शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

पाणीपुरवठा योजनेच्या लिकेजचा आधार

By admin | Updated: April 23, 2016 02:08 IST

जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे.

पाण्याचा असाही वापर : फुटलेल्या व्हॉल्व्हवरून समता नगरवासीय भागवितात तृष्णावर्धा : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. यामुळे नळयोजनेला पाणी येत नाही. पाण्याच्या थेंबाथेंबाकरिता नागरिकांची परवड होत आहे. याच पाण्याचा थेंब अन् थेंब कामी यावा याकरिता पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या वरूड-म्हसाळा मार्गावरील समता नगर आणि गौतम नगर परिसरातील नागरिक पाणी पुरवठा योजनेच्या एयर व्हॉल्व्हच्या लिकेजमधून वाया जात असलेल्या पाण्यावर आपली गरज भागवत आहेत. या भागात नळ शासनाची नळ योजना असली तरी सध्या पाण्याच्या दूर्भिक्ष्यामुळे नळांना अपुरे पाणी येत आहे. आलेल्या पाण्यात नित्याची गरज भागत नाही. यामुळे या भागात पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. पवनार येथून सेवाग्राम परिसरात गेलेल्या नळ योजनेच्या व्हॉल्व्हमधून पाणी लिकेज होत असल्याने नागरिक येथे पाणी भरण्याकरिता गर्दी करीत आहे. उन्हाचे चटके जाणवत असताना भर दुपारी सूर्य माथ्यावर असताना २ वाजताच्या सुमारास या भागातील महिला पुरूष पाण्याकरिता या लिकेज व्हॉल्व्हजवळ गर्दी करीत असतात. सायंकाळच्यावेळी तर येथे चांगलीच झुंबड उडत असल्याची माहिती आहे. व्हॉल्व्ह मधील पाणी थेट आपल्या बादलीत पडावे, याकरिता त्यांनी प्लास्टिकची थैली बांधून त्यातून पाणी घेण्याची शक्कल येथे लढविली आहे. यातून पाणी घेत या भागातील नागरिक त्यांची पाण्याची गरज भागवित आहेत. या भागात नळ योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा अत्यल्प असल्याने शासनाने येथे पाणी पुरवठा करण्याकरिता उपाययोजना आखण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)