शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वर्धेचा रणसंग्राम : चुरशीची लढत - पक्ष, नेत्यांसह उमेदवारांचीही होणार सत्वपरीक्षा

By रवींद्र चांदेकर | Updated: April 2, 2024 16:49 IST

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती.

वर्धा : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक कमी झाल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्ष, नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सत्वपरीक्षा घेणारी ठरणार आहे.

२०१४ मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये २ लाख १५ हजार ७८३ मतांचा फरक होता. हाच फरक २०१९ च्या निवडणुकीत जवळपास २८ हजार मतांनी कमी होऊन १ लाख ८७ हजार १९१ वर आला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ३७ हजार ५१८, तर काँग्रेसचे सागर मेघे यांना ३ लाख २१ हजार ७३५ मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकीत जय आणि पराजयामधील मतांचे अंतर काही प्रमाणात कमी झाले होते. त्यामुळे यावेळी मतदार कुणाची हमी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१९ मध्ये रामदास तडस यांना झालेल्या एकूण मतदानाच्या ५३.९२ टक्के, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी चारुलता टोकस यांना ३६.४७ टक्के मते मिळाली होती. या दोघांमध्ये १७.४५ टक्के मतांचा फरक होता. त्यामुळे यावेळी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

सर्वात कमी मतांनी झालेले विजय

२००४ च्या निवडणुकीत भाजपचे सुरेश वाघमारे यांनी काँग्रेसच्या प्रभा राव यांचा केवळ ३ हजार १८८ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी रिंगणातील उर्वरित पाच उमेदवारांना ५ हजारांपेक्षा जस्त मते मिळाली होती. तत्पूर्वी १९९९ मध्ये काँग्रेसच्या प्रभा राव यांनी भाजपाचे सुरेश वाघमारे यांचा ७ हजार ५९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता मेघे यांनी १ लाख ५२ हजार ८५६ मते घेतली होती, हे विशेष.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४