शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

वर्धेचा रणसंग्राम : चुरशीची लढत - पक्ष, नेत्यांसह उमेदवारांचीही होणार सत्वपरीक्षा

By रवींद्र चांदेकर | Updated: April 2, 2024 16:49 IST

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती.

वर्धा : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक कमी झाल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्ष, नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सत्वपरीक्षा घेणारी ठरणार आहे.

२०१४ मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये २ लाख १५ हजार ७८३ मतांचा फरक होता. हाच फरक २०१९ च्या निवडणुकीत जवळपास २८ हजार मतांनी कमी होऊन १ लाख ८७ हजार १९१ वर आला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ३७ हजार ५१८, तर काँग्रेसचे सागर मेघे यांना ३ लाख २१ हजार ७३५ मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकीत जय आणि पराजयामधील मतांचे अंतर काही प्रमाणात कमी झाले होते. त्यामुळे यावेळी मतदार कुणाची हमी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१९ मध्ये रामदास तडस यांना झालेल्या एकूण मतदानाच्या ५३.९२ टक्के, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी चारुलता टोकस यांना ३६.४७ टक्के मते मिळाली होती. या दोघांमध्ये १७.४५ टक्के मतांचा फरक होता. त्यामुळे यावेळी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

सर्वात कमी मतांनी झालेले विजय

२००४ च्या निवडणुकीत भाजपचे सुरेश वाघमारे यांनी काँग्रेसच्या प्रभा राव यांचा केवळ ३ हजार १८८ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी रिंगणातील उर्वरित पाच उमेदवारांना ५ हजारांपेक्षा जस्त मते मिळाली होती. तत्पूर्वी १९९९ मध्ये काँग्रेसच्या प्रभा राव यांनी भाजपाचे सुरेश वाघमारे यांचा ७ हजार ५९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता मेघे यांनी १ लाख ५२ हजार ८५६ मते घेतली होती, हे विशेष.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४