शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

भाजपाने जनतेचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:13 IST

राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे.

ठळक मुद्देतानसेन नंनावरे : पत्रकार परिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे. भाजप सरकारने आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारला आंबेडकरी जनता धडा शिकवेल, असे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन नंनावरे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.तानसेन नंनावरे पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या हाती सत्ता दिली. भाजपाचा संविधान बदलविण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे. हिंदू राष्ट्राला आमचा विरोध नाही; पण ते मनोस्मृतीवर आधारीत नसावे. भाजपा सरकार प्रत्येक जात एक दुसऱ्याच्या विरोधात उभी करीत आहे. २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास संविधान बदलविले जाईल. संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठीशी घालत आहे. ना. रामदास आठवले त्यांच्याकडून आंबेडकरी जनतेचे प्रश्न दिल्ली दरबारी न मांडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तृती करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ना. रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेची दिशाभूलच करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.पुढील २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून त्यावेळी आम्ही वास्तविक परिस्थिती जनतेसमोर ठेवून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम करू. नुकतीच आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली असून वर्धा जिल्ह्यातील काही राजकीय पुढाºयांचीही भेट आम्ही घेणार आहो. वर्धा जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी नव्या जोमाने काम करावे, असेही आवाहन यावेळी तानसेन नंनावरे यांनी केले. पत्रकार परिषदेला नितीन मोरे, आनंद निरभोवणे, अशोक खरात आदींची उपस्थिती होती.संभाजी भिडे यांना राज्यसरकार पाठीशी घालतेयराज्यात काही व्यक्ती राष्ट्रच्या एकात्मतेला धोका पोहोचेल असे कारस्थान करीत आहेत. त्यांना आळा घालण्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असून संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठिशीतच घालत असल्याचा आरोप याप्रसंगी तानसेन नंनावरे यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपा