शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सावधान..! धरणावर गेल्यास होईल दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. सततच्या पावसामुळे रिधोरा, पंचधारा, निम्न वर्धा, महाकाळी व बोरधरण या जलायशासह पवनार येथे पाण्याचा प्रवाह सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने कोरोनाकाळात घरी राहून त्रस्त झालेल्या नागरिकांनी मुक्त श्वास घेण्यासाठी जलाशयाकडे धाव घेतली आहे. पण, या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत असून अनेकांच्या पार्ट्याही रंगत असल्याने कारोनाच्या उपाययोजना म्हणून गर्दीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहे. आता जलाशयावर जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन वाहनेही जप्त केली जाणार आहे.गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. सततच्या पावसामुळे रिधोरा, पंचधारा, निम्न वर्धा, महाकाळी व बोरधरण या जलायशासह पवनार येथे पाण्याचा प्रवाह सुरु आहे. या ठिकाणी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जलाशयावर गेल्यानंतर पाण्यात पोहणे, त्या ठिकाणी धिंगामस्ती, आर्ट्यापार्ट्या करण्याचेही प्रमाण वाढले आहे. सुटीच्या दिवशी या ठिकाणी जत्राच भरत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने, ठाणेदार सुनील गाढे यांनी प्रकल्पांना भेटी देत पाहणी केली. जलाशावर होणारी गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या माध्यमातून त्या परिसरातील मार्गावर चौकी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकीतील कर्मचारी येणाºया-जाणाºयांवर वॉच ठेवणार असून जलाशयाकडे जाणाºयांवर दंडात्मक कारवाई करुन वाहनही जप्त करणार आहे. त्यामुळे आता जलाशयाकडे जाणे हे चांगलेच महागात पडणारे आहे.अनेकांच्या उत्साहावर विरजणस्वातंत्र्यदिनी सुटी राहत असल्याने या जलाशयांवर जाणाºयांची संख्या अधिक असते. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुटी आल्याने अनेकांनी जलाशयावर जाण्याचे बेत आखले आहे. त्यासंदर्भातील काही तयारीही चालविली आहे पण, आता प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगरला जाणार असल्याने अनेकांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. त्यामुळे या दिवशी जायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण होणार आहे.वर्धा उपविभागांतर्गत येणाऱ्या धरणांवर जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. त्यानंतर जलाशयावर जाणाºयावर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळेप्रसंगी फौजदारी कारवाई सुद्धा केली जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

टॅग्स :dam tourismधरण पर्यटन