शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिवेतनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना लाभ; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:52 IST

Wardha : निवृत्तिवेतनधारकांकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. तसेच त्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीलादेखील पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र, आता कौटुंबिक परिवर्तनानुसार केंद्र सरकारने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील गरजू महिलांच्या आर्थिक उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत. या निर्णयाचे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

नवीन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य, घटस्फोटित महिला, विधवा मुलगी, तसेच मानसिक किंवा शारीरिक दिव्यांग असलेल्या, व्याधिग्रस्त असलेल्या कुटुंबातील सदस्यांना कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणार आहेत. हा दूरगामी निर्णय राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक व वित्तीय स्थिरतेसाठी घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वस्तरातुन स्वागत करण्यात येत आहे. 

कुणाला मिळेल लाभ सध्याच्या सुधारित योजनेत या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त शाळा, कृषी विद्यापीठे आणि त्याच्यासोबत संलग्नित असलेल्या अशासकीय संस्थांतील कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

आधीची कार्यपद्धती आता केलेले बदल पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या अविवाहित मुलींना २४ वर्षापर्यंत किंवा तिच्या विवाहापर्यंत कुटुंब निवृत्तिवेतन दिले जात होते. तसेच शारीरिक, मानसिक विकलांग असलेल्या पाल्यांना मृत्यूपर्यंत कुटुंब निवृत्तिवेतन मिळत होते. आता मात्र केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित, किंवा विधवा असेल, आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम नसेल तर त्या मुलीला कुटुंब सेवानिवृत्तिवेतन मिळण्याचा अधिकार प्राप्त होईल.

"आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनची आवश्यकता असते. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यासाठी शासन व प्रशासनात योग्य समन्वय असणे गरजेचे आहेत. सेवानिवृत्त होताच कर्मचाऱ्यांना त्याची संपूर्ण रक्कम मिळणे आवश्यक आहेत. मात्र, हे तूर्तास होताना दिसून येत नाही." - मनोज त्रि. सवाई, सेवानिवृत्त.

"लोकशाही व्यवस्थेचा प्रशासकीय गाडा व्यवस्थितपणे इमानेइतबारे हाकणारा आमचा कर्मचारी बांधव असतो, विशेषतः देशाची उज्ज्वल व भावी पिढी घडविणारा शिक्षक देशाचा आधारस्तंभ आहेत. त्यामुळे या घटकाकडे शासनाने विशेष लक्ष देऊन, जुनी पेन्शन कायदा लागू करावा, २००५च्या नंतर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असे मला वाटते." - अरुण म. कहारे, सेवानिवृत्त

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनwardha-acवर्धा