शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

गावागावांत करणार पुरोगामी विचारांचा जागर : अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 18:20 IST

महाराष्ट्र बचाओ अभियान: राजकीय साक्षरता करण्यासाठी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेद्वारे राजकीय साक्षरतेसाठी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या 'संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ' या अभियानाची संयुक्त बैठक स्थानिक राष्ट्रीय युवा संगठन कार्यालयात घेण्यात आली. येत्या ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात होत असून, सर्वसमावेशक नियोजनाबाबत विविध परिवर्तनवादी व समविचारी सामाजिक राजकीय संघटनांशी या बैठकीत चर्चा केली.

समाजात राजकीय साक्षरता रुजविण्याच्या उद्देशाने अ. भा. अंनिसद्वारे सेवाग्राम येथे नुकतीच वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत महाराष्ट्रातील सुमारे ६० वक्ते सहभागी झाले होते. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांसह आपली कर्तव्ये, संवैधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. भारताचे संविधान आणि स्वातंत्र्याचा राजकीय इतिहास याबाबत समाजमनात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे अभियान आहे. नवमतदार युवक, युवतींनी उत्तम नागरिक बनण्यासाठी संविधान समजून घेण्याची आवश्यकता असून, त्यासाठी महाविद्यालयीन स्तरावरही संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्ह्यातही विविध महाविद्यालयांत 'भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, ग्रामीण आणि शहरी भागात लहान व मोठ्या जाहीर जनजागर सभांचे आयोजन 'अंनिस'द्वारे करण्यात येणार असून, त्यासाठी विविध सामाजिक पुरोगामी संघटनांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, जिल्हा महिला शाखा संघटक डॉ. सुचिता ठाकरे, भारत जोडो अभियानचे विदर्भ संयोजक अविनाश काकडे, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, माकपा नेते यशवंत झाडे, आम आदमी पक्षाचे प्रमोद भोमले, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सुभाष खंडारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. खलील खतीब, संदीप किटे, प्रदीप वानखेडे, राष्ट्रवादी किसान सभेचे संजय काकडे, किसान अधिकार अभियानचे सुदाम पवार, विनेश काकडे, राष्ट्रीय युवा संघटनचे प्रशांत नागोसे, दिनेश प्रसाद, भारतीय लोकशाही अभियानचे अतुल शर्मा, सुषमा शर्मा, मालती देशमुख आदी उपस्थित होते.

गावागावांत करणार जनजागृती...संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्र बचाव हे अभियान राबविण्यात येणार आहे, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत बैठक घेण्यात येणार असून जनजागृती केली जाणार आहे. नुकतीच बैठक पार पडली असून येत्या काही दिवसांत राजकीय साक्षरता करण्यासाठी बैठकींचे आयोजन केले जाणार आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा