शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चौफुली होतेय अपघातप्रवण स्थळ

By admin | Updated: April 12, 2015 01:58 IST

अनियंत्रित आणि बेसावधपणे भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात होत आहेत.

पुलगाव : अनियंत्रित आणि बेसावधपणे भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात होत आहेत. दररोज होत असलेले किरकोळ अपघात टाळण्यासाठी स्थानिक आदर्श हायस्कूल समोरील चौफुलीवर गतिरोधक बसवण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. या चौफुलीवर विद्यार्थ्यांची वरदळ अधिक असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुलगाव शहर आकाराने वाढत आहे. या तुलनेत रस्त्यांची संख्या कमी होत आहे. शिवाय शहरालगत महामार्ग गेल्याने त्यातील काही वाहने शहरात येत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढल्याने स्टेशन चौक ते पंचधारा नाक्यापर्यंतच मार्गावरील रहदारी वाढली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने पादचाऱ्यांना पायी चालणे कठीण झाले आहे. नाचणगाव मार्गे यवतमाळकडे जाणारी जड वाहन याच मार्गाने जातात. शहरातील शाळा विद्यालये याच मार्गावर आहे. यामुळे सकाळी शाळा सुरू होताना व सायंकाळी शाळा सुटण्याच्या मार्गावर येथे गर्दी वाढत असते. अशात स्टेशन चौकापासून तर पंचधारा मार्गापर्यंत हरिराम नगरातून जाणाऱ्या सरळ मार्गावरील वाहतूक वाढली आहे. फारशी वाहतूक नसल्याने दुचाकी वाहक भरधाव वाहने चालविचत असतात. स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करतात. या मार्गावरील मील मागील भागात असलेल्या नाल्यावरील भींत तुटल्याने भरधाव वाहन सरळ नाल्यात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसे अपघात येथे झाल्याची नोंद आहे. या भागात मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मार्गावर असलेल्या चौफुलीवर अपघात प्रवण स्थळ असे फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे वाहतूक पोलीस व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज वर्तविली जात आहे. चौफुलीवर मोठा अपघात होण्यापूर्वी येथे गतिरोधक निर्माण करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)