शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जागतिक प्रश्नांचे उत्तर बापूंच्या एकादश व्रतात सापडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:31 IST

देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.

ठळक मुद्देसेवाग्रामात तीन दिवसीय गांधी विज्ञान संमेलनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने जनसहयोग ट्रस्ट व्दारे सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान गांधी विज्ञान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना डॉ. अभय बंग बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी विज्ञान हे नैतिक किंवा अनैतिक नसून ननैतिक असते. विज्ञानामध्ये नैतिकतेचा वापर गांधीजींनी केला, असे सांगून आजच्या काळात गांधी कुठे आहेत? असा प्रश्नही डॉ.बंग यांनी उपस्थित केला. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.अनिल सदगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मुंबईचे ९५ वर्षीय गांधीवादी डॉ. जी.जी.पारीख होते. मान्यवरांनी ‘वैज्ञानिक ता आणि गांधीजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘गांधीजींच्या वैज्ञानिक दृष्टीच्या प्रकाशात’ या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यान व चर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रवींद्र पंढरीनाथ, सोपान जोशी, अतुल देऊळगावकर, आनंद माझगांवकर व प्रदीप शर्मा यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय र.र.यांनी केले. या कार्यक्रमाला देशभरातील गांधी विचारवंत तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग