शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:00 AM

छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर वाहने उभे केली जात असल्याने वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना झाली आहे.

ठळक मुद्देरस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा : नगरपालिका, पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरात वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची स्थिती, अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, वाहनतळाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे.छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर वाहने उभे केली जात असल्याने वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक अडथळे पार करीत वाहनधारकांना अमरावतीकडे कसेबसे जावे लागत आहे. वाहनतळाअभावी नागरिक वाटेल तेथे वाहन उभे करतात. वाहन उभे केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, मात्र याचा कुणीच विचार करीत नाही. मुख्य रस्त्यावर वाहन उभे करून चर्चा करणारे अनेक महाभाग शहरात आहेत.शहरातील अनेक ठिकाणे अपघातप्रवण स्थळ झाले आहे. बसस्थानक तसेच एलआयसी कार्यालयासमोर आॅटो, काळीपिवळी व ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे केले जात असल्यामुळे वसंतनगर येथून येणाºया लोकांना मुख्य रस्त्यावरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच साईनगरकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेलसमोर उभी केली जाणारी वाहने, चौकातील गर्दी यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. तरूणांच्या गर्दीमुळे शासकीय विश्राम गृहासमोरसुद्धा बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. शहरातील वाहतूक सुरळीत कशी करता येईल व वाहतुकीच्या समस्या कशी सोडविता येईल याचा विचार करणे गजरेचे झाले आहे. पोलीस विभाग, नगरपालिका व प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी