शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

भाजप संघाने देशात अराजकता माजविली : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 23:19 IST

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देराज्य सरकारवरही केली टिका

लोकमत न्यूज नेटवर्क   वर्धा : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.वर्धा येथील सर्कस ग्राऊंड मैदानावर आयोजित काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी चव्हाण म्हणाले, देशातील सर्वसामान्यांचा पैसा घेवून पंतप्रधानाचे मित्र देश सोडून गेलेत. देशात ४५ हजार शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत आत्महत्या केल्या. महाराष्ट्रावर ५ हजार कोटीचे कर्ज झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक चार वर्षांत उभे राहू शकले नाही. मात्र भाजपाचे दिल्ली येथे आलीशान कार्यालय उभे झाले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहे. चार वर्षांपूर्वी आम्हाला कुठे नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा असे विचारणाºयांना आता महाराष्ट्र कुठे हे विचारण्याची वेळ आली आहे. असे चव्हाण यावेळी म्हणाले.काँग्रेसचा इतिहास बलीदानाचा- गहलोतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा इतिहास हा बलीदानाचा इतिहास आहे. महात्मा गांधींपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी आपले बलीदान दिले. मागील वेळी लोकांना खोटे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या भाजपमुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला सहकार्य करावं असे प्रतिपादन काँग्रेस महासचिव खासदार अशोक गहलोत यांनी सांगितले.लढाई लढण्यासाठी सज्ज व्हा - गुलाबनबी आझादखोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पतनासाठी तिरस्काराविरूद्ध लढाई नव्याने सुरू करावी लागणार आहे. आणि हा संकल्प वर्धा व सेवाग्रामवरूनच आपल्याला करावा लागेल, असे आवाहन काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाबनबी आझाद यांनी केले.करो वा मरो ची लढाई - मल्लीकार्जुन खरगे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात करो आणि मरो चा इशारा दिला होता. आतापुन्हा करो आणि मरोची लढाई करण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. देशातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. दलिताचा आवाज दाबला जात आहे. काँग्रेसने त्यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नोटबंदी निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते, त्यावेळी या सरकारने काँग्रेसची खिल्ली उडविली होती. परंतू आता नोटबंदी फसली हे समोर आले. हिंसाचाराच्या मार्गावर सरकारची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे देशात पुन्हा युपीएचे सरकार विराजमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSewagramसेवाग्राम