शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

कांदा चाळीचे तोकडे अनुदान तरीही लाभार्थ्यांना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST

शासनाकडून अनुदानावर आधारित अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांच्या लाभाकरिता लाभार्थ्याला आधी स्वत: पूर्ण खर्च करावा लागतो. मग अनुदान दिले जाते. यामुळे बरेच शेतकरी अशा योजनांच्या लाभापासून दूर पळतात. जे शेतकरी या योजनेत सहभागी होऊन उसनवारी किंवा कर्ज काढून काम पूर्ण करून घेतात. मात्र, काम पूर्ण झाल्यावरही अनुदानाच्या रकमेकरिता त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. 

फनिंद्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाच्या कांदा चाळ योजनेतून बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीचे बांधकाम केले. यासाठी साधारणत: दोन लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. पण, त्याकरिता मिळणारे अनुदान केवळ ८७ हजार ५०० रुपये आहे. परंतु, आता वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.शासनाकडून अनुदानावर आधारित अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांच्या लाभाकरिता लाभार्थ्याला आधी स्वत: पूर्ण खर्च करावा लागतो. मग अनुदान दिले जाते. यामुळे बरेच शेतकरी अशा योजनांच्या लाभापासून दूर पळतात. जे शेतकरी या योजनेत सहभागी होऊन उसनवारी किंवा कर्ज काढून काम पूर्ण करून घेतात. मात्र, काम पूर्ण झाल्यावरही अनुदानाच्या रकमेकरिता त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. अशीच स्थिती सध्या कांदा चाळीच्या लाभार्थ्यांची झाली आहे. आर्वी तालुक्यामध्ये १००पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कांदा चाळ बांधली. आता बांधकाम पूर्ण होऊन सहा ते सात महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अनुदान मिळालेले नाही. कृषी विभागाकडून मार्च अखेरपर्यंत अनुदान मिळेल, असे आश्वासन मिळाले होते. आता मे महिना सुरू झाला तरी अनुदानाचा पत्ता नाही. कृषी विभाग केवळ योजना थोपविण्याचे काम करून कागद काळे करतो. पण, शेतकरी मात्र अनुदानाअभावी कंगाल होत असल्याची जाणीव त्यांना नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे तातडीने अनुदान बँक खात्यात जमा करण्याची मागणी होत आहे. आता शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

महागाईमुळे बांधकाम खर्चही वाढला-    राज्य शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून विदर्भात कांदा चाळ योजना मोठ्या प्रमाणात राबवली. या योजनेतून १५ बाय ४० चौरस फूट कांदा चाळ बांधण्यासाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च येईल. त्यापैकी ८७ हजार ५०० रुपये अनुदान मिळेल, असे सांगण्यात आले होते. पण, वाढत्या महागाईमुळे स्टील, सिमेंट, वाळू, गिट्टी व मजुरी वाढल्याने बांधकाम खर्च दोन लाखाच्यावर गेला. इतकेच नाही तर बांधकाम पूर्ण झाल्यावरही अनुदान मिळाले नाही.

खरिपाच्या तयारीत येताहेत अडथळे-    शेतकऱ्यांनी अनुदान मिळेल म्हणून खरिपाच्या बी-बियाणे व खतासाठी हाताशी ठेवलेले पैसे कांदा चाळीच्या बांधकामासाठी वापरले. त्यामुळे लाभार्थी आता अनुदानाची वाट बघत आहे. शासनाकडून अनुदान मिळाले नाही तर खरिपाचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने अनुदान वितरित करून शेतकऱ्यांची विवंचनेतून मुक्तता करण्याची मागणी होत आहे. 

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी