शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:49 IST

गेल्या साडेचार वर्षात युती शासनाने महाराष्ट्रात योजनाचा पाऊस पाडला. योजनांच्या नावावर कोट्यावधी रुपये उभारून त्या माध्यमातून सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण पक्के केले. मात्र, सामान्यांच्या समस्येवर कायम तोडगा काढला नाही.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या साडेचार वर्षात युती शासनाने महाराष्ट्रात योजनाचा पाऊस पाडला. योजनांच्या नावावर कोट्यावधी रुपये उभारून त्या माध्यमातून सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण पक्के केले. मात्र, सामान्यांच्या समस्येवर कायम तोडगा काढला नाही. महाराष्ट्रामध्ये खोट्या थापा मारून सरकार सत्तेवर आहे. कर्जमाफीत सरकार फसले. बोंडअळीचे अनुदान नाही. सर्वच पातळ्यांवर या युती सरकारने सामान्यांची निराशाच केली. हे सरकार घोषणेपलीकडे गेलेच नाही. या खोटारड्या सकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा संकल्प करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी जनसघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा मंगळवारी रात्री आर्वीत दाखल झाल्यानंतर स्थानिक गांधी चौक येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय काँग्रेस कमेटीचे सचिव सुरजेवाला, माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर, डॉ. आशीष देशमुख, नसीम खान, रणजीत कांबळे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी आमदार राजू तिमांडे, शेखर शेंडे, हेमलता मेघे, अ‍ॅड. नंदा पराते, आ. अमर काळे आदी उपस्थित होते. खा. चव्हाण पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा विदर्भाने काँग्रेसने बळ देण्याचे काम केले आहे. युती शासनाने साडेचार वर्षात महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला हे विचारण्याची वेळ आता आली आहे. सरकारचे ३२ हजार कोटी पेक्षा जास्त बजेट झाले आहे. हा महाराष्ट्र अधिक कर्जात बुडविण्याचे पाप हे युती सरकारचे आहे. हे सरकार फेकू सरकार असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. रामाचं नाव घ्या आणि निवडणुका जिंका हा एकच मंत्र सध्या भाजपा सरकार राबवतय आहे. यापासून आता साधव राहण्याची गरज आहे. कार्यक्रमात तळेगाव येथील शिख बांधवांनी खा. अशोक चव्हाण यांना तलवार भेट दिली. तर तालुक्यातील वाठोडा येथील युवा चित्रपट निर्माता गणेश पाटील यांनी निर्मिती केलेल्या ‘तू तिथे असावी’ या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर खरांगणा येथील भाजपाचे पदाधिकारी मनोज सतीजा व दुर्गा काळे यांनी खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी अरूण बाजारे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, आ. यशोमती ठाकूर, आ. डॉ. आशीष देशमुख, आ. नसीम खान, अ‍ॅड. चारूलता टोकस, बालाजी गाडे, सत्यजीत तांबे आदींनी मनोगत व्यक्त केले.निवडणुकीच्या तोंडावर राम आठवतो : अमर काळेशेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर या युती शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निवडणुकीला आल्या की त्यांना राम आठवतो. राम शब्दाचे पक्के होते. रामाचं नाव घेऊन सत्तेवर येणाºयांची रामाच नाव घेण्याची लायकी नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे ‘अबकी बार मोदी सरकार’ तर आता २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकार बस कर यार असा आमचा नारा आहे. या सरकारला निवडणुकीतून धडा शिकविण्याचे आवाहन याप्रसंगी आ. अमर काळे यांनी केले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस