शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

चौफुली होतेय अपघातप्रवण स्थळ

By admin | Updated: April 12, 2015 01:58 IST

अनियंत्रित आणि बेसावधपणे भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात होत आहेत.

पुलगाव : अनियंत्रित आणि बेसावधपणे भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात होत आहेत. दररोज होत असलेले किरकोळ अपघात टाळण्यासाठी स्थानिक आदर्श हायस्कूल समोरील चौफुलीवर गतिरोधक बसवण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. या चौफुलीवर विद्यार्थ्यांची वरदळ अधिक असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुलगाव शहर आकाराने वाढत आहे. या तुलनेत रस्त्यांची संख्या कमी होत आहे. शिवाय शहरालगत महामार्ग गेल्याने त्यातील काही वाहने शहरात येत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढल्याने स्टेशन चौक ते पंचधारा नाक्यापर्यंतच मार्गावरील रहदारी वाढली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने पादचाऱ्यांना पायी चालणे कठीण झाले आहे. नाचणगाव मार्गे यवतमाळकडे जाणारी जड वाहन याच मार्गाने जातात. शहरातील शाळा विद्यालये याच मार्गावर आहे. यामुळे सकाळी शाळा सुरू होताना व सायंकाळी शाळा सुटण्याच्या मार्गावर येथे गर्दी वाढत असते. अशात स्टेशन चौकापासून तर पंचधारा मार्गापर्यंत हरिराम नगरातून जाणाऱ्या सरळ मार्गावरील वाहतूक वाढली आहे. फारशी वाहतूक नसल्याने दुचाकी वाहक भरधाव वाहने चालविचत असतात. स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करतात. या मार्गावरील मील मागील भागात असलेल्या नाल्यावरील भींत तुटल्याने भरधाव वाहन सरळ नाल्यात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसे अपघात येथे झाल्याची नोंद आहे. या भागात मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मार्गावर असलेल्या चौफुलीवर अपघात प्रवण स्थळ असे फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे वाहतूक पोलीस व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज वर्तविली जात आहे. चौफुलीवर मोठा अपघात होण्यापूर्वी येथे गतिरोधक निर्माण करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)