शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 16:18 IST

एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे.

ठळक मुद्देउष्णतेच्या लाटेचा परिणाम नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज

वर्धा : हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याचे हे भाकीत सध्या खरे ठरत असून, जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने नागरिकांनीही अधिक दक्ष राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे अनेकांनी त्यांच्या घरातील आणि व्यावसायिक प्रतिष्ठानातील कुलर तसेच एसी सुरू केले आहेत. सध्या सकाळी १० वाजल्यापासूनच अंगाला चटके देणारे ऊन असल्याने अनेक व्यक्ती चढत्या उन्हात घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांनीही घराबाहेर पडल्यावर उन्हापासून बचावासाठी धुपट्टा आदीचा वापर करावा. इतकेच नव्हे तर भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

उन्हाची तमा न बाळगता दिली जातेय उन्हाळवाहीच्या कामांना गती

रब्बी पिकांची मळणी तसेच उन्हाळवाहीच्या कामांना शेतकरी सध्या गती देत आहे. असे असले तरी जिल्ह्याचे तापमान सध्या दिवसेंदिवस चांगलेच वाढत असल्याने या दिवसात शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. तसे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

पाणीदार फळांचे सेवन ठरते फायद्याचे

जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकू पाहत असल्याने जीवाची लाहीलाहीच होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणीदार फळांचे सेवन करणे हे फायद्याचे ठरते. टरबुज, डांगर, द्राक्ष, नारळपाणी आदीचे सेवन करण्याचा सल्ला सध्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक दक्ष राहावे. शिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाणीदार फळांच्या सेवनासह उन्हात घराबाहेर पडताना खबरदारीच्या उपाययोजना कराव्या.

- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानwardha-acवर्धा