शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जागतिक प्रश्नांचे उत्तर बापूंच्या एकादश व्रतात सापडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:31 IST

देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.

ठळक मुद्देसेवाग्रामात तीन दिवसीय गांधी विज्ञान संमेलनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने जनसहयोग ट्रस्ट व्दारे सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान गांधी विज्ञान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना डॉ. अभय बंग बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी विज्ञान हे नैतिक किंवा अनैतिक नसून ननैतिक असते. विज्ञानामध्ये नैतिकतेचा वापर गांधीजींनी केला, असे सांगून आजच्या काळात गांधी कुठे आहेत? असा प्रश्नही डॉ.बंग यांनी उपस्थित केला. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.अनिल सदगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मुंबईचे ९५ वर्षीय गांधीवादी डॉ. जी.जी.पारीख होते. मान्यवरांनी ‘वैज्ञानिक ता आणि गांधीजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘गांधीजींच्या वैज्ञानिक दृष्टीच्या प्रकाशात’ या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यान व चर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रवींद्र पंढरीनाथ, सोपान जोशी, अतुल देऊळगावकर, आनंद माझगांवकर व प्रदीप शर्मा यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय र.र.यांनी केले. या कार्यक्रमाला देशभरातील गांधी विचारवंत तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग