शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचे वागणे आवाक्याबाहेरच होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:54 IST

बँक व्यवस्थापकाच्या दालनात शेतकऱ्याने शासन, प्रशासन व मला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. वारंवार सांगून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. एका महिले समोर शेतकरी बोलत असलेली भाषा समजण्यापलीकडे होती.

ठळक मुद्देतहसीलदार भागवत यांची पत्र परिषद : शेतकºयांविषयी जिव्हाळा असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : बँक व्यवस्थापकाच्या दालनात शेतकऱ्याने शासन, प्रशासन व मला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. वारंवार सांगून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. एका महिले समोर शेतकरी बोलत असलेली भाषा समजण्यापलीकडे होती. त्यामुळे त्यांच्यावर नकळत हात उगारण्यात आला, अशी माहिती. देवळीच्या तहसीलदार बाळू भागवत यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याची मी मुलगी असल्याने मला त्यांच्या अडचणींची जाण आहे. त्यांच्या प्रती तेवढाच जिव्हाळा आहे. परंतु शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मला एकतर्फी दोषी ठरविले जात आहे. प्रत्यक्षात घटनेच्या दिवशी संतोष चौधरी हे अंदोरी येथील शेतकरी दारूच्या नशेत गोंधळ घालत होते. घटनेच्या दिवशी शासकीय कामानिमित्त मी अंदोरी येथे होते. दरम्यान या कास्तकाराने माझ्याकडे येवून बँक प्रशासनाची तक्रार केली. बँकेच्यावतीने शासनाच्या कर्जमाफीची दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.याबाबीची पडताळणी करण्यासाठी म्हणून संबंधित शेतकºयाला घेवून बँकेत गेले. बँक व्यवस्थापकाना विचारणा केली असता या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली बँकेचे पासबुक आणल्यानंतर त्यावर तश्या प्रकारची नोंद करणार असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.संबंधित कास्तकाराचा नवीन पीककर्जासाठी अर्जच नसल्याचा हा विषय नव्हता.याबाबत संबंधित कास्तकाराला वारंवार सांगुन सुद्धा तो काही ऐकण्यास तयार नव्हता. दारूच्या नशेत सारखा बडबडत होता. शासन, प्रशासन व मला अर्वाच्य भाषेत बोलत होता. एक स्त्री म्हणून त्याचे माझ्यासोबत वागणे आवाक्याबाहेर होते. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.या कास्तकाराविषयी माझ्या मनात जिव्हाळा नसता तर मी त्याला बँकेत घेवून गेलेच नसते. किंवा हा प्रकार झाल्यानंतर या कास्तकाराच्या चुकीबद्दल पोलीस प्रशासनाला कळविले असते. गरीब शेतकरी अडचणीत येवू नये म्हणून पोलिसात तक्रार दिली नाही, असेही तहसीलदार भागवत यांनी पत्रपरिषदेत सांगितले.देवळी तालुक्यात घटना वाढल्यादेवळी तालुक्यात शासकीय अधिकारी व शेतकरी यांच्यात संघर्षाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. विजयगोपाल येथील बॅक व्यवस्थापकास भाजप अध्यक्षांनी काळे फासल्याची घटना घडल्यानंतर आता तहसीलदार यांनी मारहाण केल्याचे प्रकरण घडले आहे. शेतकऱ्यांची चूक असल्याचा दावा भागवत यांच्या माहितीवरून दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार