शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

निवृत्तिवेतनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना लाभ; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:52 IST

Wardha : निवृत्तिवेतनधारकांकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. तसेच त्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीलादेखील पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र, आता कौटुंबिक परिवर्तनानुसार केंद्र सरकारने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील गरजू महिलांच्या आर्थिक उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत. या निर्णयाचे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

नवीन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य, घटस्फोटित महिला, विधवा मुलगी, तसेच मानसिक किंवा शारीरिक दिव्यांग असलेल्या, व्याधिग्रस्त असलेल्या कुटुंबातील सदस्यांना कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणार आहेत. हा दूरगामी निर्णय राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक व वित्तीय स्थिरतेसाठी घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वस्तरातुन स्वागत करण्यात येत आहे. 

कुणाला मिळेल लाभ सध्याच्या सुधारित योजनेत या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त शाळा, कृषी विद्यापीठे आणि त्याच्यासोबत संलग्नित असलेल्या अशासकीय संस्थांतील कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

आधीची कार्यपद्धती आता केलेले बदल पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या अविवाहित मुलींना २४ वर्षापर्यंत किंवा तिच्या विवाहापर्यंत कुटुंब निवृत्तिवेतन दिले जात होते. तसेच शारीरिक, मानसिक विकलांग असलेल्या पाल्यांना मृत्यूपर्यंत कुटुंब निवृत्तिवेतन मिळत होते. आता मात्र केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित, किंवा विधवा असेल, आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम नसेल तर त्या मुलीला कुटुंब सेवानिवृत्तिवेतन मिळण्याचा अधिकार प्राप्त होईल.

"आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनची आवश्यकता असते. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यासाठी शासन व प्रशासनात योग्य समन्वय असणे गरजेचे आहेत. सेवानिवृत्त होताच कर्मचाऱ्यांना त्याची संपूर्ण रक्कम मिळणे आवश्यक आहेत. मात्र, हे तूर्तास होताना दिसून येत नाही." - मनोज त्रि. सवाई, सेवानिवृत्त.

"लोकशाही व्यवस्थेचा प्रशासकीय गाडा व्यवस्थितपणे इमानेइतबारे हाकणारा आमचा कर्मचारी बांधव असतो, विशेषतः देशाची उज्ज्वल व भावी पिढी घडविणारा शिक्षक देशाचा आधारस्तंभ आहेत. त्यामुळे या घटकाकडे शासनाने विशेष लक्ष देऊन, जुनी पेन्शन कायदा लागू करावा, २००५च्या नंतर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असे मला वाटते." - अरुण म. कहारे, सेवानिवृत्त

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनwardha-acवर्धा