शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

३० वयापर्यंत, कोणतीही नोकरी न करता उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मोठी संधी : अर्ज करा १७ ऑगस्टपूर्वी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:34 IST

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी : 'ज्ञानज्योती' योजनेसाठी अर्ज सुरू

वर्धा : जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेणारे विद्यार्थी वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जाते.

मूलभूत पात्रता आणि शैक्षणिक निकष काय ?योजनेचा लाभ घेण्याकरिता १२वीनंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी पात्र आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जातो.

प्रत्येक जिल्ह्यात जवळपास ६०० विद्यार्थ्यांना लाभइतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रतिविद्यार्थी ६०० याप्रमाणे राज्यातील एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेस डिसेंबर २०२३मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आता जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

...अशा आहेत अटीविद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. या योजनेचा लाभघेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा.

अर्ज कुठे आणि कसा कराल ?शासनाच्या hmas.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवर बीए, बीकॉम, बीएससी अशा १२वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एमए, एमएससी असे पदवीनंतरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) १७ऑगस्ट २०२५पर्यंत अर्ज भरून ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्र संबंधित वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी लागणार आहे. अशी माहिती प्रशासने दिली आहे. 

...ही द्यावी लागतील कागदपत्रेभाड्याने राहात असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी), स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत), कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, भाड्याने राहात असल्याबाबतची भाडे चिठी व भाडे करारपत्र / करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी कागदपत्र अर्जासोबत जोडावीत.

टॅग्स :wardha-acवर्धाEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती