शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

भाजपाने जनतेचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:13 IST

राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे.

ठळक मुद्देतानसेन नंनावरे : पत्रकार परिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे. भाजप सरकारने आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारला आंबेडकरी जनता धडा शिकवेल, असे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन नंनावरे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.तानसेन नंनावरे पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या हाती सत्ता दिली. भाजपाचा संविधान बदलविण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे. हिंदू राष्ट्राला आमचा विरोध नाही; पण ते मनोस्मृतीवर आधारीत नसावे. भाजपा सरकार प्रत्येक जात एक दुसऱ्याच्या विरोधात उभी करीत आहे. २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास संविधान बदलविले जाईल. संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठीशी घालत आहे. ना. रामदास आठवले त्यांच्याकडून आंबेडकरी जनतेचे प्रश्न दिल्ली दरबारी न मांडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तृती करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ना. रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेची दिशाभूलच करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.पुढील २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून त्यावेळी आम्ही वास्तविक परिस्थिती जनतेसमोर ठेवून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम करू. नुकतीच आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली असून वर्धा जिल्ह्यातील काही राजकीय पुढाºयांचीही भेट आम्ही घेणार आहो. वर्धा जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी नव्या जोमाने काम करावे, असेही आवाहन यावेळी तानसेन नंनावरे यांनी केले. पत्रकार परिषदेला नितीन मोरे, आनंद निरभोवणे, अशोक खरात आदींची उपस्थिती होती.संभाजी भिडे यांना राज्यसरकार पाठीशी घालतेयराज्यात काही व्यक्ती राष्ट्रच्या एकात्मतेला धोका पोहोचेल असे कारस्थान करीत आहेत. त्यांना आळा घालण्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असून संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठिशीतच घालत असल्याचा आरोप याप्रसंगी तानसेन नंनावरे यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपा