शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

३० वयापर्यंत, कोणतीही नोकरी न करता उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मोठी संधी : अर्ज करा १७ ऑगस्टपूर्वी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:34 IST

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी : 'ज्ञानज्योती' योजनेसाठी अर्ज सुरू

वर्धा : जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेणारे विद्यार्थी वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जाते.

मूलभूत पात्रता आणि शैक्षणिक निकष काय ?योजनेचा लाभ घेण्याकरिता १२वीनंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी पात्र आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जातो.

प्रत्येक जिल्ह्यात जवळपास ६०० विद्यार्थ्यांना लाभइतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रतिविद्यार्थी ६०० याप्रमाणे राज्यातील एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेस डिसेंबर २०२३मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आता जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

...अशा आहेत अटीविद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. या योजनेचा लाभघेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा.

अर्ज कुठे आणि कसा कराल ?शासनाच्या hmas.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवर बीए, बीकॉम, बीएससी अशा १२वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एमए, एमएससी असे पदवीनंतरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) १७ऑगस्ट २०२५पर्यंत अर्ज भरून ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्र संबंधित वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी लागणार आहे. अशी माहिती प्रशासने दिली आहे. 

...ही द्यावी लागतील कागदपत्रेभाड्याने राहात असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी), स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत), कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, भाड्याने राहात असल्याबाबतची भाडे चिठी व भाडे करारपत्र / करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी कागदपत्र अर्जासोबत जोडावीत.

टॅग्स :wardha-acवर्धाEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती