शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

आष्टी-साहूर राज्यमार्ग खड्डेमय

By admin | Updated: October 2, 2016 00:55 IST

गत तीन दिवसांपासून आष्टीसह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : तीन दिवसांत बारा अपघातआष्टी (श.) : गत तीन दिवसांपासून आष्टीसह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे. आष्टी-साहूर राज्य मार्गावर पांढुर्णा फाट्याजवळ ४ बाय ९ मिटर रोडला मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साचले. या खड्ड्यामुळे तीन दिवसांत दुचाकीचे १२ अपघात झाले असून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. याप्रकरणी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन भोरे यांनी निवेदन देत त्वरित खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे. आष्टी-साहूर मार्ग खड्डेमय झाला आहे. साईडपट्ट्या दोन्ही बाजुने डांबरी रस्त्यापेक्षा वर आल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचते. या खड्ड्यात ३ फुट खोल पाणी साचल्याने दुचाकी, ट्रक, कार चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गाने वरूड, मुलताई, बैतुलकडे शेकडो ट्रक धावतात. दुचाकी दिवसभर सुरू असतात. बारा अपघातात सर्व दुचाकी चालक व सहकारी गंभीर जखमी झाले. सदर रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास बांधकाम विभागाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशाराही गजानन भोरे यांनी निवेदनातून दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)साडेचार कोटींचा खर्च व्यर्थआष्टी-साहूर राज्यमार्गाच्या डांबरीकरणावर दोन वर्षांपूर्वी तीन कोटी तर मागील वर्षी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. या रस्त्यावर दिवसरात्र रहदारी सुरू असते. जड वाहतुकीमुळे रस्त्याच्या कामावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. बांधकामाचा दर्जा सूमार आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येते. डांबरामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ राहत असल्याने वर्षभरामध्ये रस्ता उखडण्याची हमी दिली जात असल्याचेच दिसते. शासनाच्या निधीला चुना लावण्याचे काम सुरू आहे. काम झाल्यानंतर वर्षाअखेरीस रस्ता का उखडतो, यावर विचार करण्याची वेळ आली असताना त्याकडेही कानाडोळाच केला जात असल्याचे दिसते. चांगल्या रस्त्यांसाठी शासन निधी देते; पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा भ्रष्ट ठरत आहे. यामुळेच रस्त्याची वाट लागत आहे.साईडपट्ट्या धोकादायकतळेगाव ते आष्टी, आष्टी ते साहूर या दोन्ही मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या डांबरी रस्त्यापेक्षा वर आल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढत जाते. यामुळे पट्ट्यांचा उतार कसा काढायचा, याचेही नियोजन गरजेचे आहे. अपघाताचे प्रमाण यामुळेच वाढत आहे. एकावेळी दोन वाहने आल्यास दुचाकी चालकाला जाण्यासाठी जागाच राहत नाही. यामुळे अपघात होत आहे. नागरिकांची ओरड बांधकाम विभागाला नित्याचीच झाली असून तेही दुर्लक्षच करतात.आले अधिकारी ठेकेदाराच्या मनारस्ता डांबरीकरणाचे काम सुरू झाल्यावर अधिकारी डांबरी हॉटमिक्स प्लॅन्टवर जात नाही. एकत्र झालेले साहित्य रस्त्यावर टाकले जाते. यामुळे बारा महिन्यात त्याचे बारा वाजतात. अधिकारी उपस्थित राहत नाही. नागरिक ओरडून सांगतात; पण अधिकारी मनावर घेईल तरच ना! रस्त्यांची वाट लागल्यानंतर बांधकाम विभागाला जागा येते. हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे. शासनाच्या निधीचा योग्यरित्या खर्च करून भ्रष्टाचारमुक्त कामे करावी, अशी रास्त अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत. रस्त्यांची होणारी चाळणी आतातरी थांबवावी, अशी मागणी आष्टी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.