शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
2
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
3
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
4
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
5
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
6
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
7
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
8
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 
9
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
10
चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
11
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
12
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
13
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
14
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
15
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
16
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
17
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
18
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
19
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
20
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन

केंद्र सरकारचे ते विधेयक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

दिवे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याला हात न लावता शेतकरी हितार्थ हे विधेयक आहे.

ठळक मुद्देसुधीर दिवे : राजकीय हेतूनेच काँग्रेससह विरोधी पक्ष करताहेत विरोध, मोदी सरकार शेतकरीहितार्थ निर्णय घेणारे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारने शेतकरी हितार्थ आणलेले विधेयक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनाही स्वातंत्र्य देणारेच आहे. पण काँग्रेससह इतर विरोधक राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून संभ्रम पसरवून त्याला विरोध करीत असल्याची टीका आयोजित पत्रकार परिषदेतून भाजपचे महासचिव सुधीर दिवे यांनी केली.दिवे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याला हात न लावता शेतकरी हितार्थ हे विधेयक आहे. पण कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलविणाऱ्या या विधेयकांना काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. या नवीन विधेयकांना कायद्याचे स्वरूप मिळाल्यावर शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना अन्यही पर्याय उपलब्ध होणार आहेत. शिवाय शेतकºयांकडील शेतमाल खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होणार आहे. एकूणच याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. असे असले तरी विरोधकांकडून विविध अफवा पसरविल्या जात आहेत. विधेयकाला कायद्याचे स्वरूप मिळाल्यावर शेतकरी जो पिकवेल त्याबाबत करार होईल. पण शेतजमीन जाणार अशी अफवा पसरविली जात आहे. वास्तविक पाहता निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जे नमुन केले होते त्यापैकी शेतकरी हिताचे असलेले विषय केंद्रातील मोदी सरकार मार्गी लावत आहे. पण या विधेयकांना काँग्रेसही विरोध करीत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे, अविनाश देव, माधव चंदनखेडे, पवन परियाल, राजेश बकाने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारagricultureशेती