शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

गावागावांत करणार पुरोगामी विचारांचा जागर : अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 18:20 IST

महाराष्ट्र बचाओ अभियान: राजकीय साक्षरता करण्यासाठी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेद्वारे राजकीय साक्षरतेसाठी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या 'संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ' या अभियानाची संयुक्त बैठक स्थानिक राष्ट्रीय युवा संगठन कार्यालयात घेण्यात आली. येत्या ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात होत असून, सर्वसमावेशक नियोजनाबाबत विविध परिवर्तनवादी व समविचारी सामाजिक राजकीय संघटनांशी या बैठकीत चर्चा केली.

समाजात राजकीय साक्षरता रुजविण्याच्या उद्देशाने अ. भा. अंनिसद्वारे सेवाग्राम येथे नुकतीच वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत महाराष्ट्रातील सुमारे ६० वक्ते सहभागी झाले होते. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांसह आपली कर्तव्ये, संवैधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. भारताचे संविधान आणि स्वातंत्र्याचा राजकीय इतिहास याबाबत समाजमनात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे अभियान आहे. नवमतदार युवक, युवतींनी उत्तम नागरिक बनण्यासाठी संविधान समजून घेण्याची आवश्यकता असून, त्यासाठी महाविद्यालयीन स्तरावरही संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्ह्यातही विविध महाविद्यालयांत 'भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, ग्रामीण आणि शहरी भागात लहान व मोठ्या जाहीर जनजागर सभांचे आयोजन 'अंनिस'द्वारे करण्यात येणार असून, त्यासाठी विविध सामाजिक पुरोगामी संघटनांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, जिल्हा महिला शाखा संघटक डॉ. सुचिता ठाकरे, भारत जोडो अभियानचे विदर्भ संयोजक अविनाश काकडे, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, माकपा नेते यशवंत झाडे, आम आदमी पक्षाचे प्रमोद भोमले, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सुभाष खंडारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. खलील खतीब, संदीप किटे, प्रदीप वानखेडे, राष्ट्रवादी किसान सभेचे संजय काकडे, किसान अधिकार अभियानचे सुदाम पवार, विनेश काकडे, राष्ट्रीय युवा संघटनचे प्रशांत नागोसे, दिनेश प्रसाद, भारतीय लोकशाही अभियानचे अतुल शर्मा, सुषमा शर्मा, मालती देशमुख आदी उपस्थित होते.

गावागावांत करणार जनजागृती...संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्र बचाव हे अभियान राबविण्यात येणार आहे, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत बैठक घेण्यात येणार असून जनजागृती केली जाणार आहे. नुकतीच बैठक पार पडली असून येत्या काही दिवसांत राजकीय साक्षरता करण्यासाठी बैठकींचे आयोजन केले जाणार आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा