शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

केळी, डाळींबाला फटका

By admin | Updated: May 12, 2017 00:50 IST

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले वादळाचे थैमान गुरुवारीही कायम होते.

तळेगाव व एकुर्लीला वादळाचा तडाखा : अनेक गावांतील बत्ती गुल लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/तळेगाव (टालाटुले) : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले वादळाचे थैमान गुरुवारीही कायम होते. आर्वी मार्गावर मजरा व आंजी (मोठी) येथे झाडे तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. तर बुधवारी रात्री तळेगाव (टा.)^ व एकुर्ली परिसराला वादळाने चांगलेच झोडपले. या वादळासह गारपीट झाल्याने येथील केळी आणि डाळींब बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी झालेले गारपीट झाडांवरील पोपटांकरिता कर्दनकाळ ठरले. गारांच्या माऱ्यामुळे अनेक पोपटांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पुलगाव, आकोली परिसरात पाऊस आला. आर्वी मार्गावर झाडे तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. हा पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याचा कुठलाही नेम नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी रात्री आलेल्या वादळामुळे तळेगाव व एकुर्ली येथे शेतकऱ्यांनी शेतात त्यांच्या जनावरांकरिता तयार केलेल्या गोठ्यांवरील टीनपत्रे उडून गेले. तर काही घरांवरील छताचे नुकसान झाले. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. या वादळात विजेचे २० पोल जमीनदोस्त झाल्याने रात्रभर गावकऱ्यांना काळोखाचा सामना करावा लागला. वीज पुरवठा खंडीत झाल्याने गावातील पाणी पुरवठाही खोळंबला आहे. यामुळे गुरुवारी सकाळी गावकऱ्यांना पाण्याकरिता भटकावे लागले. शासकीय अधिकाऱ्यांनी गावात येत नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी जि.प. सदस्य विमल वरभे तसेच एकुर्लीचे सरपंच भास्कर वरभे व गावकऱ्यांनी केले आहे.