शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आर्वीत कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या दरम्यान एकूण १७ कोरोना रुग्ण आढळले.

ठळक मुद्दे१७ कोरोना रुग्णांची नोंद : कोविड विषाणूने एका महिलेचा घेतला बळी

राजेश सोळंकी ।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागात चोरपावलांनी शिरकाव केलेल्या कोरोनाने आता हळूहळू शहरी भागातही पाय पसरायला सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या दरम्यान एकूण १७ कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. १० मे रोजी जिल्ह्यातील सर्वात पहिला रुग्ण आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावात आढळला. हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल सात आणि तीन असा एकूण दहा किमीचा परिसर कंटेन्मेंट आणि बफर झोन तयार करून सील करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच जामखुटा या गावातील तीन व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे १७ मे रोजी पुढे आले. त्यानंतर २२ मे रोजी आर्वी तालुक्यातील रोहणा नजीकचे नागापूर येथे बाहेरून आलेला इसम कोरोनाबाधित आढळला. २५ मे रोजी आर्वी शहरातील पुरुषोमल चौक सिंदी कॅम्प येथे कोरोना बाधित महिला आढळल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली. सदर महिला ही अकोला येथील आर्वीत दाखल झाली होती. तर वर्धमनेरी येथील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ५ जून रोजी पुढे आले. त्यानंतर तब्बल २२ दिवसानंतर २७ जून रोजी आर्वी शहरातील जाजुवाडीत नवीन कोरोना बाधित आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ५ जुलैला आर्वीचे नगराध्यक्षच कोरोना बाधित निघाल्याने वल्लीसाहेब वॉर्ड सील करण्यात आला.७ जुलैला श्रीराम वार्डातील वयोवृद्ध व्यक्ती, ११ जुलैला नेताजी वार्डातील ४२ वर्षीय व्यक्ती तसेच आर्वी तालुक्यातील नटाला बोथली येथील २२ वर्षीय युवती आणि १२ जुलैला रामदेव बाबा वार्डातील २३ वर्षीय युवक तसेच सोमवारी भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा तालुक्यात कोरोनाबाबतची दहशत निर्माण झाली आहे. मध्यतंरीच्या काळात आर्वीच्या प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बाहेरून येताना १४ दिवस विलगीकरणाबाबतही आदेश पारीत केलेत.दोन महिन्यांत ८,२३६ व्यक्ती गृहविलगीकरणातआर्वी तालुक्यातील एका महिलेचा कोरोनाने बळी घेतला. तालुक्यात मागील दोन महिन्यांच्या काळात ८ हजार २३६ व्यक्तींना होम क्वारंटाईन केले. त्यापैकी ७ हजार २११ व्यक्तींच्या गृहविलगीकरणाचा कालावधी संपला आहे. सध्या हायरिस्कमध्ये ११ तर लो-रिस्क मध्ये २४ व्यक्ती असून त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या २४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.निकट संपर्कातील सर्वच निगेटिव्हकोरोना बाधिताची नोंद घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले. पण कोरोना बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.आठ परिसर झाले सीलकोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून क्लस्टर कंटेन्मेंट कृती आराखडा अंमलात आणून आर्वी शहरातील पुरुषोमल चौक सिंधी कॅम्प, जाजुवाडी परिसर, वल्ली साहेब वार्ड, श्रीराम वार्ड, नेताजी वार्ड, रामदेव बाबा वार्ड, शासकीय कर्मचारी निवासस्थान (नेताजी चौक )सील केले होते.तीन वेळा संचारबंदीआर्वीत मागील दोन महिन्यांच्या काळात एकूण तीन वेळा सक्तीची संचारबंदी लागू करून नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या जनता कर्फ्यूला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मात्र रुग्णसंख्या वाढतच आहे.नागरिकांनी स्वत:ला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी वेळोवेळी हात धुवावे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. कुठल्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.- हरिष धार्मिक, उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या