शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

आर्वी-तळेगाव महामार्गाचा विक्रम; चार वर्षानंतरही मार्ग पूर्ण होईना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:16 IST

बारा किलोमीटरचे खस्ताहाल : गिनिज बुकामध्ये नोंद करा, प्रवाशांकडून होतेय मागणी

आर्वी (वर्धा) : येथील आर्वी-तळेगाव मार्ग म्हटला की अनेकांच्या अंगावर काटे उभे राहतात. या मार्गावरील खडतर प्रवासामुळे हा मार्ग आता जिल्ह्यातच नाही तर विदर्भात प्रसिद्ध झाला आहे. आर्वी ते तळेगाव हा केवळ १२ किलोमीटरच्या मार्गाचे गेल्या ४ वर्षांपासून काम सुरू असून, अद्यापही हा मार्ग पूर्णत्वास गेला नसल्याने नवा विक्रम नोंदविला आहे. त्यामुळे या मार्गाची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड’ मध्ये नोंद करावी, अशी मागणी या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्यांनी केली आहे.

आर्वी-तळेगाव या मार्गावर अमरावती, नागपूरवरून, मोर्शी, वरुड आदीसह मध्य प्रदेशकडे जाणारा मार्ग आहे. तसेच तळेगाव, आर्वी, पुलगाव मार्गे आंध्र प्रदेशकडे जाता येते. त्यामुळे हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून याची अवस्था फारच बिकट झाली आहे. आर्वीकरांना नागपूरला जायचे असेल तर खरांगणा मार्गे जावे लागते. या खडतर मार्गाने गेल्या चार वर्षात अनेकांना विविध आजारांचा उपहार दिला आहे. आर्वी ते तळेगाव मार्गाचे काम तातडीने पूर्णत्वास जावे, याकरिता सत्ताधारी व विरोधकांनीही आंदोलने केली. परंतु चार वर्षात हा प्रश्न मार्गी लागला नाही. केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असतानाही या मार्गाचा प्रश्न कुणीच का सोडवू शकले नाही? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारल्या जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची दखल घेतल्यानंतर नवीन कंत्राटदाराला काम देण्यात आले. ऑगस्ट २०२२ पर्यंत ६० टक्के काम पूर्ण करून देण्याची लेखी हमीही देण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होतो. मात्र, पावसाळा सुरू झाला आणि कंत्राटही रद्द झाल्याने काम ठप्प पडले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जानेवारी महिन्यात पुन्हा नवीन कंत्राटाची निविदा काढली. आधीच्या कंत्राटदाराकडे सर्वच साहित्य व यंत्रणा असतानाही काम बंद का करण्यात आले, हे कळलं नाही? नव्या कंत्राटदाराला एका वर्षात काम पूर्ण करून द्यायचे असल्याने आता कधी पूर्ण होणार? आणखी हे काम किती वर्षे चालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निविदेमध्ये १२ किमीच्या कामाकरिता ३३ कोटींची वाढ

चार वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामाकरिता आतापर्यंत चार कंत्राटदार बदलण्यात आले आहे. आता पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने १३ जानेवारीला ९९.५४ कोटींची निविदा काढली आहे. चार वर्षांपूर्वी या महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हा या कामाची अंदाजित किंमत ६६.८८ कोटी होती. चार वर्षात आधीच्या कंत्राटदारांनी बरेच काम पूर्णत्वास नेले असतानाही आता ही निविदा ९९.५४ कोटींची कशी काढली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वीच्या कंत्राटदाराने सहा किलोमीटर सिमेंट रस्त्याचे काम एका बाजुने पूर्ण केले आहे. वर्धामनेरी येथील मोठ्या पुलाचे काम तसेच लहान-मोठ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तरीही नवीन निविदेमध्ये ३३ कोटींची वाढ कशी झाली? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

चार वर्ष होऊनही आर्वी-तळेगाव या मार्गाचे बारा किलोमीटर काम पूर्ण झाले नाही, ही शोकांतिका आहे. आतापर्यंत चार कंत्राटदार बदलण्यात आले. मात्र, नेमकी अडचण काय हेच समजत नाही. आता नवीन कंत्राटदार काम केव्हा सुरू करणार, हे सांगता येणार नाही. या रस्त्याच्या विक्रमी कार्याची नोंद गिनिज बुकमध्ये व्हायला पाहिजे असे वाटते.

- डॉ. श्याम भुतडा, सामाजिक कार्यकर्ते, आर्वी

आर्वी ते तळेगाव या मार्गाचे चार वर्षांपासून काम अपूर्ण आहे. नेहमी या मार्गाने जाणे-येणे करावे लागते. वाहने तर खिळखिळी झालीच पण शरीराचे सर्व अवयवही या मार्गाने प्रवास करताना ढिले झाले आहे. या मार्गाची नोंद गिनिज वर्ल्ड बुकमध्ये होणे अत्यावश्यक आहे.

- प्रा. नितीन माथनकर,नियमित प्रवासी

टॅग्स :localलोकलwardha-acवर्धा