शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

शेतकऱ्याचे वागणे आवाक्याबाहेरच होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:54 IST

बँक व्यवस्थापकाच्या दालनात शेतकऱ्याने शासन, प्रशासन व मला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. वारंवार सांगून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. एका महिले समोर शेतकरी बोलत असलेली भाषा समजण्यापलीकडे होती.

ठळक मुद्देतहसीलदार भागवत यांची पत्र परिषद : शेतकºयांविषयी जिव्हाळा असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : बँक व्यवस्थापकाच्या दालनात शेतकऱ्याने शासन, प्रशासन व मला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. वारंवार सांगून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. एका महिले समोर शेतकरी बोलत असलेली भाषा समजण्यापलीकडे होती. त्यामुळे त्यांच्यावर नकळत हात उगारण्यात आला, अशी माहिती. देवळीच्या तहसीलदार बाळू भागवत यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याची मी मुलगी असल्याने मला त्यांच्या अडचणींची जाण आहे. त्यांच्या प्रती तेवढाच जिव्हाळा आहे. परंतु शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मला एकतर्फी दोषी ठरविले जात आहे. प्रत्यक्षात घटनेच्या दिवशी संतोष चौधरी हे अंदोरी येथील शेतकरी दारूच्या नशेत गोंधळ घालत होते. घटनेच्या दिवशी शासकीय कामानिमित्त मी अंदोरी येथे होते. दरम्यान या कास्तकाराने माझ्याकडे येवून बँक प्रशासनाची तक्रार केली. बँकेच्यावतीने शासनाच्या कर्जमाफीची दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.याबाबीची पडताळणी करण्यासाठी म्हणून संबंधित शेतकºयाला घेवून बँकेत गेले. बँक व्यवस्थापकाना विचारणा केली असता या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली बँकेचे पासबुक आणल्यानंतर त्यावर तश्या प्रकारची नोंद करणार असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.संबंधित कास्तकाराचा नवीन पीककर्जासाठी अर्जच नसल्याचा हा विषय नव्हता.याबाबत संबंधित कास्तकाराला वारंवार सांगुन सुद्धा तो काही ऐकण्यास तयार नव्हता. दारूच्या नशेत सारखा बडबडत होता. शासन, प्रशासन व मला अर्वाच्य भाषेत बोलत होता. एक स्त्री म्हणून त्याचे माझ्यासोबत वागणे आवाक्याबाहेर होते. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.या कास्तकाराविषयी माझ्या मनात जिव्हाळा नसता तर मी त्याला बँकेत घेवून गेलेच नसते. किंवा हा प्रकार झाल्यानंतर या कास्तकाराच्या चुकीबद्दल पोलीस प्रशासनाला कळविले असते. गरीब शेतकरी अडचणीत येवू नये म्हणून पोलिसात तक्रार दिली नाही, असेही तहसीलदार भागवत यांनी पत्रपरिषदेत सांगितले.देवळी तालुक्यात घटना वाढल्यादेवळी तालुक्यात शासकीय अधिकारी व शेतकरी यांच्यात संघर्षाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. विजयगोपाल येथील बॅक व्यवस्थापकास भाजप अध्यक्षांनी काळे फासल्याची घटना घडल्यानंतर आता तहसीलदार यांनी मारहाण केल्याचे प्रकरण घडले आहे. शेतकऱ्यांची चूक असल्याचा दावा भागवत यांच्या माहितीवरून दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार