शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

रोजगार निर्मितीचे प्रस्ताव मंजूर करताना बँकांनी सामाजिक भावनेतून बघावे - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 15:58 IST

एमआयडीसीसह रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा

वर्धा : होतकरू तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासोबतच त्यांना उद्योजक बनविण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मंजूर प्रकरणांची संख्या वाढवा. बँकांनी या योजनेतून प्रस्ताव मंजूर करताना सामाजिक भावनेतून त्याकडे पाहावे. जास्तीत जास्त प्रकरणे कशी मंजूर करता येतील, असा दृष्टीकोन बाळगावा, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उदय सामंत यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह उद्योग विभागाचा आढावा घेतला. बैठकीला खा. रामदास तडस, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा सोनाले, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेंद्र पटेल, उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, अधीक्षक अभियंता सुनील अकुलवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कमलेशकुमार जैन आदींची उपस्थिती होती. ना. सामंत यांनी यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा मागील वर्ष व या वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकांनी जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करावे, असे निर्देश त्यांनी बँकांना दिले. यावर्षी ५०० प्रकरणांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सोबतच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना केल्या.

उद्योग उभारले नसतील तर भूखंड परत घ्या!

एमआयडीसीमध्ये उद्योग उभारण्याकरिता भूखंड घेतले; परंतु, विहित कालावधीत उद्योग उभारले नसतील तर ते परत घेतले जातील. तसेच ज्या कंपन्यांमुळे प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवत असेल तर त्या कंपनीच्या चौकशीचे आदेश पर्यावरण नियंत्रण मंडळाला दिल्याची माहिती ना. उदय सामंत यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील १३७ भूखंडधारकांना नोटीस बजावली असून १४ भूखंड काढून घेतले आहे. तसेच जवळपास ६७ भूखंडही परत घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले.

कारंजा, हिंगणघाट एमआयडीसीचा विस्तार

जिल्ह्यात सहा औद्योगिक वसाहती आहे. यामध्ये कारंजा (घाडगे) आणि हिंगणघाट येथील एमआयडीसीचा विस्तार व्हावा, अशी बऱ्याच दिवसांची मागणी होती. त्यानुसार कारंज्यामध्ये २४२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून आता भूखंड वाटप केले जात आहे. तर हिंगणघाटकरिता २८३ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. इतकेच नाही तर आर्वीच्या एमआयडीसीच्या १४८ हेक्टर जमिनीची अधिसूचना सोबत आणली असून या एमआयडीसींच्या माध्यमातून रोजगारांची संधी मिळणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यात साकारणार उद्योग भवन

वर्धा आणि देवळी येथील औद्योगिक वसाहतीत रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात नवीन उद्योग भवन बांधण्यात येत असून त्यासाठी ११ कोटी ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन तातडीने घेण्याची सूचना त्यांनी केली. जिल्ह्यातील उद्योजकांशीदेखील ना. सामंत यांनी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. औद्योगिक वसाहतीत चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे सांगितले.

विश्वकर्मा योजना उत्तमप्रकारे राबवा - खा. तडस

यावेळी खा. रामदास तडस यांनी औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. देवळी येथील वसाहतीत अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. तसेच या वसाहतीतील खराब रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा ही अतिशय चांगली योजना असून जिल्ह्यात ही योजना शासकीय विभाग व बँकांनी उत्तमप्रकारे राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

टॅग्स :GovernmentसरकारUday Samantउदय सामंतwardha-acवर्धा