शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

केंद्र सरकारचे ते विधेयक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

दिवे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याला हात न लावता शेतकरी हितार्थ हे विधेयक आहे.

ठळक मुद्देसुधीर दिवे : राजकीय हेतूनेच काँग्रेससह विरोधी पक्ष करताहेत विरोध, मोदी सरकार शेतकरीहितार्थ निर्णय घेणारे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारने शेतकरी हितार्थ आणलेले विधेयक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनाही स्वातंत्र्य देणारेच आहे. पण काँग्रेससह इतर विरोधक राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून संभ्रम पसरवून त्याला विरोध करीत असल्याची टीका आयोजित पत्रकार परिषदेतून भाजपचे महासचिव सुधीर दिवे यांनी केली.दिवे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याला हात न लावता शेतकरी हितार्थ हे विधेयक आहे. पण कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलविणाऱ्या या विधेयकांना काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. या नवीन विधेयकांना कायद्याचे स्वरूप मिळाल्यावर शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना अन्यही पर्याय उपलब्ध होणार आहेत. शिवाय शेतकºयांकडील शेतमाल खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होणार आहे. एकूणच याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. असे असले तरी विरोधकांकडून विविध अफवा पसरविल्या जात आहेत. विधेयकाला कायद्याचे स्वरूप मिळाल्यावर शेतकरी जो पिकवेल त्याबाबत करार होईल. पण शेतजमीन जाणार अशी अफवा पसरविली जात आहे. वास्तविक पाहता निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जे नमुन केले होते त्यापैकी शेतकरी हिताचे असलेले विषय केंद्रातील मोदी सरकार मार्गी लावत आहे. पण या विधेयकांना काँग्रेसही विरोध करीत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे, अविनाश देव, माधव चंदनखेडे, पवन परियाल, राजेश बकाने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारagricultureशेती