शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी दर ९३.०७ टक्क्यांवर; चोवीस तासांत नवीन ५७ रुग्ण दाखल

By महेश सायखेडे | Updated: October 7, 2023 16:46 IST

२६९ रुग्णांवर होताहेत उपचार

वर्धा : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा १५ ऑगस्टपासून मोफत करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत तिप्पटीनेच वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील सोई-सुविधांचा शनिवारी रिॲलटी चेक केला असता जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी तब्बल ९३.०७ टक्के इतकी असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल २६९ विविध आजारांच्या रुग्णांना उपचार दिले जात होते. विशेष म्हणजे मागील २४ तासांत जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५७ रुग्णांना दाखल करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरी जिल्हा रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्णाला उत्तम शासकीय आरोग्य सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न कार्यरत डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

दहा रुग्णांना केले रेफर आऊटमागील २४ तासांत जिल्हा रुग्णालयात ५७ नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. यात पाच रेफरीन रुग्णांचा समावेश आहे. मागील २४ तासांचा विचार केल्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तब्बल दहा रुग्णांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम, सावंगी (मेघे) तसेच नागपूर येथील रुग्णालयात रेफर आऊट करण्यात आले आहे.आयसीयूत सात तर चाईल्ड वॉर्डात तेरा रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. चाईल्ड वॉर्डात सध्या तेरा रुग्ण दाखल असून मागील २४ तासांत एका छोट्या मुलाला पुढील उपचारासाठी रेफर आऊट करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात सुसज्य असा अतिदक्षता विभाग आहे. या विभागात सध्या सात रुग्ण असून त्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

एसएनसीयूमध्ये अठरा नवजात बालकांवर होताहेत उपचार

नवजात बालकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या हेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्य असा एसएनसीयू कक्ष तयार करण्यात आला आहे. या विभागात सध्या १८ नवजात बालके दाखल असून गत चोवीस तासांत सेलू येथून रेफर आऊट केलेल्या एका नवजात बालकाला जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये दाखल करून घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.एकाचा झाला मृत्यू

पुलगाव नजीकच्या विरुळ येथून पुढील उपचारासाठी रेफर आऊट केल्यानंतर एका ५४ वर्षीय पुरुषाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दारूपिण्याच्या सवईचा आणि जंतू संसर्ग झालेल्या या रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबाबतची नोंद रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल