शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

आष्टी तालुक्यात २२ हजार ५३७ हेक्टर पेरण्या झाल्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:48 IST

यावर्षी मुरवणी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दमात केलेल्या पेरण्या यशस्वी झाल्या आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच पेरण्या साधल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिकाची जोपासना करण्यासाठी शेतात निंदणीचे व तणनाशक फवारणी काम सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकरी समाधानी : कापसाच्या क्षेत्रात यंदा झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी मुरवणी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दमात केलेल्या पेरण्या यशस्वी झाल्या आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच पेरण्या साधल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिकाची जोपासना करण्यासाठी शेतात निंदणीचे व तणनाशक फवारणी काम सुरू आहे. शेतीच्या कामामुळ े ग्रामीण भागातील महिला व पुरूष मंडळी व्यस्त झाली आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी झालेल्या खरीप पेरणीमध्ये कपाशी पिकाची लागवड सर्वाधिक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यानंतर त्याला पाहिजे तसेच भाव मिळाले नाही. सुरूवातीला २ हजार पासून २८०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. त्यानंतर ३२०० पासून ३४५० भाव मिळाला. याऊलट कापूस पिकाला सुरूवातीला ४ हजार ते ४६०० नंतर ४७०० ते ६२०० पर्यंत भाव मिळाला. कापसाचे उत्पादन समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास बसला. शिवाय भाव मिळाल्याने जास्त हमी देऊन आर्थिक फायदा झाला.कृषी विभागाचे विस्तार अधिकारी विजय देशपांडे म्हणाले की, सध्या ९१.७७ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहे. यामध्ये २२ हजार ५३७ हेक्टरवर कुठेही दुबार पेरणी आली नाही. शेतकरी पावसाच्या भरवश्यावर पेरणी करतात सुरूवातीला जूनच्या पंधरवाड्यात करण्यात आलेल्या पेरणी मध्ये ओलिताद्वारे पाणी देण्यात आले आहे.उर्वरीत पिकांची वाढही समाधानकारक आहे. शेतामध्ये तणाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी डवरणी व तणनाशक फवारणीच्या कमी लागले आहे.यावर्षी पीक उत्पादनाला हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शाश्वत भाव हक्काने मिळणार आहे. शेतकºयांनी चांगल्या प्रकारे पिकनियोजन केले आहे.निसर्गाने साथ दिल्यास भरघोष उत्पादन होण्याचा अंदाज शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज मिळण्यास बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून महागडे बि-बियाणे खते विकत घेवून पेरणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती