश बकाने, मिलिंद भेंडे, प्रशांत बुरले, भाजपयुमोचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, अंकुश ठाकूर यांची उपस्थिती होती.

शिंदे-फडणवीस सरकार एकत्र निवडणुका लढणार

महाविकास आघाडीला सोडून भाजपात येणाऱ्यांचा मान सन्मान केला जाईल. आता येत्या अडीच वर्षामध्ये विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी योजना तयार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपा युतीने लढणार असून विजयीही खेचून आणू, अशा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

शासनाने शेतकऱ्यांच्या दु:ख जाणलं - कुणावार

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर निकषाच्या चौकटीबाहेर पडून जिल्ह्याला ३६४ कोटी ६५ लाखांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला. तातडीने खावटीचा निधी देत मोठा आधार दिला. सर्वाधिक निधी हिंगणघाट तालुक्याला मिळाला असून या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख जाणले, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी