शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची पाण्यामुळे वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:25 IST

धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्याने शेतशिवार जलमय झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील नांदोरा (डफरे), दिघी (बोपापूर) व सोनेगाव (बाई) या नदीकाठच्या गावांना बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्याने शेतशिवार जलमय झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील नांदोरा (डफरे), दिघी (बोपापूर) व सोनेगाव (बाई) या नदीकाठच्या गावांना बसला.दिघी (बोपापूर) रसत्यावरील यशोदा नदी व बाजूचा नाला जलमय झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. नदीचा व नाल्याचे पाणी एक झाल्याने शाळेकरी मुले आणि नागरिक पुरात अडकले होते. तसेच सोनेगाव (बाई) मार्गावरील नाल्याच्या पुरामुळे वाहतूक बंद झाली होती. चार पदरी रस्ता व पुलाचे बांधकाम उंच असल्याने शिरपूर गावात पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग नसल्याने अनेकांच्या घरात दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे. धान्य व संसारोपयोगी साहित्य भिजल्याने संध्याकाळच्या जेवनाचा प्रश्न निर्माण झाला. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला.अनेकांचे बांधकाम अर्धवट असल्याने त्यांनी प्लास्टीकचा कागद आंथरुन संसार थाटला होता. काहींनी आजुबाजुच्या घरांचा आसरा घेवून तर काही किरायाचे घरात दिवस काढत आहे.या योजनेअंतर्गत देवळीत आठशे घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. परंतु बºयाच लाभार्थ्यांना निधीचे हप्ते मिळाले नसल्याने घरकुलाचे काम रखडले आहे. अशा लाभार्थ्यांची या पावसामुळे चांगलीच वाताहत झाली.पुलगाव ते कळंब मार्ग बंदनाचणगाव- दोन दिवसापासून संततधार पावसाने परिसराला झोडपून काढले. त्यामुळे पुलगाव ते कळंब मार्गावरील सोनोरा फाटा येथील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या पावसामुळे सर्वत्र नाले धो-धो वाहायला सुरुवात झाली. सध्या शेतातील कामांनाही ब्रेक लागला असल्याने शेतमजूर घरीच आहे. परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक बाहेरगावावरुन ये-जा करतात. आज संततधार पाऊस असल्याने पुरामुळे अनेक शिक्षक शाळेत पोहोचलेच नाही. त्यांना नाल्याचा पूर पाहूनच परत जावे लागले.

टॅग्स :Rainपाऊस