शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 16:18 IST

एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे.

ठळक मुद्देउष्णतेच्या लाटेचा परिणाम नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज

वर्धा : हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याचे हे भाकीत सध्या खरे ठरत असून, जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने नागरिकांनीही अधिक दक्ष राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे अनेकांनी त्यांच्या घरातील आणि व्यावसायिक प्रतिष्ठानातील कुलर तसेच एसी सुरू केले आहेत. सध्या सकाळी १० वाजल्यापासूनच अंगाला चटके देणारे ऊन असल्याने अनेक व्यक्ती चढत्या उन्हात घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांनीही घराबाहेर पडल्यावर उन्हापासून बचावासाठी धुपट्टा आदीचा वापर करावा. इतकेच नव्हे तर भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

उन्हाची तमा न बाळगता दिली जातेय उन्हाळवाहीच्या कामांना गती

रब्बी पिकांची मळणी तसेच उन्हाळवाहीच्या कामांना शेतकरी सध्या गती देत आहे. असे असले तरी जिल्ह्याचे तापमान सध्या दिवसेंदिवस चांगलेच वाढत असल्याने या दिवसात शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. तसे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

पाणीदार फळांचे सेवन ठरते फायद्याचे

जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकू पाहत असल्याने जीवाची लाहीलाहीच होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणीदार फळांचे सेवन करणे हे फायद्याचे ठरते. टरबुज, डांगर, द्राक्ष, नारळपाणी आदीचे सेवन करण्याचा सल्ला सध्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक दक्ष राहावे. शिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाणीदार फळांच्या सेवनासह उन्हात घराबाहेर पडताना खबरदारीच्या उपाययोजना कराव्या.

- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानwardha-acवर्धा