शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सावधान..! धरणावर गेल्यास होईल दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. सततच्या पावसामुळे रिधोरा, पंचधारा, निम्न वर्धा, महाकाळी व बोरधरण या जलायशासह पवनार येथे पाण्याचा प्रवाह सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने कोरोनाकाळात घरी राहून त्रस्त झालेल्या नागरिकांनी मुक्त श्वास घेण्यासाठी जलाशयाकडे धाव घेतली आहे. पण, या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत असून अनेकांच्या पार्ट्याही रंगत असल्याने कारोनाच्या उपाययोजना म्हणून गर्दीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहे. आता जलाशयावर जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन वाहनेही जप्त केली जाणार आहे.गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. सततच्या पावसामुळे रिधोरा, पंचधारा, निम्न वर्धा, महाकाळी व बोरधरण या जलायशासह पवनार येथे पाण्याचा प्रवाह सुरु आहे. या ठिकाणी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जलाशयावर गेल्यानंतर पाण्यात पोहणे, त्या ठिकाणी धिंगामस्ती, आर्ट्यापार्ट्या करण्याचेही प्रमाण वाढले आहे. सुटीच्या दिवशी या ठिकाणी जत्राच भरत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने, ठाणेदार सुनील गाढे यांनी प्रकल्पांना भेटी देत पाहणी केली. जलाशावर होणारी गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या माध्यमातून त्या परिसरातील मार्गावर चौकी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकीतील कर्मचारी येणाºया-जाणाºयांवर वॉच ठेवणार असून जलाशयाकडे जाणाºयांवर दंडात्मक कारवाई करुन वाहनही जप्त करणार आहे. त्यामुळे आता जलाशयाकडे जाणे हे चांगलेच महागात पडणारे आहे.अनेकांच्या उत्साहावर विरजणस्वातंत्र्यदिनी सुटी राहत असल्याने या जलाशयांवर जाणाºयांची संख्या अधिक असते. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुटी आल्याने अनेकांनी जलाशयावर जाण्याचे बेत आखले आहे. त्यासंदर्भातील काही तयारीही चालविली आहे पण, आता प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगरला जाणार असल्याने अनेकांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. त्यामुळे या दिवशी जायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण होणार आहे.वर्धा उपविभागांतर्गत येणाऱ्या धरणांवर जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. त्यानंतर जलाशयावर जाणाºयावर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळेप्रसंगी फौजदारी कारवाई सुद्धा केली जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

टॅग्स :dam tourismधरण पर्यटन