शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
2
चारवेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
4
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
5
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
6
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
7
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
8
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
9
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
10
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
11
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
12
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात
13
कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
15
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये; सेन्सेक्स निफ्टीवर फ्लॅट ट्रेडिंग-डिफेन्स शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
17
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
18
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
19
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
20
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम

आर्वी उपसा सिंचन हे देशातील पहिले मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

गावात एखादा २०० कोटी खचून कारखाना उभा राहिल्यास आपल्याला आनंद होतो. परंतु, आपल्या अंगणातून गेलेल्या ३ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून आपली भूूमी सुजलाम्-सुफलाम् होऊन आर्थिक उन्नती होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला देवळी, आर्वी, हिंगणघाट व वर्धा तालुक्यातील १०८ पाणी वापर संस्थांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.

ठळक मुद्देअविनाश सुर्वे : निम्न वर्धा प्रकल्प पाणी वापर संस्थेची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मागील पाच वर्षात विदर्भातील निम्न वर्धा व गोसेखुर्द प्रकल्पांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून भरारी घेतली आहे. देशातील व राज्यातील पहिला प्रयोग म्हणून जिल्ह्यातील आर्वी उपसा सिंचन योजनेत निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी घेऊन ६ हजार ४०० हेक्टर शेतजमिनीपर्यंत पाणी पोहोचविण्याचे मॉडेल उभे राहिले आहे, असे मत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी व्यक्त केले.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत निम्न वर्धा प्रशासन, मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेच्यावतीने निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत ‘पाणी व्यवस्थापन व सिंचन व्यवस्थापन’ या विषयावर जिल्ह्यातील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची एक दिवशीय कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वर्ध्यातील मुडे सेलिब्रेशनमध्ये पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटक म्हणून सुर्वे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पाटबंधारे मंहामंडळ नागपूरचे अधिक्षक अभियंता ज.ग.गवळी, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जि.मो.शेख, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दि.ग.बारापत्रे, कार्यकारी अभियंता आर.पी.वऱ्हाडे तर मार्गदर्शक म्हणून अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण मुंबईचे सिनिअर फेलो श्रीकांत बाराहाते, भरत महोदय, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वरभे व वन्यजीव तज्ज्ञ व संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांची उपस्थिती होती. पुढे सुर्वे म्हणाले, राज्यातील ३२५ लाख हेक्टर क्षेत्रात शेती केली जात असताना केवळ ३० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. गावात एखादा २०० कोटी खचून कारखाना उभा राहिल्यास आपल्याला आनंद होतो. परंतु, आपल्या अंगणातून गेलेल्या ३ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून आपली भूूमी सुजलाम्-सुफलाम् होऊन आर्थिक उन्नती होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला देवळी, आर्वी, हिंगणघाट व वर्धा तालुक्यातील १०८ पाणी वापर संस्थांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते. यावेळी राणी दुर्गावती व सावित्रीबाई फुले पाणी वापर संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राशीद पठाण व आभार प्रदर्शन सहाय्यक अभियंता सचीन गाडे यांनी केले. आयोजनाकरिता उपविभागीय अभियंता गजानन घुगल, संजय मानकर, अमोल चंदावार, एस. पी. पवार, डी. आर. जोशी व उपकार्यकारी अभियंता पूजा पत्तेवार यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.शेतकऱ्यांसाठी कार्य करावेनिम्न वर्धा प्रकल्पाची सिंचन क्षमता ६३ हजार हेक्टर असून यापैकी हल्ली ४३ हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. घनमापन पद्धतीने पाणी वाटप केले जात आहे. खर्डा व पुलगाव बॅरेजचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील १०८ पाणी वाटप संस्थापैकी ८८ संस्था कार्यरत होऊन पदाधिकाºयांनी निवड झाली आहे.ग्रामीण जीवन स्वावलंबी होण्यासाठी तत्रज्ञान अवगत करण्यासोबतच संरक्षीत शेती व संरक्षीत बाजारभाव या संकल्पना राबविल्या पाहिजे. केवळ पाण्याचा वापर करणे याच उद्देशाकरिता ही संस्था कार्यरत नसून परिसरातील शेतकºयांचे संघटन, पाण्यानुसार शेतजमिनीची निवड, शेतमालाची गुणवत्ता, उपलब्ध बाजारपेठ तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच आर्थिक गुंतवणूक सोडविण्यासाठी ही संस्था महत्वाची असल्याचेही मत मान्यवरांनी व्यक्त केले.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास