शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप संघाने देशात अराजकता माजविली : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 23:19 IST

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देराज्य सरकारवरही केली टिका

लोकमत न्यूज नेटवर्क   वर्धा : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.वर्धा येथील सर्कस ग्राऊंड मैदानावर आयोजित काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी चव्हाण म्हणाले, देशातील सर्वसामान्यांचा पैसा घेवून पंतप्रधानाचे मित्र देश सोडून गेलेत. देशात ४५ हजार शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत आत्महत्या केल्या. महाराष्ट्रावर ५ हजार कोटीचे कर्ज झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक चार वर्षांत उभे राहू शकले नाही. मात्र भाजपाचे दिल्ली येथे आलीशान कार्यालय उभे झाले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहे. चार वर्षांपूर्वी आम्हाला कुठे नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा असे विचारणाºयांना आता महाराष्ट्र कुठे हे विचारण्याची वेळ आली आहे. असे चव्हाण यावेळी म्हणाले.काँग्रेसचा इतिहास बलीदानाचा- गहलोतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा इतिहास हा बलीदानाचा इतिहास आहे. महात्मा गांधींपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी आपले बलीदान दिले. मागील वेळी लोकांना खोटे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या भाजपमुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला सहकार्य करावं असे प्रतिपादन काँग्रेस महासचिव खासदार अशोक गहलोत यांनी सांगितले.लढाई लढण्यासाठी सज्ज व्हा - गुलाबनबी आझादखोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पतनासाठी तिरस्काराविरूद्ध लढाई नव्याने सुरू करावी लागणार आहे. आणि हा संकल्प वर्धा व सेवाग्रामवरूनच आपल्याला करावा लागेल, असे आवाहन काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाबनबी आझाद यांनी केले.करो वा मरो ची लढाई - मल्लीकार्जुन खरगे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात करो आणि मरो चा इशारा दिला होता. आतापुन्हा करो आणि मरोची लढाई करण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. देशातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. दलिताचा आवाज दाबला जात आहे. काँग्रेसने त्यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नोटबंदी निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते, त्यावेळी या सरकारने काँग्रेसची खिल्ली उडविली होती. परंतू आता नोटबंदी फसली हे समोर आले. हिंसाचाराच्या मार्गावर सरकारची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे देशात पुन्हा युपीएचे सरकार विराजमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSewagramसेवाग्राम