शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भाजपाने जनतेचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:13 IST

राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे.

ठळक मुद्देतानसेन नंनावरे : पत्रकार परिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे. भाजप सरकारने आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारला आंबेडकरी जनता धडा शिकवेल, असे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन नंनावरे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.तानसेन नंनावरे पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या हाती सत्ता दिली. भाजपाचा संविधान बदलविण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे. हिंदू राष्ट्राला आमचा विरोध नाही; पण ते मनोस्मृतीवर आधारीत नसावे. भाजपा सरकार प्रत्येक जात एक दुसऱ्याच्या विरोधात उभी करीत आहे. २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास संविधान बदलविले जाईल. संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठीशी घालत आहे. ना. रामदास आठवले त्यांच्याकडून आंबेडकरी जनतेचे प्रश्न दिल्ली दरबारी न मांडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तृती करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ना. रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेची दिशाभूलच करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.पुढील २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून त्यावेळी आम्ही वास्तविक परिस्थिती जनतेसमोर ठेवून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम करू. नुकतीच आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली असून वर्धा जिल्ह्यातील काही राजकीय पुढाºयांचीही भेट आम्ही घेणार आहो. वर्धा जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी नव्या जोमाने काम करावे, असेही आवाहन यावेळी तानसेन नंनावरे यांनी केले. पत्रकार परिषदेला नितीन मोरे, आनंद निरभोवणे, अशोक खरात आदींची उपस्थिती होती.संभाजी भिडे यांना राज्यसरकार पाठीशी घालतेयराज्यात काही व्यक्ती राष्ट्रच्या एकात्मतेला धोका पोहोचेल असे कारस्थान करीत आहेत. त्यांना आळा घालण्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असून संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठिशीतच घालत असल्याचा आरोप याप्रसंगी तानसेन नंनावरे यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपा