शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

यंदा सगळ्या नववधूंसमोर उभी आहे 'ही' मोठ्ठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:22 IST

यंदा गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नववधूंना यंदा गुरूपौर्णिमेला आपल्या माहेरी येता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च महिन्यांपासून साधारणत: विवाह समारंभाला सुरुवात होते. जुलै महिन्यात गुरूपौर्णिमा (आखाडीला) नववधू माहेरी येतात. परंतु यंदा गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नववधूंना यंदा गुरूपौर्णिमेला आपल्या माहेरी येता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे माहेरपण यावेळी हिरावले गेले आहे.विदर्भात मार्च ते मे हा लग्नसोहळ्यांचा मोठा हंगाम असतो. यावर्षी याच काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लग्नसमारंभही अडचणीत आले. अशा स्थितीत ग्रामीण व शहरी भागात ५ ते ६ लोकांच्या साक्षीने कौटुंबिक सोहळे उरकविण्यात आले. वर्धा जिल्ह्यात साधारणत: २ हजार लग्न सोहळे याच पध्दतीने पार पडले आहे. याबाबत प्रशासनाची परवानगीही घेण्यात आली. अनेक लग्नसोहळे बाहेर जिल्ह्यात झाले व त्या नववधू सध्या येथे दाखल आहेत. बाहेर जिल्ह्यातील नववधूंना यावर्षी गुरूपोर्णिमेला माहेरी जाणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाबंदी अजूनही हटलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून ई-पास घ्यावी लागते. ई-पास घेणारे बाहेर जिल्ह्यात गेल्यास त्यांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याशिवाय त्यांना येथे येता येणार नाही. या साऱ्या अटी-शर्तीच्या आधारावर नववधूंना आणण्यासाठी माहेरून ही कुणीही जाण्यास धजावत नाही. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात ज्या नववधू आहेत. त्यांना घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य रवाना झाले आहेत. बऱ्याच नववधू लग्न सोहळ्यानंतर नवऱ्याच्या नोकरीच्या गावीही रवाना झाल्या आहेत. पुणे, मुंबई या भागासह राज्याच्या अनेक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठा असल्याने अशा ठिकाणी जाणे धोक्याचे असल्यामुळे त्यांना माहेरील मंडळीही मुलीली घरी आणण्याच्या भानगडीत पडलेले नाहीत. त्यामुळे अनेक नववधू यंदा आखाडीला माहेरी दाखल झालेल्या नाहीत.

जिल्ह्यातील वधू करेल गुरुपौर्णिमा साजरीज्यांचे लग्न यावर्षी लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातच झाले, त्या नववधूंना गुरूपौर्णिमेला माहेरी येणे शक्य होणार आहे. त्यांच्या पालकांनी मुलीला माहेर आणण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाठविले आहे. मात्र, जिल्ह्याबाहेर ज्या नववधू लग्न होऊन गेल्या त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय सोपस्कर करून घरी आणणे अनेकांना शक्य नाही. ग्रामीण भागात बहुतांशी नागरिकांना ऑनलाईन परवानगीची प्रक्रियाही करता येत नाही. त्यामुळे मुलीला गुरूपौर्णिमेसाठी आणता आले नाही, याची खंत त्यांना आहे.

लग्नानंतर मुलगा व सूनबाई दोघेही पुण्याला निघून गेले आहेत. कोरोनाच्या साथीत पुण्यावरून गुरूपौर्र्णिमेसाठी येणे शक्य नसल्याने पुण्यातच गुरूपौर्णिमा साजरी करण्याचा सल्ला आम्ही त्यांना दिला. त्यामुळे सुनेचे माहेरी येणे शक्य होणार नाही.- अविनाश कामडे, म्हाडा कॉलनी.

टॅग्स :Socialसामाजिक