शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारतीय जनता पार्टी अवलंबताहेत ओबीसींचे नुकसान करण्याचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

देशातील ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे धोरण भाजप अवलंबत असून सध्या चोरांचा उलट्या बोंबा होत असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्धा येथील विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रपरिषदेत केली.नाना पटोले पुढे म्हणले, राज्यात फडणवीस सरकार असताना नैसर्गिक पदोन्नती थांबविण्यात आली होती. पण आमचे सरकार आल्यानंतर आम्ही नैसर्गिक म्हणजे सिनॅरिटीप्रमाणे होणारी पदोन्नतीवर सकारात्मक विचार करून त्यावर कृती केली.

ठळक मुद्देनाना पटोले : पत्रपरिषदेतून विरोधकांवर केला हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर जि.प. निवडणुकी २०१७ मध्ये आल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक परिपत्रक पुढे करून निवडणुकाचा थांबविल्या. शिवाय पदाचा गैरवापर करून प्रशासक न नेमता जिल्हा परिषदेतील बॉडीला मुदतवाढ दिली. इतकेच नव्हे तर ओबीसींच्या भरोश्यावर भाजपने राज्यात सत्ता भोगली तसेच केंद्रात सत्ता आहे. देशातील ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे धोरण भाजप अवलंबत असून सध्या चोरांचा उलट्या बोंबा होत असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्धा येथील विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रपरिषदेत केली.नाना पटोले पुढे म्हणले, राज्यात फडणवीस सरकार असताना नैसर्गिक पदोन्नती थांबविण्यात आली होती. पण आमचे सरकार आल्यानंतर आम्ही नैसर्गिक म्हणजे सिनॅरिटीप्रमाणे होणारी पदोन्नतीवर सकारात्मक विचार करून त्यावर कृती केली. काल-परवा देण्यात आलेल्या पदोन्नत्या आम्ही सिनॅरिटीप्रमाणे दिल्या आहेत. आरक्षणावरून पदोन्नतीचा विषय सर्वाेच्च न्यायालयात आहे. घटनात्मक अधिकारी अबाधित राहिले पाहिजे ही काँग्रेसची तसेच महाविकास आघाडी सरकारची भूमिका असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. अभिजीत वंजारी, माजी आमदार अमर काळे, अतुल लोंढे, रविंद्र दरेकर, मनोज चांदूरकर, शेखर शेंडे आदींची उपस्थिती होती.

२०२४ मध्ये काँग्रेसचा गड कायम ठेऊवर्धा हा काँग्रेसचा गड असून तो सध्या काँग्रेसच्या हाती नसला तरी २०२४ च्या निवडणुकीत कसा परत मिळविता येईल यासाठी पुर्ण ताकदीनिशी प्रयत्न होईल. शिवाय राज्यातील प्रत्येक शासकीय प्राथमिक आरोग्य डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचे याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मोदी सरकारने ६ लाख कोंटीचे रस्ते विकलेदोन कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारने सध्या खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. रस्ते विकासाराच्या नावाखाली सध्या केंद्रातील माेदी सरकार १८ रुपये आकारत आहे. शिवाय काही खासगी कंपन्यांना करार तत्वावर रस्ते देण्यात आले आहेत. मोदी सरकारने सहा लाख कोटींचे रस्ते खासगी कंपन्यांना विकल्याची टिका केली.

मराठा समाजाला आरक्षण द्या : पटोलेंना साकडे हिंगणघाट : मराठा समाज, हिंगणघाट व शिवकल्याण मराठा ब्रिगेडच्यावतीने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच हिंगणघाट शहरातील असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी त्याठिकाणी पोलीस गस्त देण्यात यावी. तसेच या उद्यानाचे सौदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. उद्यानात समाजातील गोर गरीब मुलींचे, मुलाचे लग्न व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उद्यानात समाज मंदीराची निर्मिती आदींचा समावेश होता. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन देताना शिवकल्याण मराठा ब्रिगेड अध्यक्ष अक्षय निकम, अमित गावंडे, अक्षय भांडवलकर, प्रविण काळे, अक्षय गायकवाड, अक्षय निकम, अभिजित शिंगारे, आदित्य पालांडे आदींची उपस्थिती होती. सदर विषयी आपण पाठपुरवा करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले