शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बी.ई. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोळ

By admin | Updated: September 22, 2014 23:25 IST

अभियांत्रिकीतील काही विद्यार्थ्यांना सत्र २०१२-१३ मधील शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयात तक्रार दिली. वारंवार चकरा मारल्या

वर्धा : अभियांत्रिकीतील काही विद्यार्थ्यांना सत्र २०१२-१३ मधील शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयात तक्रार दिली. वारंवार चकरा मारल्या पण विभागाकडून विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली तर काहींना अद्याप शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. याची चौकशी करून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी ए.आय.एस.बी. यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनानुसार, समाजकल्याण कार्यालयातील शिष्यवृत्ती विभागाकडून तक्रारीची दखल घेतली जात नाही. वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ असतात. यामुळे समस्या कायम असून तक्रार करुन विद्यार्थी त्रस्त झाले आहे. तक्रार करण्यास गेले असता कार्यालयातील कर्मचारी टोलवाटोलवी करतात. तुम्ही कॉलेज मध्ये विचारा असे सांगितले जाते. विद्यार्थी याची विचारणा कॉलेजमध्ये करतात तर त्यांना समाजकल्याण येथे जाण्यास सांगितले जाते. सततच्या हेलपाटामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. तर काही विद्यार्थ्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली. या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी आॅल इंडिया स्टुडंट ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण सहआयुक्त देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. काही विद्यार्थ्यांना दोन, तिनदा शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे अन्य विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे ज्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली त्यांच्या खात्यातील रक्कम वळती करणे शक्य नाही. मात्र वंचित विद्यार्थ्यांकरिता वेगळ्या निधीची तरतूद करण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली. यासह एकाच विद्यार्थ्यांच्या खात्यात अनेकदा पैसे जमा होतातच कसे, असे होत असेल तर ही चुकी कुणाची, यात काही साटेलोटे आहे काय चौकशी केली जावी. याची चौकशी करण्यात दिरंगाई केल्यास समाजकल्याण आयुक्तांनी याचे उत्तर द्यावे, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.आॅल इंडिया स्टुंडटस ब्लॉक संबंधित प्रशासनाकडे निवेदनाची प्रत दिली आहे. आठ दिवसात जर या वंचीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही तर आॅल इंडिया स्टुंडटस ब्लॉक यांचाकडून मागणीकरिता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. चर्चा करताना शिष्टमंडळात तुषार उमाळे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)