शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

आष्टी-साहूर राज्यमार्ग खड्डेमय

By admin | Updated: October 2, 2016 00:55 IST

गत तीन दिवसांपासून आष्टीसह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : तीन दिवसांत बारा अपघातआष्टी (श.) : गत तीन दिवसांपासून आष्टीसह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे. आष्टी-साहूर राज्य मार्गावर पांढुर्णा फाट्याजवळ ४ बाय ९ मिटर रोडला मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साचले. या खड्ड्यामुळे तीन दिवसांत दुचाकीचे १२ अपघात झाले असून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. याप्रकरणी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन भोरे यांनी निवेदन देत त्वरित खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे. आष्टी-साहूर मार्ग खड्डेमय झाला आहे. साईडपट्ट्या दोन्ही बाजुने डांबरी रस्त्यापेक्षा वर आल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचते. या खड्ड्यात ३ फुट खोल पाणी साचल्याने दुचाकी, ट्रक, कार चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गाने वरूड, मुलताई, बैतुलकडे शेकडो ट्रक धावतात. दुचाकी दिवसभर सुरू असतात. बारा अपघातात सर्व दुचाकी चालक व सहकारी गंभीर जखमी झाले. सदर रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास बांधकाम विभागाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशाराही गजानन भोरे यांनी निवेदनातून दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)साडेचार कोटींचा खर्च व्यर्थआष्टी-साहूर राज्यमार्गाच्या डांबरीकरणावर दोन वर्षांपूर्वी तीन कोटी तर मागील वर्षी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. या रस्त्यावर दिवसरात्र रहदारी सुरू असते. जड वाहतुकीमुळे रस्त्याच्या कामावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. बांधकामाचा दर्जा सूमार आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येते. डांबरामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ राहत असल्याने वर्षभरामध्ये रस्ता उखडण्याची हमी दिली जात असल्याचेच दिसते. शासनाच्या निधीला चुना लावण्याचे काम सुरू आहे. काम झाल्यानंतर वर्षाअखेरीस रस्ता का उखडतो, यावर विचार करण्याची वेळ आली असताना त्याकडेही कानाडोळाच केला जात असल्याचे दिसते. चांगल्या रस्त्यांसाठी शासन निधी देते; पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा भ्रष्ट ठरत आहे. यामुळेच रस्त्याची वाट लागत आहे.साईडपट्ट्या धोकादायकतळेगाव ते आष्टी, आष्टी ते साहूर या दोन्ही मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या डांबरी रस्त्यापेक्षा वर आल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढत जाते. यामुळे पट्ट्यांचा उतार कसा काढायचा, याचेही नियोजन गरजेचे आहे. अपघाताचे प्रमाण यामुळेच वाढत आहे. एकावेळी दोन वाहने आल्यास दुचाकी चालकाला जाण्यासाठी जागाच राहत नाही. यामुळे अपघात होत आहे. नागरिकांची ओरड बांधकाम विभागाला नित्याचीच झाली असून तेही दुर्लक्षच करतात.आले अधिकारी ठेकेदाराच्या मनारस्ता डांबरीकरणाचे काम सुरू झाल्यावर अधिकारी डांबरी हॉटमिक्स प्लॅन्टवर जात नाही. एकत्र झालेले साहित्य रस्त्यावर टाकले जाते. यामुळे बारा महिन्यात त्याचे बारा वाजतात. अधिकारी उपस्थित राहत नाही. नागरिक ओरडून सांगतात; पण अधिकारी मनावर घेईल तरच ना! रस्त्यांची वाट लागल्यानंतर बांधकाम विभागाला जागा येते. हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे. शासनाच्या निधीचा योग्यरित्या खर्च करून भ्रष्टाचारमुक्त कामे करावी, अशी रास्त अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत. रस्त्यांची होणारी चाळणी आतातरी थांबवावी, अशी मागणी आष्टी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.