शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बी.ई. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोळ

By admin | Updated: September 22, 2014 23:25 IST

अभियांत्रिकीतील काही विद्यार्थ्यांना सत्र २०१२-१३ मधील शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयात तक्रार दिली. वारंवार चकरा मारल्या

वर्धा : अभियांत्रिकीतील काही विद्यार्थ्यांना सत्र २०१२-१३ मधील शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयात तक्रार दिली. वारंवार चकरा मारल्या पण विभागाकडून विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली तर काहींना अद्याप शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. याची चौकशी करून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी ए.आय.एस.बी. यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनानुसार, समाजकल्याण कार्यालयातील शिष्यवृत्ती विभागाकडून तक्रारीची दखल घेतली जात नाही. वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ असतात. यामुळे समस्या कायम असून तक्रार करुन विद्यार्थी त्रस्त झाले आहे. तक्रार करण्यास गेले असता कार्यालयातील कर्मचारी टोलवाटोलवी करतात. तुम्ही कॉलेज मध्ये विचारा असे सांगितले जाते. विद्यार्थी याची विचारणा कॉलेजमध्ये करतात तर त्यांना समाजकल्याण येथे जाण्यास सांगितले जाते. सततच्या हेलपाटामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. तर काही विद्यार्थ्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली. या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी आॅल इंडिया स्टुडंट ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण सहआयुक्त देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. काही विद्यार्थ्यांना दोन, तिनदा शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे अन्य विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे ज्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली त्यांच्या खात्यातील रक्कम वळती करणे शक्य नाही. मात्र वंचित विद्यार्थ्यांकरिता वेगळ्या निधीची तरतूद करण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली. यासह एकाच विद्यार्थ्यांच्या खात्यात अनेकदा पैसे जमा होतातच कसे, असे होत असेल तर ही चुकी कुणाची, यात काही साटेलोटे आहे काय चौकशी केली जावी. याची चौकशी करण्यात दिरंगाई केल्यास समाजकल्याण आयुक्तांनी याचे उत्तर द्यावे, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.आॅल इंडिया स्टुंडटस ब्लॉक संबंधित प्रशासनाकडे निवेदनाची प्रत दिली आहे. आठ दिवसात जर या वंचीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही तर आॅल इंडिया स्टुंडटस ब्लॉक यांचाकडून मागणीकरिता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. चर्चा करताना शिष्टमंडळात तुषार उमाळे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)